शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

फलटणला आधार सातार अन्‌ बारामतीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

फलटण तालुक्यात दररोज तीनशेच्या सरासरीने रुग्ण आढळत असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या तर वेगळीच आहे. कोरोनाबाधित रुग्णांना फलटण ...

फलटण तालुक्यात दररोज तीनशेच्या सरासरीने रुग्ण आढळत असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या तर वेगळीच आहे. कोरोनाबाधित रुग्णांना फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय आणि दिवंगत हिंदूराव नाईक निंबाळकर कोरोना सेंटर येथे संपूर्ण मोफत उपचार मिळत असून, शहरातील इतर खाजगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. काही खाजगी रुग्णालयांमध्ये अवाच्या सव्वा भाडे आकारले जात असून, रुग्णालयाचे एकाचे बिल एक ते अडीच लाख रुपयांपर्यंत जात आहे.

शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्यास सांगितले असताना त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे खाजगी रुग्णालयाकडून केली जात नाही. एखादा कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला ५० हजार ते १ लाख रुपये सुरुवातीला डिपॉझिट म्हणून भरावे लागतात, जर त्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनची गरज लागली, तर त्याला ते इंजेक्शन महागड्या दरामध्ये खरेदी करावी लागत असून, शासकीय दरामध्ये खूपच कमी रुग्णांना इंजेक्शन मिळाले आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी पकडली असली तरी अनेक महत्त्वाच्या खाजगी रुग्णालयात महागडी इंजेक्शन विकली गेली तरी त्याची चौकशी किंवा कारवाई प्रशासनाने केलेली नाही. खाजगी रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. काही खाजगी रुग्णालयांची सखोल चौकशी प्रामाणिकपणे झाली, तर त्यांनी रुग्णांची केलेली लूटमार बाहेर येण्याची शक्यता आहे.

फलटणमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून, खाजगी हॉस्पिटल कमी पडत असल्याने सातारा किंवा बारामती येथील सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये बरेचसे रुग्ण उपचार घेत आहेत. फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय, दिवंगत हिंदूराव नाईक निंबाळकर कोरोना सेंटर, श्री स्वामी समर्थ, फलटण कोरोना सेंटर, दत्त फाउंडेशन कोरोना केअर सेंटर, साखरवाडी, समाज कल्याण हॉस्टेल, जाधववाडी, सजाई गार्डन, फलटण येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून, शहरातील नऊ खाजगी रुग्णालयांमध्ये पैसे घेऊन उपचार केले जात आहेत. फलटण तालुक्यात एकूण ६४१ बेडची सोय असून, त्यामध्ये ऑक्सिजन बेड २८२, तर व्हेंटिलेटर बेड १७ आहेत. २५४ विलगीकरण बेड (सर्वसाधारण) बेडची संख्या आहे.

फलटण तालुक्यात आतापर्यंत एकूण १८,५०० रुग्ण कोरोनाबाधित आले असून, सरकारी आकडेवारीप्रमाणे २५३ रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी मृत्यू झालेल्यांची संख्या ६०० हून अधिक आहे.