शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चांदकमधून चक्क शेततळेच चोरीला !

By admin | Updated: May 6, 2016 01:28 IST

शेतकरीही लाभापासून वंचित : कृषी विभागाने दिलेले शेततळे संबंधित जागेवर नाहीच

भुर्इंज : चांदक, ता. वाई येथे कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत खोदण्यात आलेले शेततळे चोरीला गेले की काय? असा प्रश्न पडला आहे. ज्या गटनंबरमध्ये आणि ज्या शेतकऱ्याच्या नावावर कृषी विभागाने शेततळ्याची लाखांची रक्कम खर्च केली आहे. त्या गटनंबरमध्ये शेततळेही नाही आणि त्या शेतकऱ्यालाही या शेततळ्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेततळे नेमके गेले कुठे? आणि लाखातील रकमेवर हात मारणाऱ्या साखळीमध्ये कोणा-कोणाचा समावेश आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन शेतकरी हिताच्या योजनांना प्राधान्य देत असून, ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वकांक्षी योजना त्यापैकी एक मात्र, अधिकारी गावातील काहींना हाताशी धरून योजनांचा निधी भलतीकडेच कसा वळवतात याचे खळबळजनक उदाहरण चांदक येथे पाहावयास मिळाले आहे. चांदक येथील शेतकरी विश्वास महादेव भिलारे यांना शेततळे मंजूर झाले होते. त्यांच्या शेताचा गट क्र. ९५४ मध्ये शेततळे खुदाईस परवानगी मिळाली होती. मात्र, भिलारे यांच्या मालकीच्या संपूर्ण शेतात कोठेही शेततळे खोदले गेले नाही. मात्र सरकार दरबारी घडले ते भलतेच. भिलारे यांच्या गट नं. ९५४ मध्ये शेततळे खोदल्याची कागदपत्रे रंगली आणि शासनाच्या तिजोरीतून १ लाख ५२ हजार १६० रुपयांची खर्चीही पडली.गट नं. ९५४ सह विश्वास भिलारे यांच्या मालकीच्या संपूर्ण शेतात कोठेही शेततळे खोदले गेले नाही. मात्र, सरकार दरबारी आणि कागदोपत्री मात्र ते शेततळे अस्तित्वात आहे, असे असेल तर शेततळे चोरीला गेले की काय? असा प्रश्न परिसरातील जनतेला सतावत आहे.विश्वास भिलारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या शेतात शेततळेच नाही, असे सांगून याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासनाच्या चांगल्या योजना कोण-कोणाच्या फायद्यासाठी वाकवतंय, तुडवतंय स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर करतंय? या प्रकरणी चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाने संबंधित विभागाची लक्तरे चव्हाट्यावर आली असून, या कारभाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)