शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

आठवणीत राहिलेले ते पोस्टर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST

ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले. इंग्रजांची अन्यायी राजवट उलथवून टाकण्यासाठी त्याकाळच्या भारतीय पुढाऱ्यांनी जीवाचे रान केले. पंडित नेहरु, ...

ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले. इंग्रजांची अन्यायी राजवट उलथवून टाकण्यासाठी त्याकाळच्या भारतीय पुढाऱ्यांनी जीवाचे रान केले. पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील भारताचे स्वप्न आता आकाराला आलेय. प्राचार्य पुरुषोत्तम शेठ स्वातंत्र्यदिनादिवशीची आठवण सांगताना म्हणाले, ‘मी तेव्हा सहावीत शिकत होतो. आम्ही शाळेमध्ये स्वच्छ गणवेश घालून गेलो होतो. स्वातंत्र्य मिळाल्याने सर्वच नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अत्यंत उत्साहाने आणि हर्षोल्हास करत लोक घराबाहेर पडत होते. पहिला स्वातंत्र्य दिनच तो... माझ्या अलिबाग तालुक्यातील मूळगावी रायगाव गोरीगाव येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या घराबाहेर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जिथे विजेेची सोय नव्हती, तिथे पणत्या लावण्यात आल्या हाेत्या. राष्ट्रसेवा दलाच्यावतीने प्रचंड मोठी मशाल मिरवणूक काढली होती. तालुक्याच्या अलिबाग या गावी गावातून बैलगाड्या निघाल्या होत्या. या बैलगाड्यांमध्ये बसून लोक स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते.’

स्वातंत्र्याची फळे आपण आज चाखत आहोत. मागे वळून पाहिलं तर बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण आदींचे मोठे योगदान पुढे येते. शैक्षणिक संस्थांना त्यांनी मोफत जमिनी मिळवून दिल्या म्हणून आज सर्वसामान्यांची मुले पदव्या घेऊन कुटुंबाला स्थिरता मिळवून देत आहेत. तेव्हाचे राजकारणी अत्यंत निस्पृह होते. ए. आर. अंतुले, मनोहर जोशी या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात तांत्रिक शिक्षणाची कवाडे खुली केल्यानेच तंत्रकुशल पिढी निर्माण झाली. स्वातंत्र्यामुळेच देशात १ हजारांच्यावर धरणे बांधली गेली. १९४८मध्ये भारत स्वतंत्र होता तरीदेखील लोक बैलगाड्या घेऊन पाणी आणायला जात होते. आता ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमुळे घरासमोर नळ जोडले गेले आहेत. स्वातंत्र्यामुळे सुख मिळाले. मात्र, स्वैराचारही वाढीला लागला. स्वातंत्र्यानं आपल्याला बरंच काही दिलंय. प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याबद्दल कृतज्ञता असणं गरजेचं आहे.

आपण आता स्वतंत्र झालो तोडफोड बंद...

१९४२मध्ये भारत छोडो आंदोलन पुकारण्यात आले होते. स्वातंत्र्याची प्रेरणा इतकी टोकाला पोहोचली होती की, ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडण्याचे काम सुरु होते. सरकारी कार्यालयांची तोडफोड केली जात होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी सरकारी कचेऱ्यांबाबत लोकांमध्ये द्वेष होता. त्यामुळे आता देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, कुणीही कार्यालयांची तोडफोड करायची नाही, ही कार्यालये आता स्वतंत्र भारताच्या पर्यायाने भारतीयांच्या मालकीची असल्याचे तेव्हाच्या पुढाऱ्यांना जनतेला सांगावे लागले होते.

- सागर गुजर

photo : १४independent