शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाचे दर कोसळले; शेतकरी कर्जबाजारी

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

फलटण तालुका : विकत पाणी घेऊन जगविल्या होत्या बागा

नीलेश सोनवलकर --दुधेबावी -दिवाळीपासून डाळिंबांचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. फलटण तालुक्यात तर विकत पाणी घेऊन बागा जगविल्या होत्या. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दिवाळीपूर्वी १६० ते १८० रुपये किलो दराने डाळिंब विकले जात होते. परंतु दिवाळीपासून सर्व व्यापारी सणासाठी गावी गेले होते. परिणामी सर्व बाजार ठप्प झाला होता. त्यानंतर चेन्नई (तामिळनाडू) येथे मुसळधार पाऊस झाल्याने तेथे जाणारा माल पूर्णत: थांबला. त्यामुळे डाळिंबाच्या दरावर मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीला डाळिंबाचे दर पडल्याने सुमारे ३० ते ४० रुपयापर्यंत खाली आले आहेत. त्यामध्ये एका कॅरेटमागे ६० रुपये आडत, हमालीचे घेतले जात आहेत. तसेच मालवाहतूक करणारे एका कॅरेटमागे फलटण ते मुंबईसाठी ७० रुपये घेतात. डाळिंबांची प्रतवारी करण्यासाठी कामगार ठेवावे लागतात. त्यांना ४०० रुपये दिवसाची हजेरी द्यावी लागते. तसेच एका कॅरेटमध्ये सुमारे २२ किलो डाळिंब बसतात. त्यामुळे दर पडला तर सर्व खर्च जाऊन शेतकऱ्यांच्या हातामध्ये एकदम थोडी रक्कम राहत आहे. बाग पोसताना शेतकऱ्यांना औषधाचा व मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. दुष्काळी भागात विकत पाणी घेऊन बागांना द्यावे लागत आहे. आता डाळिंबांचे दर पडल्याने व्यापारीही बागांमध्ये येत नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बाजार समितीमध्ये अधिकृतरीत्या काम करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन तो मुंबई, पुणे तसेच इतर राज्यात व देशात पाठवितात. तसेच हा माल बाहेर देशात पाठविला की तो एक्स्पोर्ट केला असे म्हणतात. परंतु एक्स्पोर्ट करण्यासाठीची जी फळे असतात ती बागेतील सर्वोत्कृष्ट असतात. त्या फळांचा दरही मोठ्या प्रमाणात असतो. एक्स्पोर्ट होणारा माल हा मोजक्या शेतकऱ्यांकडे असतो.डाळिंबांचे दर पडल्याने शेतकरी संकटात आला असून, काही शेतकऱ्यांचा तर बागेसाठी करण्यात आलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे डाळिंब बागधारक शेतकरी नाराजीच्या छायेत आहेत.- प्रशांत भीवरकर, धूळदेवडाळिंब पिकासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना उर्जितावस्था येण्यासाठी उपाययोजना करावी, अन्यथा शेतकरी फळपीक घेणे बंद करण्याच्या मार्गावर आहेत. - अजित आडके, ग्रामस्थ दुधेबावी