शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्यात राजकारणाने फोडले पक्षीय बांध

By admin | Updated: March 1, 2017 23:50 IST

समिकरणे बदलली : राजकीय तत्व चव्हाट्यावर; पक्षीय धोरण खुटीला टांगून जिरवाजिरवीचे राजकारण

खंडाळा : खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान सर्वच पक्षांची मोडतोड झाली आहे. पक्षीय धोरण खुंटीला टांगून व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेपोटी आणि जिरवा जिरवीच्या राजकारणाची खुमखुमी उफाळून आल्यामुळे कोणाचंही वासरू कोणत्याही रानात मोकाटं चरत होतं. आता यात काहींनी बाळसं धरलं तर काहींनी मोकळ्याच उड्या घेतल्यानं अंगावरचं मासही गमावलं. त्यामुळे तालुक्याच्या पक्षीय राजकारणाची दिशाच भरकटली आहे. त्यामुळे राजकीय तत्वे चव्हाट्यावर टांगल्या गेलेल्या खंडाळ्यात भरकटलेल्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का?, असाच प्रश्न सर्वसामान्य खंडाळकरांना पडला आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. खंडाळा तालुक्यात या निवडणुकीत भलतीच समीकरणं उदयास आली. यामध्ये राजकीय पक्षही चांगलेच भरडले गेले. त्यातून तावून सुलाखून कशातरी निवडणुकीचा सामना केला गेला. पण आता निवडणुकीनंतर पुढे काय?, असा यक्ष प्रश्न पक्षांसमोर तसेच कार्यकर्त्यांसमोर ‘आ’वासून उभा आहे.या निवडणुकीत खंडाळा तालुक्यात सर्वाधिक बलाढ्य असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच बंडाळीचा आगडोंब उसळला होता. तीनही जिल्हा परिषद गटात त्या आगीचे भडके उडाले होते. त्याचीच लागण शिवसेनेलाही काही ठिकाणी झाली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या घराचे तुकडे झाले. इच्छुक उमेदवारांनी आपापले भाग वाटून घेतले. तोच त्यांना स्वत:चा बालेकिल्ला वाटू लागला. त्यामुळे टोकाचा संघर्ष उभा करून निवडणुकीच्या मैदानात आपापली फौज उतरवली गेली.राष्ट्रवादीच्या अनेक सेनापतींनी सवतासुभा मांडल्याने आमदार मकरंद पाटील यांचीही काहीकाळ मती गुंग झालेली. पण पराक्रमाच्या जोरावर साम्राज्य उभं करणाराच खरा राजा असतो. याची जाणीव झाल्याने आमदारांनी ‘मिशन खंडाळा मोहीम’ सुरू केली. रात्रीचा दिवस करून सैन्यांची जुळवाजुळव केली. साथ सोडून गेलेल्या सेनापतींचे काही शिलेदार हाताला घेतले. तर राजकारणात कोणीच कायमचा वैरी नसतो. हे ध्यानीमनी धरून विरोधकांनाही ऐनवेळी दिमतीला घेऊन खंडाळ्याच्या गडाचे तीनही बुरुज ताकदीने लढवले. आणि यात अपेक्षीय यशही मिळाले; पण या निवडणुकीत राष्ट्रवादीचा तंबू चांगलाच फाटला होता. ऐन निवडणुकीत नवनवीन धागे जोडून वादळ अडविण्यापुरतं काम झालं. मात्र, आता तोच तंबू पुन्हा ताकदीने, भक्कम बनविण्यासाठी आता कोणकोणते धागे वापरणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडक आणि मजबूत व पक्षनिष्ठ धागे वापरले तरच तोफांचे आवाज ‘मकरंद’मय येतील, ही वस्तुस्थिती आहे.वास्तविक, गेल्या काही महिन्यांत शिवसेनेने तालुक्यात चांगली उभारी घेतली होती. इतर पक्षांतील आवक झाल्याने सेनेची अचूक तीरंदाजी होईल, असे वाटत होते. मात्र, आश्वासक ठिकाणीच फुटीचं ग्रहण लागलं. काही मावळ्यांच्या हाती धनुष्य लागला तर काहींच्या हाती बाण! त्यामुळे लढायचं कसं, असा प्रश्न मैदानात उतारल्यावर लक्षात आला. मात्र, सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी एकही स्थानिक सदस्य दिमतीला नसताना दिलेली लढत आणि मिळवलेली मते चांगल्या कामगिरीचे द्योतक ठरले. हीच काय ती जमेची बाजू. अन्यथा पालकमंत्री आणि उपनेत्यांच्या गेल्या महिन्यात धडाडलेल्या तोफांचे बार मात्र फुसकेच निघाले. असे असले तरी भविष्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेनाच बळ बांधू शकते, ही शक्यताही नाकारता येत नाही.खंडाळ्याच्या माळरानावर निवडणुकीपूर्वी कमळ फुलवायला निघालेल्या मातब्बरांनी ऐनवेळी अपक्ष आघाडी केल्याने कमळ फुलवण्याआधीच कोमेजले. काही ठिकाणी रोपटे लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो निरर्थकच ठरला. (प्रतिनिधी)पूर्वपदावर येण्यासाठी काँग्रेस पक्षाला खंबीर नेतृत्वाची गरज४एकीकडे राष्ट्रवादीची झालेली फाटाफूट विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची ही चांगली वेळ होती. मात्र, राष्ट्रवादीचा पारंपरिक लढतीदार काँग्रेस पुरती झोपली होती. मैदानात सरळ सामना करण्याऐवजी अनेक ठिकाणी त्यांनी तलवारी म्यान केल्या. आपल्यावर नामुष्की नको म्हणून दुसऱ्याच्या छावणीचा आसराही घेतला. जिथे काही निवडक लढले त्यांचीही त्रेधातिरपीट उडाली. पक्षाची हक्काची मते उमेदवारांच्या पारड्यात पडली नाहीत. वास्तविक, खंडाळा नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला आश्वासक नेतृत्वच उभं करता आलं नाही. त्यामुळे उमेदवारांच्यातही मेळ राहिला नाही. पंचायत समितीच्या उमेदवारांना मिळालेली मतंही जिल्हा परिषदेला मिळू शकली नाहीत. काँग्रेसच्या सैन्याची दैना झाल्यानं काहींनी राष्ट्रवादीला मदत केली तर काहींनी अपक्षाला साथ दिली. त्यामुळे काँग्रेसची पुरती वाताहत झाल्याचे दिसून आले. पक्षाला आता पूर्वपदावर येण्यासाठी खंबीर नेतृत्वाची आवश्यकता आहे.