शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

साताऱ्याच्या खंडणीला पोलिसांनी चाप बसवावा

By admin | Updated: June 15, 2017 22:43 IST

साताऱ्याच्या खंडणीला पोलिसांनी चाप बसवावा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्यावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र खंडणीचे प्रताप वाढल्याने या कामाची निविदा घेण्यासाठी एकही ठेकेदार धजावत नसल्याने बांधकाम विभागाला पुन्हा-पुन्हा निविदा काढावी लागत आहे. खंडणीच्या प्रतापापायी सातारा शहराचा विकास खुंटवायचा का? असा गंभीर आणि वास्तववादी सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला असून खंडणीखोरांना चाप बसवून विकासाला गती देण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात प्रसिध्दी पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, नगरपालिका निवडणुकीच्या काळातच मी साताऱ्यात खंडणीराज चालू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी लोकांना हा विषय पटला नाही. किंबहुना लोकांनी या विषयाकडे फारशे गांभिर्याने पाहिले नाही. परंतु सद्यस्थितीला कोणाचे रुप काय आहे? मुखवट्याआड कोणता चेहरा लपलेला आहे हे स्पष्ट झाले आहे. काही गोष्टी बाहेर आल्या आहेत आणि अनेक गोष्टी बाहेर पडायच्या राहिल्या आहेत. सातारा शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून याठिकाणी उड्डाणपूल मंजूर झाला आहे. मंजुरीला बराच काळ लोटला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त निविदा काढण्याचेच काम चालू आहे. यापुढे काहीही होत नाही याला खंडणीराज कारण आहे हे ही निष्पन्न झाले आहे. वास्तविक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून खंडणीखोरांची नावे थेट पोलिस अधिक्षकांना सांगणे गरजेचे आहे. यानंतर पोलिस अधिक्षकांनीही खंडणीसारखे प्रताप करुन विकासाला खिळ बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. खंडणी हा विषय केवळ बांधकाम विभागापुरता मर्यादीत नाही. बांधकाम विभागासह कृषी विभाग, पाटबंधारे, जलसंधारण यासह अनेक विभागांमध्ये खंडणीराज सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या विकासकामांमध्ये कोणाच्या नावाखाली खंडणी मागितली जाते. कोणामुळे विकासकामे अडवून ठेवली जातात, याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली पाहिजे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनीही खंडणी सारखे प्रताप करुन जनतेसाठीच्या विकासकामांना खिळ घालणाऱ्यांची नावे कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट पोलिस प्रमुखांना सांगितली पाहिजेत. मात्र असे न झाल्याने, दहशत आणि दडपशाहीमुळे खंडणीराज फोफावले आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांनीच ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत. खंडणीखोरांना तुरुंगात डांबले पाहिजे.पोलिसांनी कोणाचीही गय करु नये...शांत आणि शिस्तप्रिय सातारा शहरात खंडणीराज कोणामुळे आणि केव्हापासून सुरु झाले? याचा विचार सुज्ञ सातारकरांनी केला पाहिजे. खंडणी म्हणजे विकासकामांना जडलेला कॅन्सरच आहे. कॅन्सरचा आजार वाढला की उपचारांचा उपयोग होत नाही, तीच परिस्थिती विकासकामांची झाली आहे. विकासकामांना गती देण्यासाठी खंडणी सारख्या गुन्ह्यांचे आॅपरेशन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने खंडणीसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई केली पाहिजे. विकासकामांना जडलेला खंडणीचा कॅन्सर बळावण्यापूर्वीच पोलिस प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत. कोणाचीही गय न करता ठोस पावले उचलून हा आजार मुळापासून दूर करावा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.