शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

वाटाणा पोहोचला सात हजार रुपये क्विंटलपर्यंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:38 IST

सातारा : मागील काही दिवस क्विंटलला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळणाऱ्या वाटाण्याचा भाव वाढला आहे. सातारा बाजार ...

सातारा : मागील काही दिवस क्विंटलला दोन ते अडीच हजार रुपये दर मिळणाऱ्या वाटाण्याचा भाव वाढला आहे. सातारा बाजार समितीत तर चार महिन्यांनंतर वाटाण्याला क्विंटलला ७ हजारांपर्यंत भाव मिळू लागलाय. मात्र, दुसरीकडे कांद्याचा दर आणखी कोसळला. एक नंबरच्या कांद्याला क्विंटलला अवघा १२००पर्यंत दर मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शेतीमाल येतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात आवक होते. बाजार समितीत कांदा आणि बटाटा अधिक प्रमाणात येतो. सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची ५१३ क्विंटल आवक झाली. कांद्याला क्विंटलला २००पासून १२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील महिन्यापूर्वी बाजार समितीत कांद्याचा दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत होता. मात्र, त्यानंतर दर एकदमच गडगडला आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवारी ५३ वाहनांतून ५८० क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. बटाटा १०५, लसूण २० आणि आल्याची ३९ क्विंटलची आवक झाली. तसेच फळांचीही काही प्रमाणात आवक राहिली. सातारा बाजार समितीत गवारला दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. गवारचा दर अजूनही तेजीत आहे. तसेच शेवगा शेंगला १०० ते १५० रुपयांपर्यंत दर आला. शेवगा शेंगच्या दरात उतार आहे, तर वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. टमाटा ५० ते ८०, कोबीला ३० ते ४० रुपये भाव आला. टमाटा व कोबीला दर अजूनही कमीच मिळत आहे, तर फ्लॉवरला १० किलोला ८० ते १५० आणि दोडक्याला २५० ते ३०० रुपये भाव आला.

बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बटाट्याचा दर अजूनही स्थिर आहे. शेतकऱ्यांना दरात वाढीची अपेक्षा आहे, तर हिरव्या मिरचीला क्विंटलला अडीच हजारापासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव आला. आल्याला १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आले दरात पुन्हा उतार आला आहे, तर लसणाला क्विंटलला २ ते ६ हजारांपर्यंत भाव आला. लसणाचा दरही स्थिर राहिला आहे.

मागील चार महिन्यांपासून वाटाण्याचा दर कमी झाला होता. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला दीड हजारांपर्यंत दर मिळत होता. मात्र, मागील १५ दिवसांत दरात सुधारणा झाली. वाटाण्याला सध्या ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अजूनही कांदा, टमाटा, वांगी, कोबीचे दर कमीच आहेत. यामुळे बळीराजांत निराशा आहे.

चौकट :

मेथी भाव खाऊ लागली...

सातारा बाजार समितीत गुरूवारी पालेभाज्यांची आवक चांगली झाली. पण, मागील आठवड्याचा विचार करता दरात सुधारणा आहे. मेथीच्या १२०० पेंडीची आवक झाली. याला शेकडा ५०० ते ९०० रुपये दर मिळाला. तर कोथिंबीरची १८०० पेंडी आली. याला शेकडा दर ५०० ते ७०० रुपयांदरम्यान मिळाला. तर पालकला शेकडा ३०० ते ४०० रुपये भाव मिळाला. सध्या मेथीला चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे.

......................................................