शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

‘त्या’ ठेकेदाराला सरळ करण्याची तयारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:12 IST

सातारा : खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस’ वळणावर कर्नाटकातील १८ मजुरांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे वळणच चुकीचे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या या वळणावर वारंवार अपघात होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आता सदोष मनुष्यवधाचा तिसऱ्यांदा गुन्हा ...

सातारा : खंबाटकी बोगद्याजवळील ‘एस’ वळणावर कर्नाटकातील १८ मजुरांचा बळी गेल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे वळणच चुकीचे तयार करण्यात आले असून, आतापर्यंत पन्नासहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या या वळणावर वारंवार अपघात होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर आता सदोष मनुष्यवधाचा तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली आहे.खंबाटकी बोगदा वाहतुकीस खुला करण्यात आल्यानंतर तिसºया महिन्यांतच या ठिकाणी कंटेनर उलटला होता. यामध्ये पाचजणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वळणावर अपघाताची मालिका सुरू झाली; ती अखंडितपणे सुरूच राहिली आहे. ‘एस’ वळण धोकादायक असल्याचे सांगत अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र, या वळणावर तकलादू उपाययोजना करण्यापलीकडे प्रशासनाने काहीच केले नाही. आता या वळणावर १८ जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले आहे. २०१४ ला संबंधित ठेकेदारावर खंडाळा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने जामीन घेतला. त्यानंतर हा खटला आता न्यायालयात सुरू आहे. आता तिसºयांदा त्याच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.अपघातप्रश्नी यांच्यावर गुन्हा दाखल होणारभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यांचे उपठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.बेकायदा प्रवासी वाहतूक अडचणीचीटेम्पोमध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणात साहित्य भरले होते. त्याच साहित्यावर ३७ मजूर बसले होते. मालवाहतूक करणाºया टेम्पोला प्रवासी वाहतूक करता येत नाही, असे असताना संबंधित टेम्पो चालकाने बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘एस’ वळण तयार करणाºया संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करताना जिल्हा प्रशासनासमोर अडचणी असून, नेमका गुन्हा दाखल कसा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर ‘आ’ वासून उभा आहे.जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी बैठक बोलविली असून, सर्व विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये यावर उपाययोजना आणि घडलेल्या घटनेचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच संंबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा की नाही, यासंदर्भात निर्णय होणार आहे.