शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

धर्माच्या नावावर एकमेकांना भडकविण्याचे राजकारण

By admin | Updated: August 22, 2015 00:54 IST

राम पुनियानी : अभिवादन सभेत मत व्यक्त

सातारा : ‘जगात कोणत्याही एकाच विशिष्ट धर्मात आतंकवादी जन्माला येत नाही. जगात प्रामुख्याने भारतातील राष्ट्रीय नेत्यांच्या हत्या, या एकाच धर्मातील व्यक्तीने केलेल्या दिसून येणार नाहीत, त्यामुळे या देशात धर्माच्या नावावर नागरिकांना एकमेकांच्या विरोधात भडकविण्याचे राजकारण सुरू आहे,’ असे मत डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले. कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. इरफान इंजिनियर होते. यावेळी नगराध्यक्ष सचिन सारस, विजय मांडके व इतर मान्यवर उपस्थित होते. ‘सांस्कृतिक दहशतवादाचे आव्हान’ या विषयावर पुढे बोलताना डॉ. राम पुनियानी म्हणाले, ‘देशात सध्या सांप्रदायिक राजकारण सुरू झाले आहे. देशातील केवळ ३१ टक्के मते घेऊन केंद्रात सत्तेत आलेले मंत्री धार्मिक भाषा बोलू लागले आहेत. राज्यघटनेच्या जागी भगवद् गीता आणण्याचा मानस केंद्रीयमंत्री व्यक्त करू लागले आहेत. हे दहशतीचे नवे रूप समोर येताना दिसून येत आहे. वास्तविक या देशात धर्माच्या नावावर हिंसा ही खऱ्या अर्थाने इंग्रजानंतर सुरू झाली आहे. इंग्रजांपूर्वी या देशावर कोणा एका राजाचे राज्य नव्हते. छ. शिवाजी महाराज वगळता सर्व राजांची लढाई ही केवळ संपत्तीसाठी होती. शिवाजी महाराज यांची लढाई ही केवळ रयतेच्या कल्याणासाठी होती; परंतु काही लोकांनी चुकीचा इतिहास सांगून देशातील नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. पूर्वी कोणत्याही धर्मातील संत हे नागरिकांना जोडण्याचे काम करीत होते. गौतम बुद्धांनी समतेचा संदेश दिला; परंतु त्यावेळी धर्मगुरूंनी आक्रमण केले आणि समाजात अज्ञान पसरविण्याचे काम सुरू केले. देशातील नागरिकांनी वैज्ञानिक विचार करूच नये, अशी त्या धर्मगुरूंची इच्छा होती व आहे. देशातील राजकीय पक्षांचे अजेंडे पाहिले तर काही पक्षांना धर्मावर आधारित राजकारण करायचे आहेत व तर काहीना वैज्ञानिक विचारांवर राजकारण करायचे आहेत. या देशाला धर्मावर आधारित राजकारण नव्हे, तर वैज्ञानिक व समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारित राजकारण अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारणासाठी धर्माचे कपडे घालणाऱ्यांचे समर्थन न करता या देशातील सर्व धर्मातील ऐक्य अबाधित ठेवणे गरजेचे आहे,’ असेही ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. इरफान इंजिनियर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध पुरोगामी संघटनेतील कार्यकर्ते तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)