शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पाण्याअभावी पिके पडली पिवळी

By admin | Updated: March 8, 2017 23:31 IST

कोरेगाव उत्तर : वसनेच्या पहिल्या टप्प्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी

वाठार स्टेशन : कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सध्या वाढत्या उन्हामुळे जमिनीतील पाणी पातळी खालावत चालली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण झाल्याने या परिसरातील उसाची पिके पाण्याअभावी करपून जाऊ लागली आहेत. या पिकांना आठवड्यात पाणी उपलब्ध झाले नाही तर या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासाठी वसना उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात हक्काची कोणतीच पाणी योजना नसल्याने या भागातील शेतकरी ग्रामस्थांना पाणीटंचाईशी नेहमीच संघर्ष करावा लागत आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार या भागात प्रमाणापेक्षा पावसाचे प्रमाण कमी आहे. या ठिकाणची संपूर्ण शेती व्यवस्था ही विहिरीवरील पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांत या परिसरात झालेल्या कूपनलिकांमुळे या संपूर्ण भागाचे पाणी २५० ते ३५० स्के. फुटापर्यंत खाली गेले आहे. या भागातील वाठार स्टेशन सारख्या गावास कायमस्वरुपी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी संघर्ष करूनही या भागाला अद्याप कोणत्याही प्रकारचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही.चालू वर्षी मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढली असून, विहिरींमधील पाणीसाठा कमी होत चालला आहे. यामुळे देऊर परिसरातील उसाचे पीक आता धोक्यात आले आहे. पिके वाचविण्यासाठी वसनेच्या पहिल्या टप्प्यातून पाणी सोडले तर या भागची पीक परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. (वार्ताहर)