शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

सातारा-पंढरपूर रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करा : बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:34 IST

दहिवडी : ‘सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी अनेक ठिकाणी बाजूची झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे या ...

दहिवडी : ‘सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी अनेक ठिकाणी बाजूची झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करुन निसर्गाचा समतोल साधावा,’ अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.

सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. केंद्रीय रस्ते विकास मंडळातर्फे या रस्त्याची नव्याने बांधणी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हसवड हद्दीत या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण आहे. तर काही ठिकाणी काम अपूर्ण राहिले आहे. बऱ्याच ठिकाणी छोट्या पुलाची बांधणी अपूर्ण आहे. माण तालुका हद्द ते पंढरपूर या दरम्यानचे काम पूर्ण आहे. तर सातारा ते कोरेगाव दरम्यानचे काम प्रगतीपथावर असून एकूणच या रस्त्यांच्या बांधणीसाठी ठेकेदाराला दिलेला कालावधी संपलेला आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या सर्व झाडांची अक्षरशा कत्तल करण्यात आली. शेकडो वृक्ष विकासाच्या नावाखाली तोडण्यात आले आहेत.

रस्त्याकडेचे वृक्ष तोडताना शासनाने रस्ते विकास मंडळाला वृक्षारोपणाची नवीन नियमावली घालून दिलेली आहे.

सातारा रस्त्यालगत असणाऱ्या व तोडल्या गेलेल्या झाडाझुडपाच्या तीनपट झाडे नव्याने लावण्याची अट आहे. दळणवळण सोयीसाठी महामार्ग महत्त्वपूर्ण ठरला आहे. पूर्वीच्या झाडांची समानता राखण्यासाठी या रस्त्यावर नव्याने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.

सातारा पंढरपूर या १५० किलाेमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा नव्याने वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत होणार आहे. तसेच या रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी तातडीने वृक्षारोपण करावे, अशी मागणीही प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.