शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

झाडांचे संवर्धन सर्वांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:22 IST

मायणी : ‘झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ...

मायणी : ‘झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज आहे. झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हीसुद्धा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य विजयकुमार पिसाळ यांनी केले.

मायणी येथील वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या मायणी-म्हसवड रोड लगत २३ जुलै जागतिक वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या फ्रेंड्स ग्रुपने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब कचरे, वैद्यकीय अधिकारी सुशील तुरुकमाने, तलाठी शंकर चाटे, पोलीस पाटील प्रशांत कोळी, मायणी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश सुरमुख, मायणी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विवेक देशमुख, फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रीय नेटबॉलपटू ओमसाई जाधव, सचिन देशमुख, दादा फडतरे, संस्कार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नीम व उंबर प्रजातींची एकूण १२ झाडांचे वृक्षारोपण मायणी-म्हसवड रस्त्यालगत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मायणी वनविभागाच्या हद्दीमध्ये फ्रेंड्स ग्रुपकडून वेगवेगळ्या प्रजातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत असून, पर्यावरण संतुलित ठेवण्याच्या व मायणी वनविभाग हिरवागार करण्याच्या उद्देशातून या भागात वृक्षारोपण करण्यात येते त्यासाठी मायणी वनविभागाचे आम्हाला सहकार्य मिळते, असे मत फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रशांत कोळी यांनी मानले.

२३मायणी

येथील मायणी-म्हसवड रस्त्यालगत वृक्षारोपण करताना प्राचार्य विजयकुमार पिसाळ, दादासाहेब कचरे,महेश जाधव व मान्यवर उपस्थित होते. (छाया : संदीप कुंभार)