शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

टोलमाफी न मिळाल्यास लॉकडाऊननंतर जनआंदोलन : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

कोरेगाव : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोलनाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि ...

कोरेगाव : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोलनाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर जिल्हावासीयांना ही सुविधा दिली जात नाही. याबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, शासनाने जनतेचा अंत पाहू नये. लॉकडाऊननंतर याविषयी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील लोकांना स्वत:च्या जिल्ह्यात टोलनाक्यांवर टोल भरावा लागत आहे. आता दि. १ एप्रिलपासून टोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. २००६ पासून २०२१ साल उजाडले तरी, पुणे-सातारा दरम्यानच्या महामार्गाचे काम अद्यापही सुरूच आहे. अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही.

काही जणांनी टोलच्या दरात पाच टक्के कपात करण्याविषयी मागणी केली आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील टोलनाक्यांवर एमएच ११ व एमएच ५० अशी नोंदणी असलेल्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी, अशी आमची मागणी पहिल्यापासून आहे. आता टोलनाक्यांवर ठेकेदार बदलला आहे. रिलायन्स इन्फ्राकडे महामार्ग निर्मितीचे काम आहे. २००६ पासून २०२१ साल उजाडले तरी अद्याप पुणे-सातारादरम्यानच्या महामार्गाचे काम सुरूच आहे. अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही. तरी देखील दरवर्षी टोलच्या दरात वाढ केली जात आहे, अशी टीकाही आ. शिंदे यांनी केली.

याबाबत आम्ही राज्य शासनाकडे मागणी केल्यानंतर, हा विषय केंद्र शासनाशी निगडित असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र शासन कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम का करत आहे, हा प्रश्‍न उपस्थित होतो. सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्याने टोलच्या विषयामध्ये सर्वसामान्य जनता आणि वाहनधारकांना आंदोलन करण्यास भाग पाडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या विषयामध्ये तातडीने लक्ष घालून जिल्हावासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही आ. शिंदे यांनी केली आहे.

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोलनाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यांवर जिल्हावासीयांना ही सुविधा दिली जात नाही. याबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, शासनाने जनतेचा अंत पाहू नये, लॉकडाऊननंतर याविषयी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. शिंदे यांनी दिला आहे.