शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लोकांना संविधान समजून सांगणे गरजेचे : शामसुंदर महाराज सोन्नर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

सातारा : ‘संविधानाला काही लोक नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे. ज्या ...

सातारा : ‘संविधानाला काही लोक नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे. ज्या परंपरावादी लोकांना पुन्हा तीच विषमतेची समाज व्यवस्था आणायची आहे, त्यांनीसुद्धा संविधानाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे,’ असे मत ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘विवेकाची वारी’ या तीनदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा मंगळवारी तिसरा आणि समारोपाचा दिवस होता. यावेळी ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ‘संतविचार आणि भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यान पार पडले.

शामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, ‘माणूस म्हणून जगण्याच्या सामान्य माणसाच्या इच्छेचा आदर करण्यासाठी संविधान टिकले पाहिजे. याच विचारांचा जागर गेली सातशे वर्षे संत साहित्याने केला आहे आणि त्याचाच जागर आज आपण करत आहोत. वारकरी संप्रदाय नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्मावर भर देणारा आहे. वारकरी संप्रदाय अशी शिकवण देतो की, आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंत तुम्हाला मदत करतात. ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’, या संत सावतामाळी यांच्या ओळींवरून कर्तव्याला संतांनी दिलेले महत्त्व दिसून येईल.’

‘लिंग समानता ही जरी संविधानाने मान्य झाली असली तरी हे मूल्य आपल्या संत वाङमयामध्ये सातशे वर्षांपासून आहे, हे सिद्ध झाले होते. आपल्या वारकरी संप्रदायातील स्त्रिया या लेचापेच्या नाहीत, बहादूर आहेत. पुरुष शेतकरी आत्महत्या करत असताना एकाही महिलेने आत्महत्या केली नाही. संत नामदेव पंजाबमध्ये असताना महाराष्ट्रात संत जनाबाई यांनी वारकरी संप्रदायाचे नेतृत्व केले. याचप्रमाणे संत सोयराबाईला स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकार वारकरी परंपरेने दिला. बंधुत्वाची भूमिका आपल्याला वारीमध्ये दिसते’, असेही सोन्नर म्हणाले.

सामाजिक न्यायाची भूमिका संतांच्या विचारांत आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाळून स्त्रियांचा सन्मान करावा. आपल्या ५१ (अ) या संविधानातील कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावे.

अशोक वानखडे यांनी सूत्रसंचालन केले. बापू शेवकरी यांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचे गायन केले. राहुल माने यांनी प्रास्ताविक केले. मोहन भोईर यांनी परिचय करून दिला. मुंजाजी कांबळे यांनी आभार मानले.