शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात वाटाणा पोहोचला ११ हजार रुपये क्विंटलवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:43 IST

सातारा : मागणी वाढल्याने आणि आवक कमी राहिल्याने साताऱ्यात वाटाण्याचा दर वाढत चालला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ...

सातारा : मागणी वाढल्याने आणि आवक कमी राहिल्याने साताऱ्यात वाटाण्याचा दर वाढत चालला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला उच्चांकी असा ११ हजार रुपये भाव आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे वांगी, फ्लॉवर भाव खात असून, कांदा दरातही सुधारणा झाली आहे.

सातारा शहर भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ आहे. शहरात सातारा तालुक्याबरोबरच जावळी, वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, आणि कऱ्हाड तालुक्यातूनही भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. येथील सातारा बाजार समितीत या भाज्यांचा लिलाव होतो. त्यानंतर बाजार समितीतून माल मंडईतील विक्रेते व दुकानदार घेऊन जातात. सातारा बाजार समितीत कांदा, बटाटा आणि इतर पालेभाज्यांची आवक अधिक राहते.

सातारा बाजार समितीत गेल्या पाच दिवसांपासून वाटाणा चांगलाच भाव खाऊ लागला आहे. सध्या क्विंटलला १० ते ११ हजारांपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मागील महिन्यापूर्वी क्विंटलचा दर १० हजारपर्यंत होता. त्यानंतर हाच दर ३ हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, काही दिवसांतच दर वाढल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

सातारा बाजार समितीत वांगीही भाव खाऊ लागली आहेत. मंगळवारी १० किलोला ३०० ते ३८० रुपये दर मिळाला. मात्र, आठ दिवसांपूर्वी १०० ते १५० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. सध्या वांग्याचा दर वाढल्याने किरकोळ विक्री ४० रुपये किलोच्या पुढे गेली आहे. फ्लॉवरलाही चांगला दर मिळत आहे. १० किलोला ५०० रुपयांपर्यंत दर गेला आहे. तसेच टोमॅटो दरात थोडी सुधारणा झाली. टोमॅटोला १० किलोला १०० ते १५०, तर दोडका अन् कारल्याला २५० ते ३०० रुपये भाव मिळाला. भेंडीला २०० ते २५०, शेवगा ४०० ते ५००, पावटा ३०० ते ४००, गवार ५०० ते ५५०, वालघेवड्याला ३०० ते ३५०, काळा घेवडा ५०० ते ६०० आणि गाजराला १० किलोला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. या भाज्यांच्या दरातही सुधारणा झाली आहे.

कांद्याच्या दरातही किंचीत सुधारणा झाली. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याला क्विंटलला दोन हजारांपर्यंत दर मिळत होता. त्यानंतर भाव उतरला. परिणामी १६०० रुपयांपर्यंत दर आला होता. मात्र, पाच दिवसांपासून दरात सुधारणा झाली. मंगळवारी क्विंटलला २०० पासून १८०० पर्यंतर दर आला.

चौकट :

बटाटा, लसणाला उठाव कमी...

साताऱ्यात अनेक भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. मात्र, बटाटा, लसूण, आले यांना उठाव कमीच असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून अशी स्थिती आहे. बटाट्याला क्विंटलला १३०० ते १४०० रुपये भाव मिळाला. लसणाला २ ते ६ हजार, आल्याला क्विंटलला १५०० ते २ हजार रुपये दर आला. मिरचीचाही दर कमी आहे. क्विंटलला १ ते २ हजारांपर्यंत भाव मिळाला. मेथीचा दर वाढला आहे.

.....................................................................