शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

पोलिस सुस्त..ग्रामस्थ सतर्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:24 IST

कवठे : वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सुरूर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असतानाच

ठळक मुद्दे. ग्रामसभेतील नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना जाणून घेऊन पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले.पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे गोरगरीब जनतेला वेठीस धरले जात आहे. असा आरोपकाही लोकांना हाताशी धरून गुन्हे दाखल केल्याचा आरोप

कवठे : वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सुरूर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असतानाच शुक्रवारी चोरीच्या संशयांवरून एकाला ग्रामस्थांनी पकडले. एवढेच नव्हे तर ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांनी गावाशेजारील वसाहत हटविण्याचीही मागणी केली. यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरूर येथील भूषण हेमंत चव्हाण यांच्या घराचा छत उचकटून गुरुवारी रात्री जक्कल काळेने घरात प्रवेश केला. दहा तोळ्याचे दागिने घेऊन तो जात असतानाच घरातील लोक जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता ग्रामस्थ गोळा झाले. त्यांच्या मदतीने जक्कल रंग्या काळेला पकडून बेदम चोप देऊन भुर्इंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, सुरूर परिसरात अनेकदा चोºया होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी अनेक वेळा भुर्इंज पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांकडून काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पोलिसांच्या कामचुकारपणामुळे सुरूर ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यावर काहीतरी तातडीने तोडगा निघालाच पाहिजे, अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी ग्रामसभा बोलाविली. यावेळी वाईचे उपविभागीय अधिकारी आनित टिके, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनाही या ग्रामसभेला बोलविण्यात आले.

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सुरूर परिसरात होत असलेल्या चोºयांचा पाढाच पोलिस अधिकाºयांसमोर वाचला. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे गोरगरीब जनतेला वेठीस धरले जात आहे. असा आरोपही यावेळी करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावाशेजारी वसलेली वसाहत हटविण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 दमदाटी करून ७० पोती धान्य गोळा !सुरूर गावाशेजारी गेल्या अनेक वर्षांपासून एक वसाहत आहे. शिवारातील पिके, चंदनाची झाडे आणि घरे फोडणे अशा पद्धतीचे अनेक उपद्रवी उद्योग केल्याच्या आरोपावरून या वसाहतीमधील लोकांना पोलिसांनी अटक केली होती. १९९५ साली सुरूर ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे रीतसर कारवाईच्या मागणीसह त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. पण त्यावेळच्या पोलिस प्रशासनाने या जबाबदार गावच्या पदाधिकाºयांवर या वसाहतीमधील काही लोकांना हाताशी धरून गुन्हे दाखल केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकºयांच्या घरी आल्यावर या वसाहतीमधील लोक दारोदारी फिरून अंदाजे ७० पोती धान्य गोळा करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या त्रासाला कंटाळून ग्रामसभा बोलविण्यात आली. ग्रामसभेतील नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना जाणून घेऊन पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले.