शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

कोवळ्या पाठीवर अकाली ओझं

By admin | Updated: June 12, 2014 00:43 IST

एकही कारवाई नाही : उपाहारगृह, वीजभट्टी, किराणा दुकानांमध्ये बालकामगार बनले वेठबिगार

जगदीश कोष्टी ल्ल सातारा पुरोगामी जिल्हा अशी साताऱ्याची ओळख आहे. महिला, बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात जिल्हा कायम अग्रेसर राहिला. त्यासाठी अनेक संस्था-संघटना यासाठी झगडत आहेत. गेल्या वर्षीच जिल्ह्यात ‘चाईल्ड हेल्पलाईन’ सुरू झाली आहे. मात्र, बेकारी-दारिद्र्याचा बट्टा जिल्ह्याला लागला आहे. दोन वेळच्या भाकरीची अनेकांना भ्रांत आहे. यातूनच अनेक चिमुकले जीव मिळेल ते काम करीत आहेत. या बालकामगारांचे पावलोपावली दर्शन घडत असतानाही शासनदरबारी मात्र जिल्हा ‘बालकामगारमुक्त’ असल्याचं अभिमानानं सांगितलं जात आहे. समाजातील वास्तव चित्राचा घेतलेला आढावा...लोकसभा निवडणुकीत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली. केंद्रात सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली, ‘अब... अच्छे दिन आनेवाले है!’ मोदींच्या या विधानानंतर सर्वसामान्यांना हायसे वाटले. या निवडणुकीतही नरेंद्र मोदी हे लहानपणी चहा विकत होते, हाही मुद्दा प्रचारात भलताच गाजला. चहा विकणारा मुलगा पंतप्रधान होतो, हे स्वप्नवत असले, तरी बालमजुरी हा समाजाला लागलेला कलंक असून, ते एक दु:स्वप्नच आहे, हेही खरे. याला शहर व जिल्हाही अपवाद नाही.शहरातील अनेक उपाहारगृहांमध्ये मुले काम करतात. ग्राहकांना चहा-पाणी देणे, आतील रुममध्ये कप-बशी, ग्लास विसळण्याची कामे ती करतात. नेमक्या अशाच हॉटेलमध्ये एक फलक हमखास पाहायला मिळतो... ‘येथे बालकांना काम मिळणार नाही. येथील कामगारांना दररोज पगार दिला जातो...’ अशाच अनेक हॉटेलांत मुलांकडून काम करवून घेतले जाते. महामार्गावरील ढाब्यांमध्येही बालकामगार कार्यरत आहेत.जिल्ह्यातून अनेक नद्या वाहतात. त्यामुळे वाळू व्यावसायाबरोबरच वीटभट्टीचा व्यवसायही चांगला चालतो. अशा अनेक वीटभट्ट्यांमध्ये बालकामगार काम करत आहेत. यामध्ये माती, पाणी आणणे, चिखल तयार करणे, भाजलेल्या विटा बाजूला आणणे आदी कामे ही मुलं करतात.वडापाव, भेळ, मिसळचे गाडे, बसस्थानकात बूटपॉलीश करणे, चित्रपटगृहांमध्ये चणे-फुटाणे विकताना बालकामगार दिसतात. या सर्व मुलांकडे समाज उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. अशा मुलांना पाहून अनेकांना वाईटही वाटतं; पण हे थांबविण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, हेच दुर्दैव!