शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेल्या वेंकटपुरा पेठेत गेल्या काही दिवसांपासून सकाळी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रमाण वाढले ...

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेल्या वेंकटपुरा पेठेत गेल्या काही दिवसांपासून सकाळी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी तीन वाजता सुरू झाला. त्याचप्रमाणे सोमवारीही सकाळी अकराच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तो बारानंतर पूर्ववत सुरू झाला.

0००००००००

गावोगावच्या यात्रा रद्द

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनही हतबल झाले आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून प्रशासनाने गावोगावच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलीस, तहसील कार्यालयातर्फे बैठका घेऊन यात्रा न भरविण्याबाबत आवाहन केले जात आहे. त्याला ग्रामस्थांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

००००००००००

पाणी गळती सुरू

सातारा : सातारा शहराच्या पश्‍चिम भागातील मंगळवार तळे येथील जलवाहिनीला रविवारी सकाळी गळती लागली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. उन्हाळ्यामध्ये पाणी गळती लागल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी वाहत होते. यामुळे डबक्यांचे स्वरूप आले होते. यातून वाहने गेल्यामुळे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादावादीही होत होती.

0०००००००

भाजीविक्रेते दारावर

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे साताऱ्यातील भाजी मंडई जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. सातारकरांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांवर भाजी, फळे घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत. त्यामुळे महिलांची चांगलीच सोय होत आहे.

००००

दुकानांमध्ये अजूनही गर्दी

सातारा : सातारा शहरासह ग्रामीण भागात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही साताऱ्यातील अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झालेली अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

००००००

महामार्गावर शुकशुकाट

सातारा : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करून जिल्हा बंदी केली आहे. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट जाणवत आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींच्याच गाड्या महामार्गावर दिसत आहेत. तसेच महामार्गावर अधूनमधून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यामुळे लोकही बाहेर पडत नाहीत.

-------------

बांध पेटविणं सुरूच

सातारा : सातारा शहराला लागून असलेले डोंगर विघ्नसंतोषी मंडळींकडून पेटविले जात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाल्या आहेत. आता हे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक शेतकरी बांधावर जाऊन पालापाचोळा पेटवून देत आहेत. हीच आग पुढे डोंगरांकडे सरकून वणवा लागत आहे.