शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

‘त्या’ ठेकेदाराला सरळ करण्याची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:12 IST

सातारा : खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस’ वळणावर कर्नाटकातील १८ मजुरांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे वळणच चुकीचे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या या वळणावर वारंवार अपघात होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आता सदोष मनुष्यवधाचा तिसऱ्यांदा गुन्हा ...

सातारा : खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस’ वळणावर कर्नाटकातील १८ मजुरांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे वळणच चुकीचे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या या वळणावर वारंवार अपघात होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आता सदोष मनुष्यवधाचा तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली आहे.खंबाटकी बोगदा वाहतुकीस खुला करण्यात आल्यानंतर तिसºया महिन्यांतच या ठिकाणी कंटेनर उलटला होता. यामध्ये पाचजणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वळणावर अपघाताची मालिका सुरू झाली; ती अखंडितपणे सुरूच राहिली आहे. ‘एस’ वळण धोकादायक असल्याचे सांगत अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र, या वळणावर तकलादू उपाययोजना करण्यापलीकडे प्रशासनाने काहीच केले नाही. आता या वळणावर १८ जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले आहे. २०१४ ला संबंधित ठेकेदारावर खंडाळा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने जामीन घेतला. त्यानंतर हा खटला आता न्यायालयात सुरू आहे. आता तिसºयांदा त्याच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.अपघातप्रश्नी यांच्यावर गुन्हा दाखल होणारभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांचे उपठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.बेकायदा प्रवासी वाहतूक अडचणीचीटेम्पोमध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणात साहित्य भरले होते. त्याच साहित्यावर ३७ मजूर बसले होते. मालवाहतूक करणाºया टेम्पोला प्रवासी वाहतूक करता येत नाही, असे असताना संबंधित टेम्पो चालकाने बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘एस’ वळण तयार करणाºया संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करताना जिल्हा प्रशासनासमोर अडचणी असून, नेमका गुन्हा दाखल कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर ‘आ’ वासून उभा आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी बैठक बोलविली असून, सर्व विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये यावर उपाययोजना आणि घडलेल्या घटनेचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच संंबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा की नाही, यासंदर्भात निर्णय होणार आहे.