शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टोलमाफी न मिळाल्यास लॉकडाऊननंतर जनआंदोलन : शशिकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

कोरेगाव : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोलनाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि ...

कोरेगाव : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोलनाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर जिल्हावासीयांना ही सुविधा दिली जात नाही. याबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, शासनाने जनतेचा अंत पाहू नये. लॉकडाऊननंतर याविषयी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील लोकांना स्वत:च्या जिल्ह्यात टोलनाक्यांवर टोल भरावा लागत आहे. आता दि. १ एप्रिलपासून टोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. २००६ पासून २०२१ साल उजाडले तरी, पुणे-सातारा दरम्यानच्या महामार्गाचे काम अद्यापही सुरूच आहे. अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही.

काही जणांनी टोलच्या दरात पाच टक्के कपात करण्याविषयी मागणी केली आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील टोलनाक्यांवर एमएच ११ व एमएच ५० अशी नोंदणी असलेल्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी मिळावी, अशी आमची मागणी पहिल्यापासून आहे. आता टोलनाक्यांवर ठेकेदार बदलला आहे. रिलायन्स इन्फ्राकडे महामार्ग निर्मितीचे काम आहे. २००६ पासून २०२१ साल उजाडले तरी अद्याप पुणे-सातारादरम्यानच्या महामार्गाचे काम सुरूच आहे. अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही. तरी देखील दरवर्षी टोलच्या दरात वाढ केली जात आहे, अशी टीकाही आ. शिंदे यांनी केली.

याबाबत आम्ही राज्य शासनाकडे मागणी केल्यानंतर, हा विषय केंद्र शासनाशी निगडित असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र शासन कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम का करत आहे, हा प्रश्‍न उपस्थित होतो. सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्याने टोलच्या विषयामध्ये सर्वसामान्य जनता आणि वाहनधारकांना आंदोलन करण्यास भाग पाडू नये, अशी आमची अपेक्षा आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या विषयामध्ये तातडीने लक्ष घालून जिल्हावासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही आ. शिंदे यांनी केली आहे.

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे जिल्ह्यातील लोकांना खेड शिवापूरसह अन्य टोलनाक्यांवर टोलमाफी आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यांवर जिल्हावासीयांना ही सुविधा दिली जात नाही. याबाबत जनतेच्या भावना तीव्र असून, शासनाने जनतेचा अंत पाहू नये, लॉकडाऊननंतर याविषयी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. शिंदे यांनी दिला आहे.