शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

पूजा चव्हाण प्रकरणी संवेदनशीलपणे निर्णय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST

सातारा : ‘माणूस दोषी आहे का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच; पण राजकीय व्यवस्थेने पूजा चव्हाण प्रकरणात संवेदनशीलपणे निर्णय ...

सातारा : ‘माणूस दोषी आहे का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच; पण राजकीय व्यवस्थेने पूजा चव्हाण प्रकरणात संवेदनशीलपणे निर्णय घेणे गरजेचे आहे,’ असे मत भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलेल, असा दावाही त्यांनी केला.

सातारा येथे पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले, तर सांगलीला जात असताना तावडे हे साताऱ्यात काहीवेळ थांबले होते. यावेळी जिल्हा भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, सुनील कालेकर यांच्यासह किशोर गोडबोले, मनीषा पांडे, रिना भणगे, विक्रांत भोसले आदी उपस्थित होते.

विनोद तावडे यांनी सातारा शहरातील पक्षकार्याची माहिती घेतली. पक्ष संघटन वाढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर बुथ संपर्क अभियान चांगल्या पद्धतीने पूर्ण करून बुथ कार्यकर्ता मजबूत करण्याचा कानमंत्रही दिला.

दरम्यान, तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाजपच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांना एखादा प्रदेश मिळतो तसा मला हरियाणा मिळाला आहे. आता भाजप आणि आमच्यासमोर प्रमुख टार्गेट आहे ते पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकणं. खऱ्या अर्थाने आम्ही तिथे मोठी ताकद लावली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही १२१ तर तृणमूल काँग्रेस १६७ विधानसभा मतदारसंघात आघाडीवर होते. हा फरक कसा भरून काढता येईल, यावर आमचे काम सुरू आहे. यावेळी बंगालमध्ये भाजपचे कमळ फुललेले दिसेल.

पूजा चव्हाण प्रकरणात मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही, हा दोष सरकारचा का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर तावडे म्हणाले, ‘अशा प्रकरणात राजकीय व्यवस्था संवेदनशील असायला पाहिजे. संवेदनशीलपणे निर्णय घेणे गरजेचे आहे, ते या सरकारने केले पाहिजे, असे सामान्य जनतेला वाटते. माणूस दोषी का निर्दोष हे वेळेत सिद्ध होईलच.’

पुस्तकांचं गाव भिलारविषयी विनोद तावडे म्हणाले, ‘पुस्तकांचं गाव हे सातारा तसेच महाराष्ट्राचं भूषण आहे. त्या गावासंबंधी अ‍ॅक्टिव्हिटी व्हायला पाहिजेत, त्या झाल्या नाहीत. मला अपेक्षा आणि आशा आहे की, कोरोनानंतर आता पुस्तकांचं गाव पुन्हा जोराने सुरू होईल. शासनही त्याला नक्कीच मदत करेल.’

चौकट :

जिल्हा बँकेबाबत चंद्रकांतदादा, उदयनराजे ठरवतील...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप आपले पॅनल उभा करणार का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर तावडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले हेच यावर निर्णय घेतील, असे स्पष्टपणे सांगितले.

................................................