शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
2
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
3
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
6
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
7
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
8
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
9
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
10
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
11
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
13
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
14
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
15
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
16
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
17
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
18
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
19
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
20
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?

डाळिंबाचे दर कोसळले; शेतकरी कर्जबाजारी

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

फलटण तालुका : विकत पाणी घेऊन जगविल्या होत्या बागा

नीलेश सोनवलकर --दुधेबावी -दिवाळीपासून डाळिंबांचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. फलटण तालुक्यात तर विकत पाणी घेऊन बागा जगविल्या होत्या. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दिवाळीपूर्वी १६० ते १८० रुपये किलो दराने डाळिंब विकले जात होते. परंतु दिवाळीपासून सर्व व्यापारी सणासाठी गावी गेले होते. परिणामी सर्व बाजार ठप्प झाला होता. त्यानंतर चेन्नई (तामिळनाडू) येथे मुसळधार पाऊस झाल्याने तेथे जाणारा माल पूर्णत: थांबला. त्यामुळे डाळिंबाच्या दरावर मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीला डाळिंबाचे दर पडल्याने सुमारे ३० ते ४० रुपयापर्यंत खाली आले आहेत. त्यामध्ये एका कॅरेटमागे ६० रुपये आडत, हमालीचे घेतले जात आहेत. तसेच मालवाहतूक करणारे एका कॅरेटमागे फलटण ते मुंबईसाठी ७० रुपये घेतात. डाळिंबांची प्रतवारी करण्यासाठी कामगार ठेवावे लागतात. त्यांना ४०० रुपये दिवसाची हजेरी द्यावी लागते. तसेच एका कॅरेटमध्ये सुमारे २२ किलो डाळिंब बसतात. त्यामुळे दर पडला तर सर्व खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हातामध्ये एकदम थोडी रक्कम राहत आहे. बाग पोसताना शेतकऱ्यांना औषधाचा व मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. दुष्काळी भागात विकत पाणी घेऊन बागांना द्यावे लागत आहे. आता डाळिंबांचे दर पडल्याने व्यापारीही बागांमध्ये येत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बाजार समितीमध्ये अधिकृतरीत्या काम करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन तो मुंबई, पुणे तसेच इतर राज्यात व देशात पाठवितात. तसेच हा माल बाहेर देशात पाठविला की तो एक्स्पोर्ट केला असे म्हणतात. परंतु एक्स्पोर्ट करण्यासाठीची जी फळे असतात ती बागेतील सर्वोत्कृष्ट असतात. त्या फळांचा दरही मोठ्या प्रमाणात असतो. एक्स्पोर्ट होणारा माल हा मोजक्या शेतकऱ्यांकडे असतो.डाळिंबांचे दर पडल्याने शेतकरी संकटात आला असून, काही शेतकऱ्यांचा तर बागेसाठी करण्यात आलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे डाळिंब बागधारक शेतकरी नाराजीच्या छायेत आहेत.- प्रशांत भीवरकर, धूळदेवडाळिंब पिकासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी उपाययोजना करावी, अन्यथा शेतकरी फळपीक घेणे बंद करण्याच्या मार्गावर आहेत. - अजित आडके, ग्रामस्थ दुधेबावी