शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

आठवणीत राहिलेले ते पोस्टर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:39 IST

ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले. इंग्रजांची अन्यायी राजवट उलथवून टाकण्यासाठी त्याकाळच्या भारतीय पुढाऱ्यांनी जीवाचे रान केले. पंडित नेहरु, ...

ब्रिटिशांनी १५० वर्षे भारतावर राज्य केले. इंग्रजांची अन्यायी राजवट उलथवून टाकण्यासाठी त्याकाळच्या भारतीय पुढाऱ्यांनी जीवाचे रान केले. पंडित नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील भारताचे स्वप्न आता आकाराला आलेय. प्राचार्य पुरुषोत्तम शेठ स्वातंत्र्यदिनादिवशीची आठवण सांगताना म्हणाले, ‘मी तेव्हा सहावीत शिकत होतो. आम्ही शाळेमध्ये स्वच्छ गणवेश घालून गेलो होतो. स्वातंत्र्य मिळाल्याने सर्वच नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अत्यंत उत्साहाने आणि हर्षोल्हास करत लोक घराबाहेर पडत होते. पहिला स्वातंत्र्य दिनच तो... माझ्या अलिबाग तालुक्यातील मूळगावी रायगाव गोरीगाव येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या घराबाहेर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जिथे विजेेची सोय नव्हती, तिथे पणत्या लावण्यात आल्या हाेत्या. राष्ट्रसेवा दलाच्यावतीने प्रचंड मोठी मशाल मिरवणूक काढली होती. तालुक्याच्या अलिबाग या गावी गावातून बैलगाड्या निघाल्या होत्या. या बैलगाड्यांमध्ये बसून लोक स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यासाठी गेले होते.’

स्वातंत्र्याची फळे आपण आज चाखत आहोत. मागे वळून पाहिलं तर बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण आदींचे मोठे योगदान पुढे येते. शैक्षणिक संस्थांना त्यांनी मोफत जमिनी मिळवून दिल्या म्हणून आज सर्वसामान्यांची मुले पदव्या घेऊन कुटुंबाला स्थिरता मिळवून देत आहेत. तेव्हाचे राजकारणी अत्यंत निस्पृह होते. ए. आर. अंतुले, मनोहर जोशी या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात तांत्रिक शिक्षणाची कवाडे खुली केल्यानेच तंत्रकुशल पिढी निर्माण झाली. स्वातंत्र्यामुळेच देशात १ हजारांच्यावर धरणे बांधली गेली. १९४८मध्ये भारत स्वतंत्र होता तरीदेखील लोक बैलगाड्या घेऊन पाणी आणायला जात होते. आता ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमुळे घरासमोर नळ जोडले गेले आहेत. स्वातंत्र्यामुळे सुख मिळाले. मात्र, स्वैराचारही वाढीला लागला. स्वातंत्र्यानं आपल्याला बरंच काही दिलंय. प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याबद्दल कृतज्ञता असणं गरजेचं आहे.

आपण आता स्वतंत्र झालो तोडफोड बंद...

१९४२मध्ये भारत छोडो आंदोलन पुकारण्यात आले होते. स्वातंत्र्याची प्रेरणा इतकी टोकाला पोहोचली होती की, ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडण्याचे काम सुरु होते. सरकारी कार्यालयांची तोडफोड केली जात होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी सरकारी कचेऱ्यांबाबत लोकांमध्ये द्वेष होता. त्यामुळे आता देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, कुणीही कार्यालयांची तोडफोड करायची नाही, ही कार्यालये आता स्वतंत्र भारताच्या पर्यायाने भारतीयांच्या मालकीची असल्याचे तेव्हाच्या पुढाऱ्यांना जनतेला सांगावे लागले होते.

- सागर गुजर

photo : १४independent