शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संगोपन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

वडूज : ‘तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी आणि जीवनातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ...

वडूज : ‘तालुक्यातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी आणि जीवनातील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे हीच काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी केले.

येथील नूतन पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपणप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. कुंडलिक मांडवे, उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला, डॉ. प्रवीण चव्हाण, अभय देशमुख, राजेंद्र पवार, डॉ. संतोष देशमुख, रोहित शहा, संतोष देशमाने, विशाल भागवत आदीची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मांडवे म्हणाले, ‘कोरोना महामारीच्या काळात मानवाला निसर्गाचे महत्त्व समजले असून, आपापली जबाबदारी मानवाने ओळखून दवाखान्यापेक्षा निसर्गातील प्राणवायू अंत्यत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशी झाडे उपयोगी व फल आहारासाठी शरीराला उपयुक्त ठरत आहेत. प्राणवायू देणे हा प्रत्येक झाडाचा गुणधर्म असला तरी इतर भागांमधून अनेक जीवसृष्टीला वाचविण्याचे काम ही देशी झाडे करत असतात.’

यावेळी पोलीस हवालदार राहुल सरतापे, प्रसाद जगदाळे, अनिकेत कुंभार, चेतन गोडसे, अक्षय कुंभार, अलोक महाजन, मनोज कुंभार, अभिजित कर्पे, जितेंद्र पोतदार, कौशिक भागवत, प्रयास संस्थेचे सदस्य व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

प्रयासचा ध्यास ...

संस्थेच्या माध्यमातून प्लॅस्टिक समस्येवर उपाय म्हणून इकोब्रेक्स संकल्पना सुरू केली. प्लॅस्टिक कचरा व ई-कचरा संकलन केंद्र सुरू करून नर्सरीच्या माध्यमातून एक किलो प्लॅस्टिक कचरा दिल्यानंतर एक देशी झाडाचे रोप मोफत, असा उपक्रम हाती घेतला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व येथील लोकांचे जीवनमान निरोगी राहण्यासाठी एकप्रकारे प्रयास संस्थेने ध्यासच घेतला आहे.

फोटो ..

०५वडूज

वडूज येथील नूतन पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करताना पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर व प्रयास संस्थेचे सदस्य उपस्थित होते. ( शेखर जाधव )

-----------------------------------