शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस पाटील भरतीला न्यायालयात आव्हान

By admin | Updated: March 28, 2016 23:57 IST

जनहित याचिका दाखल करणार : सामाजिक संघटनांसह अनुत्तीर्ण परीक्षार्थी उतरले रस्त्यावर

कऱ्हाड : येथील पोलिस पाटील पदाच्या भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत सामाजिक संघटनांनी आता न्यायालयाचा रस्ता धरण्याची तयारी सुरू केली आहे. या भरतीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले परीक्षार्थिही संघटनांबरोबर असून, न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा सुधारक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत घोडके व परीक्षार्थिंनी दिली. परीक्षेतील उत्तीर्ण, अनुत्तीर्ण उमेदवारांची यादी आठ दिवसांत प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.जिल्हा सुधारक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने व अनुत्तीर्ण पोलिस पाटील भरतीतील उमेदवारांतर्फे सोमवारी तहसीलदार राजेंद्र शेळके व प्रांताधिकारी किशोर पवार यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी पवार यांनी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण उमेदवारांची तोंडी व लेखी परीक्षार्थिची यादी दोन दिवसांत जाहीर करतो, असे सांगितले. यावेळी दत्ताजी खुडे, दीपक खुडे, कृष्णत यादव, योगेश यादव, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, रविराज देसाई, संदीप कुंभार आदींसह नारायणवाडी, आटके, चौगुलेमळा, काले, अंतवडी, किरपे, अकाईचीवाडी, कुसूर या गावांतील उमेदवार उपस्थित होते.शासनाने २० ते २३ मार्च या कालावधीत लेखी व तोंडी परीक्षा पोलिस पाटील भरतीच्या घेतल्या. त्यामध्ये लेखी परीक्षेचा निकाल २४ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान जाहीर केला. घेण्यात आलेल्या पोलिस पाटील भरतीतील लेखी व तोंडी परीक्षेतील परीक्षार्थिंच्या उत्तर पत्रिका कोणत्याही कारणाने नष्ट करण्यात येऊ नये, याची दखल घेण्यात यावी. कायदेशीर गोष्टी लक्षात घेण्यापूर्वी शासनाने जाहीर केलेल्या पोकळ व अपूर्ण निकालाबाबत जिल्हा सुधारक सामाजिक संस्था ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. करण्यात आलेली भरती प्रक्रिया पूर्णत: रद्द करून फेर इनकॅमेरा लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. याबाबत शासनाने लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी जिल्हा सामाजिक विकास संस्थेतील पदाधिकारी व पोलिस पाटील भरतीतील अनुत्तीर्ण उमेदवारांनी केली आहे. (प्रतिनिधी)तहसीलदारांपुढे मांडली अनुत्तीर्ण उमेदवारांनी कैफियतदहा ते बारा गावांतील अनुत्तीर्ण झालेल्या पोलिस पाटील भरतीतील उमेदवारांनी सोमवारी तहसील कार्यालयात येऊन आपली कैफियत मांडली. यावेळी चोवीसहून अधिक अनुत्तीर्ण उमेदवारांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या केबिनपुढे गर्दी केली होती.जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले निवेदन सोमवारी दुपारी बारा वाजता तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर पोलिस पाटील भरतीतील अनुत्तीर्ण उमेदवारांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.या आहेत मुख्य मागण्या..जाहीर करण्यात आलेल्या पोलिस पाटील भरतीमध्ये नेमणूक झालेल्या परीक्षार्थिंच्या यादीबरोबर अनुत्तीर्ण व उत्तीर्ण परीक्षार्थिंची तोंडी व लेखी परीक्षेचे गुण प्रसिद्ध केले नाही. शासनाच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रकारच्या भरती प्रक्रियेमध्ये तोंडी व लेखी हे गुण एकत्रित करून त्याचे मूल्यमापन शासनाने ठरविलेल्या कायद्याच्या उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण परीक्षार्थी ठरविला जातो. मात्र, याप्रमाणे करण्यात आलेले नाही.तसेच उत्तीर्ण-अनुत्तीर्ण परीक्षार्थिंची गुणयादी निकालासोबत जाहीर करावयाची नाही, असे काही राज्य शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळविले होते का?कायद्याच्या व शासनाच्या कोणत्या नियमावलीप्रमाणे उत्तीर्ण व अनुत्तीर्ण परीक्षार्थिंचे गुण जाहीर न करता, फक्त उत्तीर्ण परीक्षार्थिंचे परीक्षा बैठक क्रमांक, गावाचे नाव, जात प्रवर्ग व परीक्षार्थिंचे नाव याच का जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचे स्पष्टीकरण द्यावे.अनुत्तीर्ण उमेदवारांच्या आंदोलनात संघटनांची उडीकऱ्हाड पोलिस पाटील भरतीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आपल्यावर भरतीनिवड प्रक्रियेदरम्यान अन्याय झाला असल्याचे सांगितले जात आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत त्यांच्याकडून आता तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे न्याय मागीतला जात असताना आता यांच्या आंदोलनात सामाजिक संघटनांनी देखील उडी घेतली आहे.