शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापराव भोसलेंनी सांभाळला साताऱ्याचा गड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:30 IST

दीपक शिंदे दे शाच्या स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या गणेश आळतेकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर ही ...

दीपक शिंदेदे शाच्या स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या गणेश आळतेकर यांनी विजय मिळवला. त्यानंतर ही जागा कम्युनिस्ट पक्षाकडे गेली होती. सीपीआयकडून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा लोकसभा मतदार संघाची जागा जिंकली. ही जागा सीपीआयकडून काढून घेणे सोपे नव्हते; पण काँग्रेसने किसन वीर यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी नाना पाटील यांचा पराभव करून ही जागा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेतली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदार संघातून विजय मिळविला.१९८४ ला यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाले होते. त्यामुळे साताऱ्याची जागा कोणी लढवायची? हा प्रश्नच होता. कºहाडमधून प्रेमलाताई चव्हाण या काँग्रेसची जागा राखून होत्या; पण साताºयात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कोण? हा प्रश्न पडला होता. त्यातच शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघावर बारीक नजर ठेवली होती. यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे साताºयाच्या जागेवर आपलाच हक्क समजून त्यांनी या ठिकाणाहून काँग्रेस अर्सच्या वतीने दादाराजे खर्डेकर यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून प्रतापराव भोसले यांचे नाव समोर आले. या निवडणुकीत प्रतापराव भोसले यांनी दादाराजे खर्डेकर यांचा सुमारे ९५ हजार ५२० मतांनी पराभव केला. त्यानंतर १९८९ ला सुद्धा प्रतापराव भोसले हेच निवडून आले. त्यांना यावेळी जनता दलाचे डी. डी. रणदिवे यांचा विक्रमी सुमारे ३ लाख १६ हजार ९९१ मतांनी पराभव केला होता. तर १९९१ च्या निवडणुकीतही हॅटट्रीक साधत शिवसेनेच्या हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा पराभव करत ते १ लाख ५९ हजार २१२ मतांनी निवडून आले होते. १९९६ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसविरोधी वारे फिरले आणि अटलबिहारी वाजपेयी तसेच भाजपचा करिश्मा पाहायला मिळाला. यावेळी प्रतापराव भोसले यांचा पराभव करून हिंदुराव नाईक-निंबाळकर निवडून आले. ही निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली.