शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

फलटणमधील शेतकऱ्यांवर ‘अवकाळी’ची अवकळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

फलटण : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी, साखर कारखानदार, वीटभट्टी चालक यांचे व्यवसाय संकटात सापडले आहेत. या क्षेत्रातील ...

फलटण : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी, साखर कारखानदार, वीटभट्टी चालक यांचे व्यवसाय संकटात सापडले आहेत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे रोजगार बुडाल्याने त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे आहे. तर साखर कारखान्यातील तोडणी वाहतूक मजुरांच्या तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या निवाऱ्यात पाणी शिरल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

फलटण तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे. या पावसामुळे शेतातील रब्बीच्या उभ्या पिकांवर करपा, तांबेरा, कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी खात्याने पिकांवरील संभाव्य कीडरोग, करपा, तांबेरा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी औषध फवारणीचा सल्ला दिला असला तरी पैशाशिवाय औषधे कोठून व कशी आणणार? या विवंचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे.

अवकाळीचा वीट व्यावसायिकांनादेखील फटका बसला. काम बंद झाल्याने वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ तर आली शिवाय त्यांचा तात्पुरता निवारा संपुष्टात आल्याने ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. साखर कारखान्यांत ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांनादेखील अवकाळी पावसामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. बँका, दुकानदार, सावकार यांच्याकडून गरजेपुरता पैसा घेतला. मात्र, तो परत न करता आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या ठोस मदतीची गरज निर्माण झाली आहे.

(चौकट)

भरपाईची मागणी

यावर्षी रब्बी हंगाम यशस्वी झाल्याने बळीराजा सुखावला असताना अवकाळीने तडाखा दिल्याने आता शेतकरी पुन्हा एकदा कोलमडून पडला आहे. त्यांना उभारी देण्यासाठी शासनाने गत हंगामात अतिवृष्टीने वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत केलेल्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

फोटो : ११ फलटण

फलटण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (छाया : नसीर शिकलगार)