शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

फलटणनं जपलाय प्रदीर्घ सत्तेचा वारसा!

By admin | Updated: August 31, 2015 20:59 IST

जगात राजघराणं सातवे : पणजोबा मुधोजीराजे नाईक-निंबाळकरांचा वारसा पुढे नेतायत रामराजे

सातारा : जगामध्ये सर्वाधिक काळ सत्ता गाजविणाऱ्या दहा राजघराण्यांपैकी ‘टॉप टेन’मध्ये फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा सातवा क्रमांक लागलाय. या घराण्यातील मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी ७ डिसेंबर १८४१ ते १७ आॅक्टोबर १९१६ असे ७५ वर्षे २५३ दिवस इतका प्रदीर्घ काळ फलटण संस्थानावर अधिराज्य गाजविले. विशेष म्हणजे, त्यांचे पणतू व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरही आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत फलटणच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात गेल्या २५ वर्षांपासून प्रभाव ठेवून आहेत.फलटण संस्थानातील नाईक-निंबाळकर घराणे पराक्रमी व इतिहास प्रसिद्ध घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सासर, तर छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ आहे. सर्वात जास्त राज्य कारभार करणाऱ्या जगातील दहा राज्यकर्त्यांमध्ये मुधोजीराजे नाईक-निंबाळकर (चौथे) यांचा सातवा क्रमांक लागतो. त्यांच्या खालोखाल गोंदल संस्थानाचे भगवतसिंग साहिब यांचा क्रमांक लागतो. स्वाझीलँडचे राजे सोहुजा यांनी ८२ वर्षे २५४ दिवस, लिपे संस्थानात (जर्मनी) बेर्नाड यांनी ८१ वर्षे २३४ दिवस, विल्यम चौथा हेनबर्ग स्कूलशिगिन (रोमन साम्राज्य) यांनी ७८ वर्षे २४३ दिवस, हेन्रीच अकरावा ग्रीज संस्थान यांनी ७७ वर्षे १०३ दिवस, इद्रिस इब्नी मुहम्मद अल कादरी, मलेशिया यांनी ७६ वर्षे २३९ दिवस राज्य कारभार पाहिला. यांच्यानंतर भारतातील फलटण संस्थानच्या मुधोजीराजेंनी भारतातील सर्वाधिक काळ राज्य कारभार केला आहे.रामराजेंचे आजोबा मालोजीराजे हेही बरीच वर्षे आमदार व मंत्री होते. त्यानंतर हाच वारसा रामराजे नाईक-निंबाळकर समर्थपणे पुढे नेत आहेत. क्रिकेटमध्ये पारंगत असणाऱ्या रामराजेंनी राजकारणाच्या खेळातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. नगराध्यक्षपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द विधानपरिषदेच्या सभापतिपदापर्यंत कायम टिकून आहे. नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, कृष्णा खोरे उपाध्यक्ष, पाटबंधारे मंत्री ते विधानपरिषद सभापती असा चढता आलेख रामराजेंनी राखला आहे. संजीवराजे व रघुनाथराजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात यशस्वी ठरले आहेत. (प्रतिनिधी)युतीच्या काळातही सत्ता हात जोडून...१९९५ ते १९९९ या काळात युती शासनाची सत्ता होती. याच काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. रामराजेंना या महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता. रामराजे सध्या राष्ट्रवादीतील वजनदार नेते आहेत. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या रामराजेंना राज्याचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या विधानपरिषदेचे सभापतीपद मिळाले आहे. पक्षाची सत्ता नसतानाही कधी महामंडळाचे उपाध्यक्षपद तर कधी विधान परिषदेचे सभापतीपद अशा माध्यमातून ‘नॉन स्टॉप’ सत्तेवर राहण्याचा विक्रमही रामराजेंनीच केला आहे.