शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ‘गोविंदा’ राजकीय नेत्यांच्या ताब्यात

By admin | Updated: August 12, 2014 23:16 IST

दोन पथकांनी खेळ थांबविला : आयोजकांची संख्या अलीकडे भलतीच घटलीय

जगदीश कोष्टी -सातारा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी गोविंदा पथकांना चांगले दिवस होते. आठ ते दहा मंडळे सक्रीय होती. मोठ-मोठ्या दहीहंडी फोडत असल्याने त्यांचाच बोलबाला सर्वत्र होता. मात्र, जिल्ह्यातील आयोजकांची संख्या अलीकडे घटली आहे. निवडणुका आल्या तर राजकीय नेतेमंडळी दहीहंडी स्पर्धा भरवतात. आजपर्यंत लहान-लहान बक्षिसांवर समाधान मानावे लागत होते.दहिहंडीच्या सरावादरम्यान झालेल्या अपघातांमध्ये आजपर्यंत अनेक मुलांनी जीव गमावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील गोविंदांना केलेला मज्जाव यामुळे गोविंदा पथक सध्या चर्चेत आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील आयोजिकांच्या निरूत्साहामुळे अनेक गोविंदा पथकांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. त्यामुळे अनेक नामवंत पथकांनी यापूर्वीच सहभाग घेणे बंद केले आहे.राज्यात कोठेही वीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर दहिहंडी बांधू नये, असे पत्रक राज्य सरकारने काढावे; तसेच १८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडीतील सहभागावर बंदी घालावी, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले आहे. अठरा वर्षांखालील बाल गोविंदांना यापुढे दहीहंडीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. यामुळे संभाव्य अपघात टळून होणारे नुकसान टाळता येणार आहे. मात्र, अठरा वर्षांपुढील गोविंदा घेऊन दहीहंडी खेळायची कशी, असा प्रश्न गोविंदा पथकांसमोर पडला आहे. दहीहंडी हा साहसी खेळ आहे. यामध्ये एकावर एक थर लावले जातात. हा खेळ खेळत असताना मनोऱ्यावर पाण्याचा मारा केला जातो. त्यामुळे मनोऱ्यांची रचना करताना खालच्या दोन थरांमध्ये प्रौढ व्यक्ती असतात. त्यानंतर वरच्या थरांसाठी कमी वजनांची मुलं वापरली जातात. सर्वांत उंचीवरचा गोविंदा साधारणत: १० ते १५ किलोचा असतो. १८ वर्षांवरील गोविंदा वापरल्यास हालचाली करण्यास अडचणी येतात.जावळी तालुक्यातील भैरवनाथ गोविंदा पथक, जवळवाडी हे पथक आठ ते दहा वर्षांपासून जिल्ह्यात नावारुपास आले आहे. सातारा, कोरेगाव येथील एक लाखांची दहीहंडी फोडण्याचा मान या मंडळाने मिळविला होता. या मंडळाकडे ८० ते १०० गोविंदा होते. त्यांच्याकडून दोन महिन्यांपूर्वीपासून सराव करुन घेतला जात होता. मुलांना चहा-नाष्टा, टी-शर्ट, येण्या-जाण्याचा खर्च वाढत होता. मोठ्या बक्षिसांच्या स्पर्धा होत नसल्याने खर्चही निघत नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षीपासून हे पथक बंद केले आहे.