शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पिकपाॅकीटमार टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरच्या दोन महिलांना अटक; ५० तोळ्यांचे दागिने हस्तगत

By दत्ता यादव | Updated: January 31, 2024 21:58 IST

तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या बसस्थानकात पिकपाॅकीट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, यामध्ये एका सराफासह दोन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

रूपाली अर्जुन सकट (वय ३०), गीता संदीप भोसले (दोघीही रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), सराफ रफिक अजिज शेख (४०, रा. सांगली), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा बसस्थानकातून सातत्याने महिलांच्या गळ्यातील तसेच पर्समधील दागिने चोरीस जात होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून बसस्थानकात साध्या वेशात पाळतीवर ठेवण्यात आले. विशेषतः संशयास्पद महिलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. त्यातील दोन महिलांचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. रूपाली सकट व गीता भोसले या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर सातारा बसस्थानकासह जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी पिकपाॅकीटमारी केल्याची कबुली दिली.

 बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने व साहित्य चोरी करून ते सांगलीतील सराफाकडे विकले जात होते, अशी माहिती या दोन्ही महिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी सांगलीतून रफिक शेख या सराफाला अटक केली. या महिलांनी विकलेले ३२ लाखांचे सोने त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. या महिलांच्या साेबतीला आणखी तीन संशयित असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र बोरे, साबीर मुल्ला, हसन तडवी, महिला पोलिस दीपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आरती भागडे, दीपाली गुरव, पंकजा जाधव आदींनी ही कारवाई केली. 

केवळ सातारा जिल्ह्यातच चोरी..

या महिलांनी सातारा शहर, वडूज, फलटण शहर, कऱ्हाड शहर, दहिवडी, कोरेगाव, या बसस्थानकांत प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असल्याची कबुली दिली. यापूर्वी या टोळीवर कुठेही गुन्हे दाखल नाहीत. पहिल्यांदाच ही टोळी उघडकीस आली आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच ही टोळी चोरी करत होती.

चोरीसाठी कारचा वापर

या महिला चोरी करण्यासाठी कारने साताऱ्यात यायच्या. एक मंगळसूत्र चोरी केल्यानंतर तातडीने त्या पुन्हा कारमधून कोल्हापूरला निघून जायच्या. पोलिसांनी त्यांच्यावर वाॅच ठेवून ही चोरी काैशल्याने उघडकीस आणली.