शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पोलिस सुस्त..ग्रामस्थ सतर्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:24 IST

कवठे : वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सुरूर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असतानाच

ठळक मुद्दे. ग्रामसभेतील नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना जाणून घेऊन पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले.पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे गोरगरीब जनतेला वेठीस धरले जात आहे. असा आरोपकाही लोकांना हाताशी धरून गुन्हे दाखल केल्याचा आरोप

कवठे : वारंवार चोरीच्या घटना घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सुरूर येथील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत असतानाच शुक्रवारी चोरीच्या संशयांवरून एकाला ग्रामस्थांनी पकडले. एवढेच नव्हे तर ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांनी गावाशेजारील वसाहत हटविण्याचीही मागणी केली. यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरूर येथील भूषण हेमंत चव्हाण यांच्या घराचा छत उचकटून गुरुवारी रात्री जक्कल काळेने घरात प्रवेश केला. दहा तोळ्याचे दागिने घेऊन तो जात असतानाच घरातील लोक जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता ग्रामस्थ गोळा झाले. त्यांच्या मदतीने जक्कल रंग्या काळेला पकडून बेदम चोप देऊन भुर्इंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, सुरूर परिसरात अनेकदा चोºया होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी अनेक वेळा भुर्इंज पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांकडून काहीच हालचाली होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पोलिसांच्या कामचुकारपणामुळे सुरूर ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यावर काहीतरी तातडीने तोडगा निघालाच पाहिजे, अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी ग्रामसभा बोलाविली. यावेळी वाईचे उपविभागीय अधिकारी आनित टिके, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनाही या ग्रामसभेला बोलविण्यात आले.

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सुरूर परिसरात होत असलेल्या चोºयांचा पाढाच पोलिस अधिकाºयांसमोर वाचला. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे गोरगरीब जनतेला वेठीस धरले जात आहे. असा आरोपही यावेळी करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावाशेजारी वसलेली वसाहत हटविण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 दमदाटी करून ७० पोती धान्य गोळा !सुरूर गावाशेजारी गेल्या अनेक वर्षांपासून एक वसाहत आहे. शिवारातील पिके, चंदनाची झाडे आणि घरे फोडणे अशा पद्धतीचे अनेक उपद्रवी उद्योग केल्याच्या आरोपावरून या वसाहतीमधील लोकांना पोलिसांनी अटक केली होती. १९९५ साली सुरूर ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे रीतसर कारवाईच्या मागणीसह त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. पण त्यावेळच्या पोलिस प्रशासनाने या जबाबदार गावच्या पदाधिकाºयांवर या वसाहतीमधील काही लोकांना हाताशी धरून गुन्हे दाखल केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक हंगामातील पिकांचे उत्पादन शेतकºयांच्या घरी आल्यावर या वसाहतीमधील लोक दारोदारी फिरून अंदाजे ७० पोती धान्य गोळा करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या त्रासाला कंटाळून ग्रामसभा बोलविण्यात आली. ग्रामसभेतील नागरिकांच्या तीव्र स्वरूपाच्या भावना जाणून घेऊन पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले.