शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पिकपाॅकीटमार टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरच्या दोन महिलांना अटक; ५० तोळ्यांचे दागिने हस्तगत

By दत्ता यादव | Updated: January 31, 2024 21:58 IST

तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या बसस्थानकात पिकपाॅकीट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, यामध्ये एका सराफासह दोन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

रूपाली अर्जुन सकट (वय ३०), गीता संदीप भोसले (दोघीही रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), सराफ रफिक अजिज शेख (४०, रा. सांगली), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा बसस्थानकातून सातत्याने महिलांच्या गळ्यातील तसेच पर्समधील दागिने चोरीस जात होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून बसस्थानकात साध्या वेशात पाळतीवर ठेवण्यात आले. विशेषतः संशयास्पद महिलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. त्यातील दोन महिलांचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. रूपाली सकट व गीता भोसले या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर सातारा बसस्थानकासह जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी पिकपाॅकीटमारी केल्याची कबुली दिली.

 बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने व साहित्य चोरी करून ते सांगलीतील सराफाकडे विकले जात होते, अशी माहिती या दोन्ही महिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी सांगलीतून रफिक शेख या सराफाला अटक केली. या महिलांनी विकलेले ३२ लाखांचे सोने त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. या महिलांच्या साेबतीला आणखी तीन संशयित असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

 पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र बोरे, साबीर मुल्ला, हसन तडवी, महिला पोलिस दीपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आरती भागडे, दीपाली गुरव, पंकजा जाधव आदींनी ही कारवाई केली. 

केवळ सातारा जिल्ह्यातच चोरी..

या महिलांनी सातारा शहर, वडूज, फलटण शहर, कऱ्हाड शहर, दहिवडी, कोरेगाव, या बसस्थानकांत प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असल्याची कबुली दिली. यापूर्वी या टोळीवर कुठेही गुन्हे दाखल नाहीत. पहिल्यांदाच ही टोळी उघडकीस आली आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच ही टोळी चोरी करत होती.

चोरीसाठी कारचा वापर

या महिला चोरी करण्यासाठी कारने साताऱ्यात यायच्या. एक मंगळसूत्र चोरी केल्यानंतर तातडीने त्या पुन्हा कारमधून कोल्हापूरला निघून जायच्या. पोलिसांनी त्यांच्यावर वाॅच ठेवून ही चोरी काैशल्याने उघडकीस आणली.