शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

वीज कंपनीने ट्रान्सफार्मरबाबत दक्षता घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केली. तसेच वीज कंपनीने नादुरुस्त ट्रान्सफार्मरबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही कबुले यांनी सुचित केले.

सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीची मासिक सभा अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, सदस्य दीपक पवार, शिवाजीराव सर्वगोड, अर्चना देशमुख, सुवर्णा देसाई आदी उपस्थित होते.

या सभेत सदस्यांनी अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतीपिकांचे तसेच फळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. यावर अध्यक्ष उदय कबुले यांनी अवकाळीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. तसेच रबी हंगामाच्या दृष्टीने जानेवारी आणि फेब्रुवारी महिने महत्त्वाचे असतात. या काळात पिके पक्व होण्याच्या स्थितीत असल्याने पाणी देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे वीज कंपनीने शेतकऱ्यांना वीजपुरवठा कसा सुरळीत होईल, ते पहावे. तसेच नादुुरुस्त ट्रान्सफार्मर तातडीने दुरुस्त करावेत, अशी सूचना केली.

चौकट :

विशेष सभेचे आयोजन...

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे निर्णय घेता येत नाहीत. यासाठी स्थायी समितीची विशेष सभा २२ किंवा २३ जानेवारीला घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या सभेत विविध निर्णय घेण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

.......................................................