शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

शरद पवारांविरोधात आंदोलनाची तयारी

By admin | Updated: September 6, 2016 01:39 IST

अ‍ॅट्रॉसिटी प्रतिक्रिया : आंबेडकरप्रमी कार्यकर्त्यांकडून निषेधाचे पत्रक

सातारा : शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात काही अपवाद वगळता मराठा आणि मागासवर्गीय समाज गुण्या-गोविंदाने राहत आहेत, ज्या-ज्यावेळी महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर आणि संबंधित महिलांवर अत्याचाराच्या भीषण घटना घडल्या त्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्याप्रती कधी सांत्वन अथवा आधार देण्याचे काम केले नाही. किंवा अ‍ॅट्रॉसिटी कायदा कडक करावा म्हणून मागणी केली नाही, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे संजय गाडे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, केवळ कोपर्डी प्रकरणात राजकीय हित साधण्यासाठी बीड आणि उस्मानाबाद येथे सुनियोजित निषेध आंदोलनाचा विराट मोर्चा काढून समाजाला मागासवर्गीय समाजावर हिंसक होण्यास भाग पाडत आहे. केवळ रामदास आठवले यांच्या भाजप युतीच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रातील सत्ता हातातून निघून गेल्याने हताश झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीय तेढ निर्माण व्हावी, राज्यात अशांतता निर्माण व्हावी आणि पुन्हा एकदा सत्तेचे झुकते माप आपल्याला मिळावे, या हेतूने प्रेरित होऊन अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत वक्तव्य करून राज्यात जात-धर्मातील एकसंधतेला छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे.महापुरुषांचा वारसा लाभलेल्या राज्यात केवळ सत्तेपोटी अशी दोन जातीत तेढ निर्माण करणारी वक्तव्य शरद पावर यांना शोभणारी नाही आणि राज्यात गुण्या-गोविंदाने राहणाऱ्या सर्वांनाच अनुकूल नाही. याचा गांभीर्याने विचार करून श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दादा ओव्हाळ, विजय गायकवाड, मदन खंकाळ यांच्यासह रिपाइं कार्यकर्ते दि. ९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय समोर एल्गार आंदोलन करून शरद पवार यांचा निषेध करणार असल्याचे गाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) तेढ निर्माण करण्याचे पवारांचे निंदनीय कामराजकारणातील धुरंधर म्हणून ओळख असणाऱ्या पवार यांना आठवले भाजप, सेना व इतर मित्र पक्षांशी युती केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. कायम सत्तेत राहण्याची सवय झालेल्या पवार यांना ही बाब रुचलेली नाही. भविष्यात असाच फॉर्म्युला राहिल्यास सत्तेचे फळ चाखता येणार नाही. याची खात्री झाल्यानेच तेढ निर्माण कसे होईल, त्यासाठी पवार यांनी चालवलेला प्रयत्न निंदनीय आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.