शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

डाेस वाया जाऊ नये म्हणून दहाजणांचे नियोजन सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST

सातारा : लसीची बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. अन्यथा डोस वाया जाण्याची शक्यता असते. परंतु अशाप्रकारे ...

सातारा : लसीची बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. अन्यथा डोस वाया जाण्याची शक्यता असते. परंतु अशाप्रकारे डोस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य विभाग दहा जणांचे नियोजन करून त्यांना लस देत आहे. त्यामुळे बाटलीमध्ये लस उरत नसल्यामुळे वाया तर जात नाहीच शिवाय लस भरतानाही ती वाय जाऊ नये, अशी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे अद्यापर्यंत जिल्ह्यात लस वाया गेली नसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात पहिल्या दिवशी ९०० जणांना लस देण्यात आली. काहीजणांना वेळेअभावी लस देता आली नाही. अशा लोकांना दुसऱ्या दिवशी लस देण्यात आली. लस वाय जाऊ नये म्हणून दहा-दहा जणांचा ग्रुप तयार करण्यात आलाय. त्यानंतर एकाला जरी लस द्यायची असेल तर मग दुसऱ्या दिवशी त्याला बोलावले जाते. जेणेकरून लस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. लाभार्थ्याला मेसेज जाण्यासाठी तांत्रिक बिघाड होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एका बाटलीत १० डोस

लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डाेस वेस्टेज जातात.

घाबरू नका

लस दिल्यानंतर किरकोळ ताप येणे, उलट्या मळमळ असे प्रकार होत असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. लसची रिॲक्शन होत नाही. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त रहावे.

गत काही दिवसांपासून जवळपास १२००० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आलीय. एकाही कर्मचाऱ्याला त्रास झाला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.