शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

पोलीस भरतीला उच्चशिक्षितांचा ओढा : कॉन्स्टेबलच्या लाइनीत बीई पासही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:55 IST

सातारा : गलेलठ्ठ पगार असल्यामुळे जो तो आयटी क्षेत्राकडे वळत असतो. सध्या आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले असताना दुसरीकडे मात्र अंगात खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न हेच आयटी अभियंते

ठळक मुद्देएमएससी, बीएससी, बीएड झालेल्या युवकांचाही समावेश

दत्ता यादव।सातारा : गलेलठ्ठ पगार असल्यामुळे जो तो आयटी क्षेत्राकडे वळत असतो. सध्या आयटी क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले असताना दुसरीकडे मात्र अंगात खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न हेच आयटी अभियंते पाहत असल्याचे दिसून येत आहे. सातारा येथे सुरू असलेल्या पोलीस भरतीला १३ अभियंते आणि एमएस्सी, बीएड, बीएस्सी, एमएड असे उच्च शिक्षण झालेले कितीतरी युवक आल्याचे पाहायला मिळत आहे.

येथील पोलीस परेड मैदानावर पोलीस भरती सुरू आहे. या भरतीला विविध ठिकाणांहून पाच हजारांहून अधिक मुले-मुली आले आहेत. यातील काही मुलांशी ‘लोकमत’ टीमने संवाद साधला असता अनेकजण उच्चशिक्षित असल्याचे दिसून आले. निमशासकीय नोकरीमध्ये स्पर्धा आणि स्थिरता नसल्यामुळे अनेकजण शासकीय नोकरी मिळण्यासाठी धडपडत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. फलटण येथील मंगेश जाधव हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. पुण्यामध्ये त्याने दोन वर्षे नोकरी केली. मात्र, त्याला यात फारसी गोडी लागली नाही.

आपण एमपीएसीद्वारे अधिकारी व्हावे, असे त्याला वाटू लागले. त्यामुळे त्याने पुण्यातील जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या मंगेश एमपीएसीचा अभ्यास करतोय. परंतु अधिकारी होण्यापूर्वी पोलिसांत भरती व्हायचा निर्धार त्याने केलाय.कोरेगाव येथील सोपान तरटे हा युवकही मॅकेनिकल डिग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्याला खाकी वर्दीचा प्रचंड लळा आहे. आयुष्यात पैसा येतो, जातो. परंतु स्वत:ची काहीतरी ओळख असावी आणि यातून समाजकारण व्हावे, हा हेतू ठेवून मी पोलीस खात्याकडे आकर्षित झालो, असल्याचे तो सांगतो. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या वाईच्या मिलिंद सराटेचे मात्र, या उलट मत आहे.

बेरोजगारी वाढत असून, शासकीय नोकरीला प्राध्यान्य आहे, त्यामुळेच मी पोलीस भरतीला आलो असल्याचे त्याने सांगितले. खंडाळ्याती मानसी भोईटे, प्रियांका भोसले, वैशाली गायकवाड, अनुजा माळी, प्राजक्ता डोईफोडे, मीनल डोईफोडे, अपूर्वा गायकवाड या मुलींमध्येही कोणी बीएससी, बीएड झाल्या आहेत. स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाला आर्थिक हातभार मिळेल, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या पोलीस भरतीला आल्या आहेत.शिक्षण सांगण्यास कमीपणा..आपण शिक्षण खूप घेतलं. परंतु आपल्या मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून अनेकांनी पोलीस भरतीचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून आले. शिक्षण घेऊन काहीच उपयोग झाला नसल्याची खंतही पोलीस भरतील आलेल्या अनेक युवकांच्या बोलण्यातून जाणवत होती. त्यामुळे अनेक युवकांना स्वत:चे शिक्षण सांगण्यास कमीपणा वाटत होता.