शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ठेकेदाराला सरळ करण्याची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:12 IST

सातारा : खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस’ वळणावर कर्नाटकातील १८ मजुरांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे वळणच चुकीचे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या या वळणावर वारंवार अपघात होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आता सदोष मनुष्यवधाचा तिसऱ्यांदा गुन्हा ...

सातारा : खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस’ वळणावर कर्नाटकातील १८ मजुरांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे वळणच चुकीचे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या या वळणावर वारंवार अपघात होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आता सदोष मनुष्यवधाचा तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली आहे.खंबाटकी बोगदा वाहतुकीस खुला करण्यात आल्यानंतर तिसºया महिन्यांतच या ठिकाणी कंटेनर उलटला होता. यामध्ये पाचजणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वळणावर अपघाताची मालिका सुरू झाली; ती अखंडितपणे सुरूच राहिली आहे. ‘एस’ वळण धोकादायक असल्याचे सांगत अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र, या वळणावर तकलादू उपाययोजना करण्यापलीकडे प्रशासनाने काहीच केले नाही. आता या वळणावर १८ जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले आहे. २०१४ ला संबंधित ठेकेदारावर खंडाळा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने जामीन घेतला. त्यानंतर हा खटला आता न्यायालयात सुरू आहे. आता तिसºयांदा त्याच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.अपघातप्रश्नी यांच्यावर गुन्हा दाखल होणारभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांचे उपठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.बेकायदा प्रवासी वाहतूक अडचणीचीटेम्पोमध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणात साहित्य भरले होते. त्याच साहित्यावर ३७ मजूर बसले होते. मालवाहतूक करणाºया टेम्पोला प्रवासी वाहतूक करता येत नाही, असे असताना संबंधित टेम्पो चालकाने बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘एस’ वळण तयार करणाºया संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करताना जिल्हा प्रशासनासमोर अडचणी असून, नेमका गुन्हा दाखल कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर ‘आ’ वासून उभा आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी बैठक बोलविली असून, सर्व विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये यावर उपाययोजना आणि घडलेल्या घटनेचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच संंबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा की नाही, यासंदर्भात निर्णय होणार आहे.