शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

प्रतापराव भोसलेंनी सांभाळला साताऱ्याचा गड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:30 IST

दीपक शिंदे दे शाच्या स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या गणेश आळतेकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर ही ...

दीपक शिंदेदे शाच्या स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या गणेश आळतेकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर ही जागा कम्युनिस्ट पक्षाकडे गेली होती. सीपीआयकडून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा लोकसभा मतदार संघाची जागा जिंकली. ही जागा सीपीआयकडून काढून घेणे सोपे नव्हते; पण काँग्रेसने किसन वीर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी नाना पाटील यांचा पराभव करून ही जागा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेतली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदार संघातून विजय मिळविला.१९८४ ला यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यामुळे साताऱ्याची जागा कोणी लढवायची? हा प्रश्नच होता. कºहाडमधून प्रेमलाताई चव्हाण या काँग्रेसची जागा राखून होत्या; पण साताºयात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कोण? हा प्रश्न पडला होता. त्यातच शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघावर बारीक नजर ठेवली होती. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे साताºयाच्या जागेवर आपलाच हक्क समजून त्यांनी या ठिकाणाहून काँग्रेस अर्सच्या वतीने दादाराजे खर्डेकर यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून प्रतापराव भोसले यांचे नाव समोर आले. या निवडणुकीत प्रतापराव भोसले यांनी दादाराजे खर्डेकर यांचा सुमारे ९५ हजार ५२० मतांनी पराभव केला. त्यानंतर १९८९ ला सुद्धा प्रतापराव भोसले हेच निवडून आले. त्यांना यावेळी जनता दलाचे डी. डी. रणदिवे यांचा विक्रमी सुमारे ३ लाख १६ हजार ९९१ मतांनी पराभव केला होता. तर १९९१ च्या निवडणुकीतही हॅटट्रीक साधत शिवसेनेच्या हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा पराभव करत ते १ लाख ५९ हजार २१२ मतांनी निवडून आले होते. १९९६ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसविरोधी वारे फिरले आणि अटलबिहारी वाजपेयी तसेच भाजपचा करिश्मा पाहायला मिळाला. यावेळी प्रतापराव भोसले यांचा पराभव करून हिंदुराव नाईक-निंबाळकर निवडून आले. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली.