शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

डाेस वाया जाऊ नये म्हणून दहाजणांचे नियोजन सक्तीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST

सातारा : लसीची बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. अन्यथा डोस वाया जाण्याची शक्यता असते. परंतु अशाप्रकारे ...

सातारा : लसीची बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. अन्यथा डोस वाया जाण्याची शक्यता असते. परंतु अशाप्रकारे डोस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य विभाग दहा जणांचे नियोजन करून त्यांना लस देत आहे. त्यामुळे बाटलीमध्ये लस उरत नसल्यामुळे वाया तर जात नाहीच शिवाय लस भरतानाही ती वाय जाऊ नये, अशी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे अद्यापर्यंत जिल्ह्यात लस वाया गेली नसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात पहिल्या दिवशी ९०० जणांना लस देण्यात आली. काहीजणांना वेळेअभावी लस देता आली नाही. अशा लोकांना दुसऱ्या दिवशी लस देण्यात आली. लस वाय जाऊ नये म्हणून दहा-दहा जणांचा ग्रुप तयार करण्यात आलाय. त्यानंतर एकाला जरी लस द्यायची असेल तर मग दुसऱ्या दिवशी त्याला बोलावले जाते. जेणेकरून लस वाया जाऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. लाभार्थ्याला मेसेज जाण्यासाठी तांत्रिक बिघाड होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

एका बाटलीत १० डोस

लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डाेस वेस्टेज जातात.

घाबरू नका

लस दिल्यानंतर किरकोळ ताप येणे, उलट्या मळमळ असे प्रकार होत असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. लसची रिॲक्शन होत नाही. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्त रहावे.

गत काही दिवसांपासून जवळपास १२००० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आलीय. एकाही कर्मचाऱ्याला त्रास झाला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.