शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बदलू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:57 IST

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड ...

कºहाड : डॉ. बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची कुणामध्ये सुद्धा हिंमत नाही आणि संविधान जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही,’ अशा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.पुणे येथे रविवार, दि. २७ रोजी होणाºया महाअधिवेशनाच्या तयारीकरिता पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी यांचा नियोजन मेळावा रविवारी कºहाड येथे यशवंतराव चव्हाण बचत भवन सभागृहात पार पडला. याप्रसंगी राज्यमंत्री आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे विवेक कांबळे, हणमंतराव साठे, प्राचार्य शहाजी कांबळे, अशोकराव मदने, आरपीआयचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जयवंत विरकायदे, किशोर तपासे, कºहाड तालुकाध्यक्ष युवराज काटरे, राजू गवळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘‘भाजप जातीयवादी असल्याचं बोललं जातंय. नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्याबद्दल चांगलं बोलताहेत. संविधान बदलणार नाही. दलितांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे ओरडून सांगताहेत. मात्र, काही विरोधी पक्षातील लोक भाजपवाले असे करतील तसेच करतील, असे सांगत आहेत. आरपीआय हा मोठा पक्ष आहे. या पक्षात हिंदू, मराठा, मुस्लीम, ख्रिश्चन अशा विविध धर्मांतील लोक आहेत. त्यामुळे आपण एकमेकांशी भांडत न बसता एकत्रित राहिले पाहिजे. आरपीआयची ताकद वाढविली पाहिजे. आरपीआय हा संभाजी भिडे यांच्या बाजूने नाही. संभाजी भिडे यांना अटक झालीच पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. डॉ. बाबासाहेबांनी जोडण्याची भूमिका सांगितली आहे, तोडण्याची नाही. खरे मित्र बनवणे हीच खरी आपली चळवळ आहे.’मेळाव्यापूर्वी राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कºहाड तालुका आरपीआय संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज काटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यानंतर राज्यमंत्री आठवले यांनी कºहाड येथील बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात गोळामाझ्या मंत्रिपदाकडे लागला आहे डोळा... कारण मी मंत्री झाल्यापासून त्यांच्या पोटात उठलाय गोळा... जर खराच असशील तू भीमाच्या बाळा... तर लाव ना तू जातीयवादी लोकांच्या तोंडाच्या काळा... अशा मार्मिक कवितेच्या माध्यमातून नाव न घेता प्रकाश आंबेडकर यांच्यावर मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.