शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

फलटणचा सुसंस्कृतपणा राजकीय चावडीवर!

By admin | Updated: July 6, 2014 00:31 IST

रामराजेंच्या विरोधात बातमी; पत्रकाराला धमकी

रामराजेंच्या विरोधात बातमी; पत्रकाराला धमकीफलटण : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शनिवारी दिवसभर फलटणमध्ये राजकीय घमासान झाले. आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फै री झडल्या. फलटणचा सुसंस्कृतपणा राजकीय चावडीवर रंगला. काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी थेट रामराजेंवर हल्लाबोल चढविला तर केवळ मला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोप रामराजेंनी केला.‘स्वत:ला सुसंस्कृत व उच्चशिक्षित म्हणवून घेणाऱ्या राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांच्या गुंडांकडून राष्ट्रवादीचे सुशांत निंबाळकर यांच्यावर केलेला हल्ला व पत्रकार संग्राम निकाळजेंना दिलेली धमकी निषेधार्ह व लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. या हल्ल्यामुळे रामराजेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे,’ असा आरोप स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख व काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यावर निवासस्थानी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह रणजितसिंहानी भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी नगरसेवक अनुप शहा, स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे, फलटण तालुका संघर्ष समिती अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव फडतरे, कार्याध्यक्ष अनिल तावरे, अशोकराव भोसले उपस्थित होते.फलटण तालुक्यात एक हाती सत्ता मिळवूनही रामराजेंना कोणतीच कामे करता आलेली नाहीत. तालुक्यात प्रचंड गुंडागिरी वाढली असून, सत्ता व दादागिरीच्या जोरावर त्यांची हुकूमत चालली आहे. नगरपालिकेच्या शिक्षण मंडळात अनेक गुंड असल्याचा आरोपही रणजितसिंहानी केला.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला व राजेगटाला जनतेने हिसका दाखविल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या राजकारणी व विरोधात लिखाण करणाऱ्या पत्रकारांवर गुंडाकरवी हल्ले करून दहशत माजविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था यामुळे रसातळाला गेली असून, यामुळे जर त्यांनी गुंडागिरी सुरूच ठेवली तर जशास तसे त्यांना उत्तर देऊ, असा इशारा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.अ‍ॅड. नरसिंह निकम व अनुप शहा यांनी यावेळी राजेगटावर जोरदार टीकास्त्र सोडले. दरम्यान, यानंतर सर्वांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, राजेगटाच्या दबावापोटी आपण सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी फिर्याद घेतलेली नाही. फिर्याद देऊनही मानसिक त्रास दिला गेला. जखमी अवस्थेत एक तास पोलीस ठाण्यात बसल्यानंतर फिर्याद घेतली गेल्याचा आरोप सुशांत निंबाळकर यांनी केला. फलटण शहरात शनिवारी दिवसभर या सर्व घडामोडींमुळे राजकीय वातावरण प्रचंड गरम बनले होते. चौकाचौकांत थांबलेल्या जमावात हीच चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)