शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

संकटकाळी फलटणकर आश्रय देतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:53 IST

फलटण : ‘फलटणकर नेहमीच सहिष्णुता आणि मदतीसाठी आघाडीवर राहिल्याचे नमूद करीत ब्र्रिटिशाविरुद्ध भूमिका घेतल्याने आपल्या कुटुंबातील पूर्वजांना याच जिल्ह्यातील नांदवळ येथून हद्दपार व्हावे लागले. त्यावेळी ती मंडळी फलटण येथे वास्तव्यास आली आणि त्यानंतर त्यांनी काट्याचीवाडी (बारामती) येथे वास्तव्य केले. ही वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट करीत संकटाच्या काळात येथे आश्रय मिळतो, हे ...

फलटण : ‘फलटणकर नेहमीच सहिष्णुता आणि मदतीसाठी आघाडीवर राहिल्याचे नमूद करीत ब्र्रिटिशाविरुद्ध भूमिका घेतल्याने आपल्या कुटुंबातील पूर्वजांना याच जिल्ह्यातील नांदवळ येथून हद्दपार व्हावे लागले. त्यावेळी ती मंडळी फलटण येथे वास्तव्यास आली आणि त्यानंतर त्यांनी काट्याचीवाडी (बारामती) येथे वास्तव्य केले. ही वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट करीत संकटाच्या काळात येथे आश्रय मिळतो, हे विसरता येणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केले.येथील आबासाहेब मंदिर, चक्रपाणी जन्मस्थान आणि रंगशिळा मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर या तिन्ही मंदिरांचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. इंद्रजित मोहिते, सुभाषराव शिंदे, डॉ. विजयराव बोरावके, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यासह महानुभाव पंथातील अनेक संत, महंत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.खासदार शरद पवार म्हणाले, ‘आडनावावरून जात आणि धर्म किंवा पंथ स्पष्ट होत असल्याने महानुभाव पंथामध्ये संत महंतांची नावे गावावरून येत. येथे जात, धर्म, पंथ पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा आणि त्यांच्यामध्ये समाजाविषयी आदर आणि आपुलकीची शिकवण देणारा धर्म म्हणून महानुभाव पंथाची ओळख आहे.शिकवणुकीची गरजगाडगे महाराजांनी म्हटले आहे की, देव सुंदर मूर्तीत असल्याचे पाहून त्याला नमस्कार करता; परंतु तो नैवेद्य खात नाही, हालचाल करीत नाही, वस्त्र परिधान करीत नाही, अशा देवाला पूजण्यापेक्षा ज्याला अन्न, वस्त्र, निवाºयाची गरज आहे, त्याला ते उपलब्ध करून द्या आणि माणसातील दैवत्व जागे करून त्याची पूजा करा त्यातून समाजमन तयार होईल, याची शिकवण दिल्याचे निदर्शनास आणून देत आज खºया अर्थाने या शिकवणुकीची गरज आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Politicsराजकारण