शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१२ हेक्टर क्षेत्रात ७ हजार २०० वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:50 IST

सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.सातारा : ...

सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.सातारा : वनविभागामार्फत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवथर येथील रोपवन क्षेत्रात वृक्ष लागवड करून १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यातआला.यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, डॉ. बुधाजीराव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील, शिवथरच्या सरपंच मीना गुरव आदी उपस्थित होते.शिवथर येथील वनविभागाच्या १२ हेक्टर क्षेत्रात रविवारी सकाळपासून ७ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, उंबर, बेल, जांभूळ, आवळा, चिंच आदी वृक्षांचा यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रांरभी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. त्यानंतर ते म्हणाले, ‘२०१८ च्या पावसाळ्यात २३ लाख वृक्ष लागवडीचे सातारा जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये १३ लाख २५ हजार वन विभागाचे उद्दिष्ट असून, वन विभागाकडून १७ लाखवृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले.१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्यांच्या कडेला, गायरानानवर, गावठणात वृक्ष लागवड करावी आणि प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करून संवर्धन करावे, असे आवाहनही अंनजकर यांनी यावेळी केले.या कार्यक्रमास शिवथर येथील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.