शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

राजकारण राहूदे जनतेची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:25 IST

सातारा : ‘सर्वसामान्य सातारकर आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शहरासह ...

सातारा : ‘सर्वसामान्य सातारकर आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शहरासह हद्दवाढीतील प्रस्तावित कामे प्राधान्याने मार्गी लावा. त्यात कोणतीही हयगय चालणार नाही. शिवाय सातारा विकास आघाडीत सुरू असलेले गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने एकदिलाने काम करावे,’ अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आघाडीच्या नगरसेवकांची कानउघडणी केली.

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली पालिकेची निवडणूक, कोरोनामुळे लांबलेली सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची बैठक व शहरात दोन दिवस सुरू असलेला उदयनराजेंचा दौरा या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी दुपारी जलमंदिर येथे पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद निशांत पाटील, सभागृह नेत्या स्मिता घोडके, सांस्कृतिक व क्रीडा विभागप्रमुख सुजाता राजेमहाडिक, आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट व आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.

सातारा विकास आघाडीत सुरू असलेल्या राजकारणाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, सातारा शहरातील विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा आहे. पालिकेत येणाऱ्या सर्वसामान्यांची कामे अग्रक्रमाने झालीच पाहिजेत. आघाडीमध्ये दोन-तीन गट पडल्याचे जाणवत आहे. येत्या पालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडी एकसंघ दिसायला हवी. साविआने पाच वर्षांपूर्वी जो वचननामा दिला होता, त्यातील नव्वद टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हीच कामे घेऊन आपण लोकांमध्ये जायचे आहे. त्यासाठी गट-तट बाजूला ठेऊन एकदिलाने काम करावे.

प्रलंबित सर्वसाधारण सभा व रखडलेल्या विकासकामांच्या प्रस्तावावर सह्या होत नसल्याने कामाचा निपटारा होत नाही, अशी तक्रार यावेळी स्मिता घोडके यांनी केली. तेव्हा उदयनराजे यांनी थेट नगराध्यक्ष माधवी कदम यांनाच विचारणा केली. विकासकामांचे प्रस्ताव हे माझ्या परस्परच अंतिम होतात. शिवाय कामांचे प्रस्ताव येताना तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नसतात, सूचक व अनुमोदक यांच्या सह्या नसताना त्यावर सही करताना अडचण होत असल्याचे नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सांगितले. या बैठकीला नगरसेवक वसंत लेवे, संगीता आवळे, सविता फाळके, विशाल जाधव अनुपस्थित होते.

(चौकट)

आम्हाला ग्राह्यचं धरलं जात नाही

प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या साविआच्या बैठकीत नगराध्यक्ष माधवी कदम यांनी खासदार उदयनराजेंपुढे आपली कैफियत मांडली. आजवर कोणती कामे अडवली, कोणत्या फायलींवर सही केली नाही, हे नगरसेवकांनी स्पष्ट करावे, असे त्या म्हणाल्या. मात्र, एकाही नगरसेवकाने साधा शब्द काढला नाही. आम्हाला आता ग्राह्यचं धरलं जात नाही. अनेक कामे मुख्याधिकारीच ठरवतात. त्याची कल्पनाही दिली जात नाही. मग आम्ही कामे कशी करायची? असा प्रश्न नगराध्यक्षांनी उपस्थित केला. यावर उदयनराजेंनी हा प्रकार चुकीचा असून, प्रत्येक कामाची माहिती नगराध्यक्ष, संबंधित नगरसेवक यांना दिलीच पाहिजे, अशा सूचना केल्या.

(चौकट)

अभियंत्यांची बदली करा

या बैठकीत राज्य संवर्गातील इंजिनिअर काम करत नसल्याची तक्रार करण्यात आली. काही अभियंते विरोधकांची कामे करतात आणि प्रत्यक्षात कामाच्या निमित्ताने नगरसेवकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात, अशी थेट तक्रार उदयनराजे समर्थक अशोक घोरपडे यांनी केली. या अभियंत्यांची तत्काळ बदली करण्याची सूचना उदयनराजे यांनी केली.

(चौकट)

अपेक्षापूर्तीचे आव्हान...

पालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवक आता ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले आहेत. स्वत: उदयनराजे भोसले यांनी बैठकांचा धडाका सुरू केला असून, हद्दवाढीत आलेल्या भागाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, असे असले तरी शहरातील भुयारी गटार योजना, महिला स्वच्छतागृह, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण असे अनेक प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे. कास धरणाचे काम जवळपास ९० टक्के झाले असले तरी ते पूर्णत्वास येण्यासाठी आणखी किती कालावधी जाणार, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सातारा विकास आघाडीपुढे आहे.

फोटो : सातारा पालिका