शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाणंद रस्त्यात नांगरट केल्याने शेतीमाल वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:10 IST

यावेळी सिद्धार्थ कीर्तीकर, भीमराव कीर्तीकर, सयाजी किरत, जितेंद्र किरत, शहाजी किरत, शंकर ताटे, रघुनाथ किरत, चंद्रकांत किरत, अशोक किरत, ...

यावेळी सिद्धार्थ कीर्तीकर, भीमराव कीर्तीकर, सयाजी किरत, जितेंद्र किरत, शहाजी किरत, शंकर ताटे, रघुनाथ किरत, चंद्रकांत किरत, अशोक किरत, प्रमोद किरत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मौजे कवठे गावातील पडीक क्षेत्रातून बौद्ध समाजासह सर्व शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता असून, हा रस्ता मरिआई मंदिराच्या पाठीमागील बाजूस जातो; मात्र गत काही दिवसांपासून जबरदस्ती व दांडगाव्याने पाणंद रस्त्यावरच नांगरट करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक बंद होऊन सर्वांना वेठीस धरण्यात आले आहे. सध्या ऊसतोडी सुरू असून, रस्त्यामुळे वाहतूक करता येत नसल्याने ऊसतोडी बंद झाल्या आहेत. शेकडो एकर क्षेत्र ऊसतोडीअभावी पडून असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ज्यांनी हा रस्ता जबरदस्तीने नांगरट केला आहे, त्यांचा या पाणंद रस्त्याशी कोणताही संबंध नाही; मात्र गत दोन वर्षांपासून दांडगाव्याने सर्वांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बौद्ध समाजातील बांधव व शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मंडलाधिकारी व तलाठी यांनी या जागेची पाहणी करून रीतसर पंचनामा तहसीलदारांकडे दिला आहे; मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उंब्रज पोलीस ठाणे यांना रितसर निवेदन देण्यात आले आहे.

- चौकट

ऊस गळतीला न गेल्यास भरपाई द्यावी!

पाणंद रस्ता वाहतुकीसाठी खुला करून या रस्त्यावर कोणताही संबंध नसताना दांडगाव्याने नांगरट करून रस्ता बंद केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांचा ऊस गळीताला न गेल्यास संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी. रस्ता खुला करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

फोटो : ११केआरडी०२

कॅप्शन : कवठे, ता. कऱ्हाड येथील पाणंद रस्त्यावर नांगरट केल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.