शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

गट-गणाच्या पुनर्रचनेवर राजकीय गणिते

By admin | Updated: August 26, 2016 01:13 IST

इच्छुकांची संख्या वाढली : राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहणार का ?; सत्ताधारी भाजपाचा लागणार कस--उत्सुकता शिगेला , मोर्चेबांधणी

मेढा : जावळी तालुक्यात मेढा नगरपंचायत झाल्याने जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे गट, गण रद्द होतात की काय? याबाबत गट व गण कायम राहिल्याने राजकीय नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरीही गट व गणाची पुनर्रचना कशी होईल, याची राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यात तीन गट व सहा गण असून, सध्या जावळी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मेढा गटात मेढा व केळघर गण, कुडाळ गटात कुडाळ व आनेवाडी गण व हातगेघर गटात हातगेघर व म्हसवे हे गण आहेत. गेल्या निवडणुकीत मेढा गटातील केळघर गणात विद्यमान उपसभापती निर्मला कासुर्डे यांनी कुडाळ गटातील आनेवाडी गणात माजी सभापती सुहास गिरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. परंतु आज मात्र हे दोघेही सत्तेत आहेत. तर कुडाळ गटात शिंदे गटाला धक्का देत दीपक पवार यांनी बाजी मारली. या वस्तुस्थितीचा विचार केला तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस जावळीत पुन्हा उभारी घेत असलेली शिवसेना, माजी आमदार सदाशिव सपकाळ व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा राहण्याच्या प्रयत्नात असलेला भाजपा या साऱ्यांचीच या निवडणुकीत कसोटी लागणार असे सध्या तरी चित्र आहे.तालुक्यात विद्यमान सदस्य आपल्या गण, गटात उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये मेढा गटातून विद्यमान सदस्य अमित कदम तर कुडाळ गटातून दीपक पवार हे इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर पंचायत समिती सदस्यही पुन्हा संधी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.तालुक्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरीही शिवसेना, भाजपाच्या कडव्या आव्हानाला व अंतर्गत गटबाजीला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीला जास्त ताकद लावावी लागणार असल्याची चर्चा आहे. मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजपा सक्रिय झाले आहेत. त्यातूच अमित कदम व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नगरपंचायतीच्या श्रेयवादावरून बिघडलेले संबंध कितपत सुधारलेत याबाबत पदाधिकारी व कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. कारण मेढा नगरपंचायतीच्या श्रेयवादावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर हे दोघे कोठेच एकत्र आल्याचे दिसले नाही.त्यामुळे अंतर्गत धुसफूस असलेली राष्ट्रवादी काँग्रेस, शोधावी लागणारी राष्ट्रीय काँग्रेस, कणखर नेत्याविना मात्र जनतेच्या पाठिंब्यावर सुरू असलेली शिवसेनेची वाटचाल अन् माजी आमदार सदाशिव सपकाळ व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप या साऱ्यांनाच ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेसाठी सर्व काही असेच धोरण राबवून बंडखोर उमेदवार सुहास गिरी व राष्ट्रीय काँग्रेसच्या निर्मला कासुर्डे यांना बरोबर घेऊन सत्तेची गणिते जुळवली. एवढेच नव्हे तर यांना पदेही दिली.यामुळे राष्ट्रवादीचे निष्ठावंत दुखावल्याची चर्चा आहे. त्यातच कुडाळ गटात दिवंगत लालसिंगराव शिंदे घराण्याच्या वारसदार असलेल्या सुनेत्राताई शिंदे व त्यांचे पुत्र सौरभ शिंदे यांची भूमिका अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.तालुक्यातील १ लाख १ हजार ८२८ मतदार संख्या असून, यामध्ये अनुसूचित जातीचे ७०८४ व अनुसूचित जमातीचे १७४९ मतदार आहेत. एकंदरीत जावळीत गट व गणातील पुनर्रचनेच्या निश्चितीनंतर कोण कोठे उभे राहणार, कोणाचे प्राबल्य आहे हे जरी ठरणार असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना, आरपीआय या साऱ्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची, अस्तित्वाची ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. परंतु इच्छूक उमेदवारांची संख्या मात्र वाढली आहे. (प्रतिनिधी)