शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

टँकरनं पाणी देऊन जगवतोय डाळींबाची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 23:39 IST

बळीराजाला अन्नदाता म्हणून ओळखलं जातं. आयुष्यभर काबाड कष्ट उपसणंच ज्याला ठाऊक... वर्षभर वणवण करून

काळ्याआईची सेवा करूनही जेव्हा थोडंच उत्पन्न मिळतं, तेव्हाही त्याचे पाय जमिनीवरच असतात. किंवा भरमसाठ पीक आलं म्हणून उन्मात करत नाही. हार माणणं त्यांच्या रक्तातच नाही. त्यामुळे दुधेबावी परिसरातील बळीराजा झगडतोय दुष्काळसदृश परिस्थितीशी. वरुणराजानं पाठ फिरविली म्हणून शेती सोडून कशी चालेल. त्यामुळे येथील काही शेतकरी चक्क टँकरचं पाणी आणून पिकं जगविण्यासाठी धडपड करत आहेत.फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील दुधेबावी, वडले, भाडकी खुर्द, भाडळी बुद्रुक, सासकल, तिरकवाडी, नाईकबोमवाडी, मिरढे, शेरेशिंदेवाडी आदी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवायला लागली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जरा चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र, संपूर्ण जून, जुलै, आॅगस्ट महिना कोरडाच गेला. आता केवळ एका सप्टेंबर महिन्यावर आशा उरल्या आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. तसेच फळबागांही मोठ्या प्रमाणात लावल्याने कमी पाण्यावर पीक कसे जगवायचे, हा प्रश्न बळीराजाला सतावत आहे. त्यावर मात करण्यासठी काही शेतकरी पाणी विकत आणून पिकांना देत आहेत. डाळिंबाच्या अनेक बागा मध्यावस्थेत आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे भांडवल आहे. असेच शेतकरी सातशे ते हजार रुपये मोजून सहा हजार लिटर क्षमतेचा टँकर पाणी आणून झाडांना आणून घालत आहेत. फळांचा आकार मध्यम अवस्थेत असल्याने बाग सोडूनही देता येत नाही. काही शेतकऱ्यांनी तर कर्ज काढून डाळिंब पिकासाठी पाणी देत आहेत. त्यातच तेल्या रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी धास्तावला आहे. डाळिंबासाठी सुमारे पाच-सहा दिवसांतून एकदा पाणी घ्यावे लागत आहे. हे पीक सुमारे सहा महिने कालावधीचे असते. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर आहे त्यांचा खर्च वाचत असून, ते लांब-लांबून पाणी आणून पिकांना देत आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे...पाऊस पडला नसल्याने आम्ही चिंतेत आहोत. सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थिक चिंता सतावत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते पाणी विकत आणून पिकांना देत आहेत; मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कर्जे काढून रोपे आणली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गरज आहे, अशी मागणी दुधेबावी सोसायटीचे संचालक शिवाजी सोनवलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.नीलेश सोनवलकर