शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

धनिक दारिद्र्यात अन् गरजू रेषेबाहेर...

By admin | Updated: July 1, 2016 23:37 IST

पाटण तालुका : वंचितांचे हाल

पाटण : तालुक्यात रोजगार निर्मितीचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे अनेक कुटुंबप्रमुख व तरुण मुले मुंबई, पुण्यात चाकरमानी आहेत. पाटण तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये शेकडो कुटुंबे कुडामेडीच्या घरात राहतात. परंतु नेमक्या अशा लोकांचाच शासनाच्या दारिद्र्य रेषेखाली समावेश नाही. याउलट शासकीय योजनांचा लाभ व अनुदाने लाटण्यासाठी श्रीमंती व शेकडो एकर जमीन असणाऱ्या कुटुंबाचा दारिद्र्यात समावेश केला गेल्यामुळे खरोखर गरिबी भोगणाऱ्यांचे हाल होत आहेत.आजकाल दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबाला शासनाचा मोठा हातभार लाभला आहे. विविध योजना, धान्य, वैद्यकीय उपचार, अनुदाने, कर्ज अशा सुविधा रेषेखाली असणाऱ्यांना मिळत आहेत. मग अशा सुविधांचा लाभ घेणारे धनिक असले तर यांना कशी काय सवलत मिळाली आणि आम्हाला एकवेळच्या जेवणाचा प्रश्न पडत असताना त्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यावर समोरून एकच उत्तर येते की तुम्ही दारिद्र्य रेषेत नाही. दारिद्र्य रेषेत कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे याचा अधिकार ग्रामसभेला आहे. मात्र गरजू गरिबांसाठी गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील शेकडो कुटुंबे दारिद्र्य रेषेखालील योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. (प्रतिनिधी) त्यावेळेस डोळ्यातून अश्रू येतात...एखाद्या कुटुंबातील सदस्य आजाराने त्रस्त झाल्यावर मोठ्या औषधोपचाराची गरज भासते. लाखो रुपयाचे बिल भरायचे कसे असा प्रश्न पडतो. मग दारिद्र्य रेषेत समावेश असेल तर नशिब नाहीतर जमीन, घरदार विकण्याशिवाय पर्याय उरत नाही. असे प्रसंग आले आहेत. तालुका समन्वय समितीच्या बैठकीत विषय उपस्थित झाला. त्यादरम्यान नवीन नावे समाविष्ट करण्याबाबत २०१५ मध्ये ८५ दिवसांचा कार्यक्रम झाला. ही बाब उघड झाली. आमदार देसाई यांनी, ‘मलाच याची कल्पना नाही. तर सर्वसामान्य लोकांना कसे कळणार?,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.२०१५ मध्ये दारिद्र्य रेषेबाबत अपील कार्यक्रम राबविण्यात आला होता. ८५ दिवसांच्या या कार्यक्रमात ३५० लोकांनी दारिद्र्य रेषेखाली समावेश करावा, अशी अर्जाद्वारे मागणी केली होती. ज्या लोकांचे अपील नाकारण्यात आले. त्यांना प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.- के. एस. गौतम, गटविकास अधिकारी