शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

फलटण शहरात घुमलं पिवळं वादळ

By admin | Updated: April 28, 2017 00:53 IST

फलटण शहरात घुमलं पिवळं वादळ

धनगर समाजाचा क्रांती मोर्चा : अहिल्याकन्यांच्या हस्ते निवेदन; संघटनांचा पाठिंबाफलटण : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, त्यांना अनुसूचित जमातीचे दाखले द्यावे, आदी मागण्यांसाठी मल्हार क्रांती मोर्चा तर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला, मुली यांचीही संख्या मोठी होती. मोर्चामुळे शहर पिवळेमय झाले होते. अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीचा एल्गार करण्यात आला.आपल्या हक्कासाठी सकल धनगर समाज गुरुवारी हजारोंच्या संख्येने एकवटला होता. यावेळी ‘मल्हार क्रांती’ मोर्चामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एसटी दाखला मागणीचा अर्ज हजारो जणांनी भरून दिला. हे सर्व अर्ज नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांच्याकडे अहिल्या कन्यांनी निवेदनासह दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखल द्यावा, या मागणीचे अर्ज दाखल करण्याच्या अभिनव आंदोलनासाठी ‘मल्हार क्रांती’ मोर्चाच्या झेंड्याखाली एकवटलेल्या सकल धनगर समाजाने आरक्षण मागणीसाठी येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते तहसीलदार कार्यालय, असा मोर्चा काढला. ‘मल्हार क्रांती’च्या या दुसऱ्या एल्गारात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यासह, बारामती, माळशिरस तालुक्यांतून समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यासाठी समाजाने पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढून तत्कालीन सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच बारामती येथे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे व ‘रासप’चे महादेव जानकर आंदोलनस्थळी आले होते. त्यावेळी सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत १५ दिवसांच्या आत धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेशाची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यावर संपूर्ण राज्यातील धनगर समाज प्रभावित झाला होता. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही झाला. मात्र, सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाजामध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. सरकारने आश्वासन पाळण्याची मागणी यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली. मोर्चास्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली होती. मोर्चाचा मार्ग पिवळ्या झेंड्यांनी माखून गेला होता. धनगर समाजाच्या मागण्यांचा व दिलेल्या आश्वासनाची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठी धनगर समाज ‘मल्हार क्रांती’च्या झेंड्याखाली एकवटला होता. जिल्ह्यातील हा दुसरा मल्हार मोर्चा शिस्तबद्धरीत्या पार पडला. यावेळी प्रियदर्शनी कोकरे, प्रियंका आटोले या मुलींची भाषणे झाली. मोर्चाला मराठा क्रांती मोर्चा आणि विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन..अत्यंत साधेपणा, शिस्त व सरळमार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चात एसटी आरक्षण दाखला मागणी अर्ज दाखल करण्याचे अभिनव आंदोलन राबविले होते. याला प्रचंड प्रमाणात समाजबांधवांनी एकत्र येऊन प्रतिसाद दिला. कोणताही पक्ष व संघटना न पाहता सकल धनगर समाजबांधव एकवटले होते.युवक, युवतींसह महिलाही सहभागी‘मल्हार क्रांती’चे समन्वयक गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावात फिरून भूमिका मांडत होते. त्यास समाजबांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. मोर्चात युवक, युवती व महिलांनी सहभाग नोंदविला. या मल्हार क्रांती मोर्चास यावेळी विविध संघटनांनी पाठिंबा नोंदविला. मोर्चाची सांगता अहिल्या कन्यांनी आपल्या मागण्या कशा योग्य आहेत, हे पटवून दिले व समाजाला एकसंध राहण्याचे आवाहन केले.