शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

फलटणचा सुसंस्कृतपणा राजकीय चावडीवर!

By admin | Updated: July 6, 2014 00:31 IST

रामराजेंच्या विरोधात बातमी; पत्रकाराला धमकी

रामराजेंच्या विरोधात बातमी; पत्रकाराला धमकीफलटण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शनिवारी दिवसभर फलटणमध्ये राजकीय घमासान झाले. आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फै री झडल्या. फलटणचा सुसंस्कृतपणा राजकीय चावडीवर रंगला. काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी थेट रामराजेंवर हल्लाबोल चढविला तर केवळ मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोप रामराजेंनी केला.‘स्वत:ला सुसंस्कृत व उच्चशिक्षित म्हणवून घेणाऱ्या राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या गुंडांकडून राष्ट्रवादीचे सुशांत निंबाळकर यांच्यावर केलेला हल्ला व पत्रकार संग्राम निकाळजेंना दिलेली धमकी निषेधार्ह व लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. या हल्ल्यामुळे रामराजेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे,’ असा आरोप स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख व काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यावर निवासस्थानी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह रणजितसिंहानी भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी नगरसेवक अनुप शहा, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे, फलटण तालुका संघर्ष समिती अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव फडतरे, कार्याध्यक्ष अनिल तावरे, अशोकराव भोसले उपस्थित होते.फलटण तालुक्यात एक हाती सत्ता मिळवूनही रामराजेंना कोणतीच कामे करता आलेली नाहीत. तालुक्यात प्रचंड गुंडागिरी वाढली असून, सत्ता व दादागिरीच्या जोरावर त्यांची हुकूमत चालली आहे. नगरपालिकेच्या शिक्षण मंडळात अनेक गुंड असल्याचा आरोपही रणजितसिंहानी केला.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला व राजेगटाला जनतेने हिसका दाखविल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या राजकारणी व विरोधात लिखाण करणाऱ्या पत्रकारांवर गुंडाकरवी हल्ले करून दहशत माजविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था यामुळे रसातळाला गेली असून, यामुळे जर त्यांनी गुंडागिरी सुरूच ठेवली तर जशास तसे त्यांना उत्तर देऊ, असा इशारा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.अ‍ॅड. नरसिंह निकम व अनुप शहा यांनी यावेळी राजेगटावर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, यानंतर सर्वांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, राजेगटाच्या दबावापोटी आपण सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी फिर्याद घेतलेली नाही. फिर्याद देऊनही मानसिक त्रास दिला गेला. जखमी अवस्थेत एक तास पोलीस ठाण्यात बसल्यानंतर फिर्याद घेतली गेल्याचा आरोप सुशांत निंबाळकर यांनी केला. फलटण शहरात शनिवारी दिवसभर या सर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण प्रचंड गरम बनले होते. चौकाचौकांत थांबलेल्या जमावात हीच चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)