शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

पोलिसांच्या सोबतीला आता माजी सैनिक !

By admin | Updated: February 12, 2017 22:31 IST

विशेष दर्जा मिळणार: जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेसाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी माजी सैनिकांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निवेदनाद्वारे केले आहे. या माजी सैनिकांना या काळात विशेष पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात येणार आहे.सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दि. २१ रोजी मतदान तर २३ रोजी मतमोजणी होणार आहे. एकावेळी ही प्रक्रिया संपूर्ण राज्यात होणार असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. सध्या उपलब्ध असणारे पोलिस बळ कमी पडणार असल्याने या कामासाठी माजी सैनिकांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. जे माजी सैनिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक असतील त्यांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लवकरच आपल्या जवळच्या पोलिस ठाण्यात नोंदवावे. याचबरोबर इच्छुक माजी सैनिकांनी पोलिस नियंत्रण कक्ष आणि जिल्हा विशेष शाखा येथे संपर्क साधावा.माजी सैनिकांनी आजपर्यंत देशाची सेवा अत्यंत उत्कृष्ठपणे बजावली असून, निवडणूक प्रक्रियेतील त्यांचा सहभागही देशसेवेचाच एक भाग आहे. यामुळे माजी सैनिकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही निवेदनात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. या संघटनेचे सुमारे १०० च्या आसपास सदस्य या काळात पुन्हा पोलिस बंदोबस्तात सहभागी होणार असल्याची माहिती एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)पोलिस पाटलांनाही आवाहन सातारा तालुक्यातील निवडणूक खासदार आणि आमदार गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. या काळात एखाद्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती पोलिसांना तत्काळ मिळावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या इतर घटना आणि घडामोडींची माहिती तत्काळ मिळावी, यासाठी सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी शुक्रवारी सातारा तालुक्यातील पोलिस पाटलांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व पोलिस पाटलांनी २३ पर्यंत गाव सोडून इतरत्र न जाण्याच्या सूचना केल्या.