शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

कोवळ्या पाठीवर अकाली ओझं

By admin | Updated: June 12, 2014 00:43 IST

एकही कारवाई नाही : उपाहारगृह, वीजभट्टी, किराणा दुकानांमध्ये बालकामगार बनले वेठबिगार

जगदीश कोष्टी ल्ल सातारा पुरोगामी जिल्हा अशी साताऱ्याची ओळख आहे. महिला, बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात जिल्हा कायम अग्रेसर राहिला. त्यासाठी अनेक संस्था-संघटना यासाठी झगडत आहेत. गेल्या वर्षीच जिल्ह्यात ‘चाईल्ड हेल्पलाईन’ सुरू झाली आहे. मात्र, बेकारी-दारिद्र्याचा बट्टा जिल्ह्याला लागला आहे. दोन वेळच्या भाकरीची अनेकांना भ्रांत आहे. यातूनच अनेक चिमुकले जीव मिळेल ते काम करीत आहेत. या बालकामगारांचे पावलोपावली दर्शन घडत असतानाही शासनदरबारी मात्र जिल्हा ‘बालकामगारमुक्त’ असल्याचं अभिमानानं सांगितलं जात आहे. समाजातील वास्तव चित्राचा घेतलेला आढावा...लोकसभा निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली. केंद्रात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली, ‘अब... अच्छे दिन आनेवाले है!’ मोदींच्या या विधानानंतर सर्वसामान्यांना हायसे वाटले. या निवडणुकीतही नरेंद्र मोदी हे लहानपणी चहा विकत होते, हाही मुद्दा प्रचारात भलताच गाजला. चहा विकणारा मुलगा पंतप्रधान होतो, हे स्वप्नवत असले, तरी बालमजुरी हा समाजाला लागलेला कलंक असून, ते एक दु:स्वप्नच आहे, हेही खरे. याला शहर व जिल्हाही अपवाद नाही.शहरातील अनेक उपाहारगृहांमध्ये मुले काम करतात. ग्राहकांना चहा-पाणी देणे, आतील रुममध्ये कप-बशी, ग्लास विसळण्याची कामे ती करतात. नेमक्या अशाच हॉटेलमध्ये एक फलक हमखास पाहायला मिळतो... ‘येथे बालकांना काम मिळणार नाही. येथील कामगारांना दररोज पगार दिला जातो...’ अशाच अनेक हॉटेलांत मुलांकडून काम करवून घेतले जाते. महामार्गावरील ढाब्यांमध्येही बालकामगार कार्यरत आहेत.जिल्ह्यातून अनेक नद्या वाहतात. त्यामुळे वाळू व्यावसायाबरोबरच वीटभट्टीचा व्यवसायही चांगला चालतो. अशा अनेक वीटभट्ट्यांमध्ये बालकामगार काम करत आहेत. यामध्ये माती, पाणी आणणे, चिखल तयार करणे, भाजलेल्या विटा बाजूला आणणे आदी कामे ही मुलं करतात.वडापाव, भेळ, मिसळचे गाडे, बसस्थानकात बूटपॉलीश करणे, चित्रपटगृहांमध्ये चणे-फुटाणे विकताना बालकामगार दिसतात. या सर्व मुलांकडे समाज उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. अशा मुलांना पाहून अनेकांना वाईटही वाटतं; पण हे थांबविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, हेच दुर्दैव!