शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

Lok Sabha Election 2019 सातारा जिल्ह्यातील जनता दहा वर्षांपासून दहशतीखाली: नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:09 IST

पाल : ‘जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. यापुढे ...

पाल : ‘जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. यापुढे येथील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी राहील,’ असे आवाहनसातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केले.पाल येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कºहाड उत्तर भाजपा नेते मनोज घोरपडे, माजी सभापती हिंदुराव चव्हाण, कºहाड उत्तरचे कार्याध्यक्ष महेश जाधव, बाजार समितीचे संचालक रामकृष्ण वेताळ उपस्थित होते.नरेंद्र पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये विकासकामे व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही. याला कारणीभूत फक्त विद्यमान खासदार आहेत. कोल्हापूरला मंत्री चंद्रकांत पाटील टोलमुक्त करत असतील तर साताऱ्याच्या खासदारांनी सातारकरांसाठी टोलमुक्त का नाही केले? जिल्ह्यामध्ये मोठी धरणे असूनही जिल्ह्यातील दुष्काळ त्यांना का हटविता आला नाही. जिल्ह्यात तरुणांची संख्या मोठी आहे. नव्या पिढीला कॉलर उलटी करण्याचा आदर्श देण्यापेक्षा चांगला आर्दश द्या.’चरेगावकर म्हणाले, ‘जिल्ह्यातील बंद पडलेल्या योजना विधानसभेच्या पूर्वीच सुरू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.’पावसकर म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे रखडली आहेत. अद्याप ती पूर्ण झाली नाहीत व ती करण्याचाही प्रयत्न कुणी केला नाही. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे.’नरेंद्र पाटील यांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर पाली या गावामध्ये नरेंद्र पाटील यांची रॅली काढण्यात आली. रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, विश्वासराव काळभोर, कºहाड उत्तरचे भाजपाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, माजी सरपंच सयाजी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पंचायत समितीचे सदस्य संजय घोरपडे, अ‍ॅड. विशाल शेजवळ, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम गायकवाड, तालुकाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, सुनील पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, विश्वासराव काळभोर, संतोष पाटील, सयाजीराव पाटील-कोर्टी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक