शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

चांदकमधून चक्क शेततळेच चोरीला !

By admin | Updated: May 6, 2016 01:28 IST

शेतकरीही लाभापासून वंचित : कृषी विभागाने दिलेले शेततळे संबंधित जागेवर नाहीच

भुर्इंज : चांदक, ता. वाई येथे कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत खोदण्यात आलेले शेततळे चोरीला गेले की काय? असा प्रश्न पडला आहे. ज्या गटनंबरमध्ये आणि ज्या शेतकऱ्याच्या नावावर कृषी विभागाने शेततळ्याची लाखांची रक्कम खर्च केली आहे. त्या गटनंबरमध्ये शेततळेही नाही आणि त्या शेतकऱ्यालाही या शेततळ्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेततळे नेमके गेले कुठे? आणि लाखातील रकमेवर हात मारणाऱ्या साखळीमध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकरी हिताच्या योजनांना प्राधान्य देत असून, ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वकांक्षी योजना त्यापैकी एक मात्र, अधिकारी गावातील काहींना हाताशी धरून योजनांचा निधी भलतीकडेच कसा वळवतात याचे खळबळजनक उदाहरण चांदक येथे पाहावयास मिळाले आहे. चांदक येथील शेतकरी विश्वास महादेव भिलारे यांना शेततळे मंजूर झाले होते. त्यांच्या शेताचा गट क्र. ९५४ मध्ये शेततळे खुदाईस परवानगी मिळाली होती. मात्र, भिलारे यांच्या मालकीच्या संपूर्ण शेतात कोठेही शेततळे खोदले गेले नाही. मात्र सरकार दरबारी घडले ते भलतेच. भिलारे यांच्या गट नं. ९५४ मध्ये शेततळे खोदल्याची कागदपत्रे रंगली आणि शासनाच्या तिजोरीतून १ लाख ५२ हजार १६० रुपयांची खर्चीही पडली.गट नं. ९५४ सह विश्वास भिलारे यांच्या मालकीच्या संपूर्ण शेतात कोठेही शेततळे खोदले गेले नाही. मात्र, सरकार दरबारी आणि कागदोपत्री मात्र ते शेततळे अस्तित्वात आहे, असे असेल तर शेततळे चोरीला गेले की काय? असा प्रश्न परिसरातील जनतेला सतावत आहे.विश्वास भिलारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या शेतात शेततळेच नाही, असे सांगून याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासनाच्या चांगल्या योजना कोण-कोणाच्या फायद्यासाठी वाकवतंय, तुडवतंय स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर करतंय? या प्रकरणी चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाने संबंधित विभागाची लक्तरे चव्हाट्यावर आली असून, या कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)