शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

फलटणमधील शेतकऱ्यांवर ‘अवकाळी’ची अवकळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

फलटण : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी, साखर कारखानदार, वीटभट्टी चालक यांचे व्यवसाय संकटात सापडले आहेत. या क्षेत्रातील ...

फलटण : अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी, साखर कारखानदार, वीटभट्टी चालक यांचे व्यवसाय संकटात सापडले आहेत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे रोजगार बुडाल्याने त्यांच्यासमोर उपासमारीचे संकट उभे आहे. तर साखर कारखान्यातील तोडणी वाहतूक मजुरांच्या तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या निवाऱ्यात पाणी शिरल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

फलटण तालुक्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे. या पावसामुळे शेतातील रब्बीच्या उभ्या पिकांवर करपा, तांबेरा, कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी खात्याने पिकांवरील संभाव्य कीडरोग, करपा, तांबेरा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी औषध फवारणीचा सल्ला दिला असला तरी पैशाशिवाय औषधे कोठून व कशी आणणार? या विवंचनेत शेतकरी चिंतातूर झाला आहे.

अवकाळीचा वीट व्यावसायिकांनादेखील फटका बसला. काम बंद झाल्याने वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ तर आली शिवाय त्यांचा तात्पुरता निवारा संपुष्टात आल्याने ही कुटुंबे उघड्यावर आली आहेत. साखर कारखान्यांत ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांनादेखील अवकाळी पावसामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. बँका, दुकानदार, सावकार यांच्याकडून गरजेपुरता पैसा घेतला. मात्र, तो परत न करता आल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या ठोस मदतीची गरज निर्माण झाली आहे.

(चौकट)

भरपाईची मागणी

यावर्षी रब्बी हंगाम यशस्वी झाल्याने बळीराजा सुखावला असताना अवकाळीने तडाखा दिल्याने आता शेतकरी पुन्हा एकदा कोलमडून पडला आहे. त्यांना उभारी देण्यासाठी शासनाने गत हंगामात अतिवृष्टीने वाया गेलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत केलेल्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

फोटो : ११ फलटण

फलटण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (छाया : नसीर शिकलगार)