शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

परवानगी हॉटेलची, काढला बिअरबार

By admin | Updated: January 28, 2015 00:58 IST

पाचवड ग्रामसभा वादळी : ग्रामपंचायतीने परवानगीच दिली नसल्याचा सरपंच, ग्रामसेवकांचा दावा

भुर्इंज : वाई तालुक्यातील पाचवड येथे विनापरवाना ‘बिअरबार’वरुन ग्रामसभेत रणकंदन झाले. ‘या बारसाठी अर्थपूर्ण तडजोडी झाल्याचा’ आरोप काही ग्रामस्थांनी केला. मात्र, ‘या बारसाठी ग्रामपंचायतीने कोणतीही परवागी दिली नाही,’ असा दावा सरपंच, ग्रामसेवकांनी केला. बिअरबारबरोबर अनेक कारणांवरुन ही ग्रामसभा गाजली असून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचेही प्रकार घडले आहेत.पाचवड व उडतरे गावच्या दरम्यान बिअरबार सुरू झाला आहे. या ठिकाणी २०१३ मध्ये हॉटेल सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. ती परवानगी ग्रामपंचायतीने दिली. तसेच हे बांधकाम बिगरशेती जागेत असूनही त्या बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. मात्र, हॉटेल मालकाने ‘बिअरबार’ सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे परवानगी मागितली नव्हती. ग्रामपंचायतीची परवानगी न घेता, याबाबत ग्रामसभेत कोणताही ठराव न होता बार सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. हा बार बंद करण्याची मागणी ग्रामपंचायतीतर्फे जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबतची कागदपत्रेही ग्रामसभेपुढे मांडण्यात आली. ‘पाचवड गावात ‘शॉप अ‍ॅक्ट’ लागू होत नाही,’ असा दाखला ग्रामसेवकाने दिला. त्यामुळे बारला थेट परवानगी मिळाली असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड, अजित शेवाळे यांनी केला. त्यावर ग्रामसेवक सुरेश बाबर म्हणाले, ‘ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असताना राज्य उत्पादन शुल्कचे वाई येथील दुय्यम निरीक्षकांनी २० नोव्हेंबर, २०१३ रोजी सायंकाळी घरी येऊन याबाबत आपला जवाब घेतला. वास्तविक त्यावेळी त्यांना कार्यालयात येऊन जबाब घ्या, असे सांगितले. पण, अधिकाऱ्यांनी ‘आम्हाला शिकवू नका, मी तुमच्या वरचा अधिकारी आहे,’ असे सांगून जबरदस्तीने जबाब नोंदविला. शॉप अ‍ॅक्ट लागू होत नाही, असा जबाब दिला आहे, याबाबत मी स्वत: कुठला दाखला दिला नाही.’‘संबंधित बारला परवानगी दिली नाही, उलट तो बार बेकायदा असून बंद करावा, अशीच विद्यमान पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे,’ अशी माहिती सरपंच संजय गायकवाड, सदस्य भरत गायकवाड, महेश गायकवाड यांनी मांडली. विद्यमान पदाधिकारी राजकारण बाजूला ठेवून विकास करत आहेत. गावापेक्षा कोणी मोठा नाही. गावात दारूबंदी झालीच पाहिजे,’ अशी मागणी शामराव गायकवाड यांनी केली. त्यावरुन काही काळ गोंधळ झाला. या गोंधळातच ग्रामसभा गुंडाळण्यात आली. याचवेळी विविध घोषणा दिल्या जात होत्या. (वार्ताहर)अधिकारी जबाबदार की ग्रामसेवक?‘एखाद्या बारसाठी अधिकारी ग्रामसेवकाच्या घरी जाऊन जबरदस्तीने जबाब घेत असल्यास त्याला ग्रामसेवक बळी पडत असेल तर याबाबत त्या अधिकाऱ्याला दोषी धरायचे की ग्रामसेवकाला?,’ असा प्रश्न शेवाळे व गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत हा बार बंद करण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली.