शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेल्या वेंकटपुरा पेठेत गेल्या काही दिवसांपासून सकाळी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रमाण वाढले ...

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेल्या वेंकटपुरा पेठेत गेल्या काही दिवसांपासून सकाळी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी तीन वाजता सुरू झाला. त्याचप्रमाणे सोमवारीही सकाळी अकराच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तो बारानंतर पूर्ववत सुरू झाला.

0००००००००

गावोगावच्या यात्रा रद्द

सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनही हतबल झाले आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून प्रशासनाने गावोगावच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलीस, तहसील कार्यालयातर्फे बैठका घेऊन यात्रा न भरविण्याबाबत आवाहन केले जात आहे. त्याला ग्रामस्थांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

००००००००००

पाणी गळती सुरू

सातारा : सातारा शहराच्या पश्‍चिम भागातील मंगळवार तळे येथील जलवाहिनीला रविवारी सकाळी गळती लागली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. उन्हाळ्यामध्ये पाणी गळती लागल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी वाहत होते. यामुळे डबक्यांचे स्वरूप आले होते. यातून वाहने गेल्यामुळे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादावादीही होत होती.

0०००००००

भाजीविक्रेते दारावर

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे साताऱ्यातील भाजी मंडई जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. सातारकरांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांवर भाजी, फळे घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत. त्यामुळे महिलांची चांगलीच सोय होत आहे.

००००

दुकानांमध्ये अजूनही गर्दी

सातारा : सातारा शहरासह ग्रामीण भागात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही साताऱ्यातील अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झालेली अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

००००००

महामार्गावर शुकशुकाट

सातारा : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करून जिल्हा बंदी केली आहे. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट जाणवत आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींच्याच गाड्या महामार्गावर दिसत आहेत. तसेच महामार्गावर अधूनमधून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यामुळे लोकही बाहेर पडत नाहीत.

-------------

बांध पेटविणं सुरूच

सातारा : सातारा शहराला लागून असलेले डोंगर विघ्नसंतोषी मंडळींकडून पेटविले जात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाल्या आहेत. आता हे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक शेतकरी बांधावर जाऊन पालापाचोळा पेटवून देत आहेत. हीच आग पुढे डोंगरांकडे सरकून वणवा लागत आहे.