शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात वाटाणा पोहोचला ११ हजार रुपये क्विंटलवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:43 IST

सातारा : मागणी वाढल्याने आणि आवक कमी राहिल्याने साताऱ्यात वाटाण्याचा दर वाढत चालला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ...

सातारा : मागणी वाढल्याने आणि आवक कमी राहिल्याने साताऱ्यात वाटाण्याचा दर वाढत चालला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला उच्चांकी असा ११ हजार रुपये भाव आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे वांगी, फ्लॉवर भाव खात असून, कांदा दरातही सुधारणा झाली आहे.

सातारा शहर भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ आहे. शहरात सातारा तालुक्याबरोबरच जावळी, वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, आणि कऱ्हाड तालुक्यातूनही भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. येथील सातारा बाजार समितीत या भाज्यांचा लिलाव होतो. त्यानंतर बाजार समितीतून माल मंडईतील विक्रेते व दुकानदार घेऊन जातात. सातारा बाजार समितीत कांदा, बटाटा आणि इतर पालेभाज्यांची आवक अधिक राहते.

सातारा बाजार समितीत गेल्या पाच दिवसांपासून वाटाणा चांगलाच भाव खाऊ लागला आहे. सध्या क्विंटलला १० ते ११ हजारांपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मागील महिन्यापूर्वी क्विंटलचा दर १० हजारपर्यंत होता. त्यानंतर हाच दर ३ हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, काही दिवसांतच दर वाढल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

सातारा बाजार समितीत वांगीही भाव खाऊ लागली आहेत. मंगळवारी १० किलोला ३०० ते ३८० रुपये दर मिळाला. मात्र, आठ दिवसांपूर्वी १०० ते १५० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. सध्या वांग्याचा दर वाढल्याने किरकोळ विक्री ४० रुपये किलोच्या पुढे गेली आहे. फ्लॉवरलाही चांगला दर मिळत आहे. १० किलोला ५०० रुपयांपर्यंत दर गेला आहे. तसेच टोमॅटो दरात थोडी सुधारणा झाली. टोमॅटोला १० किलोला १०० ते १५०, तर दोडका अन् कारल्याला २५० ते ३०० रुपये भाव मिळाला. भेंडीला २०० ते २५०, शेवगा ४०० ते ५००, पावटा ३०० ते ४००, गवार ५०० ते ५५०, वालघेवड्याला ३०० ते ३५०, काळा घेवडा ५०० ते ६०० आणि गाजराला १० किलोला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. या भाज्यांच्या दरातही सुधारणा झाली आहे.

कांद्याच्या दरातही किंचीत सुधारणा झाली. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याला क्विंटलला दोन हजारांपर्यंत दर मिळत होता. त्यानंतर भाव उतरला. परिणामी १६०० रुपयांपर्यंत दर आला होता. मात्र, पाच दिवसांपासून दरात सुधारणा झाली. मंगळवारी क्विंटलला २०० पासून १८०० पर्यंतर दर आला.

चौकट :

बटाटा, लसणाला उठाव कमी...

साताऱ्यात अनेक भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. मात्र, बटाटा, लसूण, आले यांना उठाव कमीच असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून अशी स्थिती आहे. बटाट्याला क्विंटलला १३०० ते १४०० रुपये भाव मिळाला. लसणाला २ ते ६ हजार, आल्याला क्विंटलला १५०० ते २ हजार रुपये दर आला. मिरचीचाही दर कमी आहे. क्विंटलला १ ते २ हजारांपर्यंत भाव मिळाला. मेथीचा दर वाढला आहे.

.....................................................................