शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

साताऱ्याच्या खंडणीला पोलिसांनी चाप बसवावा

By admin | Updated: June 15, 2017 22:43 IST

साताऱ्याच्या खंडणीला पोलिसांनी चाप बसवावा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्यावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र खंडणीचे प्रताप वाढल्याने या कामाची निविदा घेण्यासाठी एकही ठेकेदार धजावत नसल्याने बांधकाम विभागाला पुन्हा-पुन्हा निविदा काढावी लागत आहे. खंडणीच्या प्रतापापायी सातारा शहराचा विकास खुंटवायचा का? असा गंभीर आणि वास्तववादी सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला असून खंडणीखोरांना चाप बसवून विकासाला गती देण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात प्रसिध्दी पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, नगरपालिका निवडणुकीच्या काळातच मी साताऱ्यात खंडणीराज चालू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी लोकांना हा विषय पटला नाही. किंबहुना लोकांनी या विषयाकडे फारशे गांभिर्याने पाहिले नाही. परंतु सद्यस्थितीला कोणाचे रुप काय आहे? मुखवट्याआड कोणता चेहरा लपलेला आहे हे स्पष्ट झाले आहे. काही गोष्टी बाहेर आल्या आहेत आणि अनेक गोष्टी बाहेर पडायच्या राहिल्या आहेत. सातारा शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून याठिकाणी उड्डाणपूल मंजूर झाला आहे. मंजुरीला बराच काळ लोटला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त निविदा काढण्याचेच काम चालू आहे. यापुढे काहीही होत नाही याला खंडणीराज कारण आहे हे ही निष्पन्न झाले आहे. वास्तविक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून खंडणीखोरांची नावे थेट पोलिस अधिक्षकांना सांगणे गरजेचे आहे. यानंतर पोलिस अधिक्षकांनीही खंडणीसारखे प्रताप करुन विकासाला खिळ बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. खंडणी हा विषय केवळ बांधकाम विभागापुरता मर्यादीत नाही. बांधकाम विभागासह कृषी विभाग, पाटबंधारे, जलसंधारण यासह अनेक विभागांमध्ये खंडणीराज सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या विकासकामांमध्ये कोणाच्या नावाखाली खंडणी मागितली जाते. कोणामुळे विकासकामे अडवून ठेवली जातात, याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली पाहिजे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनीही खंडणी सारखे प्रताप करुन जनतेसाठीच्या विकासकामांना खिळ घालणाऱ्यांची नावे कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट पोलिस प्रमुखांना सांगितली पाहिजेत. मात्र असे न झाल्याने, दहशत आणि दडपशाहीमुळे खंडणीराज फोफावले आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांनीच ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत. खंडणीखोरांना तुरुंगात डांबले पाहिजे.पोलिसांनी कोणाचीही गय करु नये...शांत आणि शिस्तप्रिय सातारा शहरात खंडणीराज कोणामुळे आणि केव्हापासून सुरु झाले? याचा विचार सुज्ञ सातारकरांनी केला पाहिजे. खंडणी म्हणजे विकासकामांना जडलेला कॅन्सरच आहे. कॅन्सरचा आजार वाढला की उपचारांचा उपयोग होत नाही, तीच परिस्थिती विकासकामांची झाली आहे. विकासकामांना गती देण्यासाठी खंडणी सारख्या गुन्ह्यांचे आॅपरेशन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने खंडणीसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली पाहिजे. विकासकामांना जडलेला खंडणीचा कॅन्सर बळावण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत. कोणाचीही गय न करता ठोस पावले उचलून हा आजार मुळापासून दूर करावा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.