शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीने ट्रान्सफार्मरबाबत दक्षता घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केली. तसेच वीज कंपनीने नादुरुस्त ट्रान्सफार्मरबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही कबुले यांनी सुचित केले.

सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीची मासिक सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, सदस्य दीपक पवार, शिवाजीराव सर्वगोड, अर्चना देशमुख, सुवर्णा देसाई आदी उपस्थित होते.

या सभेत सदस्यांनी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीपिकांचे तसेच फळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. यावर अध्यक्ष उदय कबुले यांनी अवकाळीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. तसेच रबी हंगामाच्या दृष्टीने जानेवारी आणि फेब्रुवारी महिने महत्त्वाचे असतात. या काळात पिके पक्व होण्याच्या स्थितीत असल्याने पाणी देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे वीज कंपनीने शेतकऱ्यांना वीजपुरवठा कसा सुरळीत होईल, ते पहावे. तसेच नादुुरुस्त ट्रान्सफार्मर तातडीने दुरुस्त करावेत, अशी सूचना केली.

चौकट :

विशेष सभेचे आयोजन...

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे निर्णय घेता येत नाहीत. यासाठी स्थायी समितीची विशेष सभा २२ किंवा २३ जानेवारीला घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या सभेत विविध निर्णय घेण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

.......................................................