शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याच्या जन्मादिवशी झाडे लावून जीवनाचेही ‘सार्थक’

By admin | Updated: May 10, 2017 22:44 IST

अनोखा आनंदोत्सव : व्यापाऱ्याने हिकमतीने केले वृक्षांचे संवर्धन

सचिन काकडे ।  -लोकमत न्यूज नेटवर्क --सातारा : घरात नवा ‘पाहुणा’ आल्यानंतर कोणाच्याही आनंदाला पारावर उरत नाही. मग ती मुलगी असो, की मुलगा. नव्या पाहुण्याचा जन्मोत्सव जो तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. साताऱ्यात राहणाऱ्या हरिनारायण धोंडिराम कासट यांनीही भावाला मुलगा झाल्यानंतर याचा आनंद आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पुतण्याच्या जन्मादिवशी त्यांनी आपल्या अंगणात बदामाची चार झाडे लावली आणि ती जगवलीही. आज या झाडांना एक तप पूर्ण झालं आहे.वृक्षसंपदेचे जतन करणे ही काळाची गरज आहे. मात्र, धावपळीच्या युगात आज कोणालाही या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र, सातारा येथील लोखंंडे कॉलनीत राहणारे हरिनारायण कासट याला अपवाद आहे. त्यांनी २४ वर्षांपूर्वी लावलेले नारळाचे झाड व १२ वर्षांपूर्वी लावलेली बदामाची झाडे आज डामडौलात उभी आहेत.बारा वर्षांपूर्वी त्यांच्या भावाला मुलगा झाला. घरातील सर्वांनाच याचा मोठा आनंद झाला. मात्र, आपण वेगळ्या पद्धतीने पुतण्याच्या जन्मोत्सव साजरा करायचा असा निर्धार हरिनारायण कासट यांनी केला. त्यानुसार त्यांनी बदामाची चार झाडे आपल्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत लावली आणि त्यांचे संवर्धनही केले. हरिनारायण कासट यांच्यासह त्यांच्या तिन्ही भावंडांनी, सुना व मुलांनी या झाडांना पाणी घालून त्यांना हिकमतीने जगविले. आज चारपैकी बदामाची तीन झाडे २० फुटाची झाली असून, या झाडांचे आणि कासट कुटुंबाचे आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.२४ वर्षांच्या नारळामुळे परस्परांतील स्नेह वृद्धींगत हरिनारायण कासट यांना झाडे लावणे अन् त्यांचे संवर्धन करण्याची पूर्वीपासूनच आवड आहे. आपल्या घराशेजारी त्यांनी १९९४ मध्ये नारळाचे झाड लावले आणि त्याला वाढवलेलही. नारळाचे झाड आज २४ वर्षांचे झाले आहे. नारळ हे मानाचे फळ आहे. घरात कोणीही आले की त्यांचा पाहुणचार घरातील नारळाने केला जातो. त्यानिमित्ताने परस्परांमधील स्नेह वृध्दींगत होतो असे कासट परिवाराचे म्हणणे आहे.आम्ही मुलगी अथवा मुलगा असा भेदभाव कधीच केला नाही आणि मानतही नाही. घरी दोन मुलींचा जन्म झाला आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा झाडे लावून त्यांचे संगोपन करणार आहे. पुतण्याच्या जन्मावेळी लावलेली झाडे आज मोठी झाली आहेत. झाडांचे आणि त्याचे वय एकच आहे. आम्ही त्याचे नाव ‘सार्थक’ ठेवले आहे. झाडे लावून ती जगविल्याने आम्हाला खऱ्या अर्थाने जीवनाचे ‘सार्थक’ झाल्यासारखे वाटत आहे.- हरिनारायण कासट