शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:57 IST

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड ...

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड येथे यशवंतराव चव्हाण बचत भवन सभागृहात पार पडला. याप्रसंगी राज्यमंत्री आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे विवेक कांबळे, हणमंतराव साठे, प्राचार्य शहाजी कांबळे, अशोकराव मदने, आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जयवंत विरकायदे, किशोर तपासे, कºहाड तालुकाध्यक्ष युवराज काटरे, राजू गवळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘‘भाजप जातीयवादी असल्याचं बोललं जातंय. नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्याबद्दल चांगलं बोलताहेत. संविधान बदलणार नाही. दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे ओरडून सांगताहेत. मात्र, काही विरोधी पक्षातील लोक भाजपवाले असे करतील तसेच करतील, असे सांगत आहेत. आरपीआय हा मोठा पक्ष आहे. या पक्षात हिंदू, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन अशा विविध धर्मांतील लोक आहेत. त्यामुळे आपण एकमेकांशी भांडत न बसता एकत्रित राहिले पाहिजे. आरपीआयची ताकद वाढविली पाहिजे. आरपीआय हा संभाजी भिडे यांच्या बाजूने नाही. संभाजी भिडे यांना अटक झालीच पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. डॉ. बाबासाहेबांनी जोडण्याची भूमिका सांगितली आहे, तोडण्याची नाही. खरे मित्र बनवणे हीच खरी आपली चळवळ आहे.’मेळाव्यापूर्वी राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कºहाड तालुका आरपीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज काटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यानंतर राज्यमंत्री आठवले यांनी कºहाड येथील बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात गोळामाझ्या मंत्रिपदाकडे लागला आहे डोळा... कारण मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात उठलाय गोळा... जर खराच असशील तू भीमाच्या बाळा... तर लाव ना तू जातीयवादी लोकांच्या तोंडाच्या काळा... अशा मार्मिक कवितेच्या माध्यमातून नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावर मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.