शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना संविधान समजून सांगणे गरजेचे : शामसुंदर महाराज सोन्नर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

सातारा : ‘संविधानाला काही लोक नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे. ज्या ...

सातारा : ‘संविधानाला काही लोक नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा परिस्थितीमध्ये लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे. ज्या परंपरावादी लोकांना पुन्हा तीच विषमतेची समाज व्यवस्था आणायची आहे, त्यांनीसुद्धा संविधानाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे,’ असे मत ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘विवेकाची वारी’ या तीनदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा मंगळवारी तिसरा आणि समारोपाचा दिवस होता. यावेळी ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ‘संतविचार आणि भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यान पार पडले.

शामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, ‘माणूस म्हणून जगण्याच्या सामान्य माणसाच्या इच्छेचा आदर करण्यासाठी संविधान टिकले पाहिजे. याच विचारांचा जागर गेली सातशे वर्षे संत साहित्याने केला आहे आणि त्याचाच जागर आज आपण करत आहोत. वारकरी संप्रदाय नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्मावर भर देणारा आहे. वारकरी संप्रदाय अशी शिकवण देतो की, आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंत तुम्हाला मदत करतात. ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’, या संत सावतामाळी यांच्या ओळींवरून कर्तव्याला संतांनी दिलेले महत्त्व दिसून येईल.’

‘लिंग समानता ही जरी संविधानाने मान्य झाली असली तरी हे मूल्य आपल्या संत वाङमयामध्ये सातशे वर्षांपासून आहे, हे सिद्ध झाले होते. आपल्या वारकरी संप्रदायातील स्त्रिया या लेचापेच्या नाहीत, बहादूर आहेत. पुरुष शेतकरी आत्महत्या करत असताना एकाही महिलेने आत्महत्या केली नाही. संत नामदेव पंजाबमध्ये असताना महाराष्ट्रात संत जनाबाई यांनी वारकरी संप्रदायाचे नेतृत्व केले. याचप्रमाणे संत सोयराबाईला स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकार वारकरी परंपरेने दिला. बंधुत्वाची भूमिका आपल्याला वारीमध्ये दिसते’, असेही सोन्नर म्हणाले.

सामाजिक न्यायाची भूमिका संतांच्या विचारांत आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोन पाळून स्त्रियांचा सन्मान करावा. आपल्या ५१ (अ) या संविधानातील कलमानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावे.

अशोक वानखडे यांनी सूत्रसंचालन केले. बापू शेवकरी यांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचे गायन केले. राहुल माने यांनी प्रास्ताविक केले. मोहन भोईर यांनी परिचय करून दिला. मुंजाजी कांबळे यांनी आभार मानले.