शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

साताऱ्यात वाटाणा पोहोचला ११ हजार रुपये क्विंटलवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:43 IST

सातारा : मागणी वाढल्याने आणि आवक कमी राहिल्याने साताऱ्यात वाटाण्याचा दर वाढत चालला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला ...

सातारा : मागणी वाढल्याने आणि आवक कमी राहिल्याने साताऱ्यात वाटाण्याचा दर वाढत चालला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला उच्चांकी असा ११ हजार रुपये भाव आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे वांगी, फ्लॉवर भाव खात असून, कांदा दरातही सुधारणा झाली आहे.

सातारा शहर भाजीपाल्याची मोठी बाजारपेठ आहे. शहरात सातारा तालुक्याबरोबरच जावळी, वाई, कोरेगाव, फलटण, माण, खटाव, आणि कऱ्हाड तालुक्यातूनही भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. येथील सातारा बाजार समितीत या भाज्यांचा लिलाव होतो. त्यानंतर बाजार समितीतून माल मंडईतील विक्रेते व दुकानदार घेऊन जातात. सातारा बाजार समितीत कांदा, बटाटा आणि इतर पालेभाज्यांची आवक अधिक राहते.

सातारा बाजार समितीत गेल्या पाच दिवसांपासून वाटाणा चांगलाच भाव खाऊ लागला आहे. सध्या क्विंटलला १० ते ११ हजारांपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मागील महिन्यापूर्वी क्विंटलचा दर १० हजारपर्यंत होता. त्यानंतर हाच दर ३ हजार रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र, काही दिवसांतच दर वाढल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

सातारा बाजार समितीत वांगीही भाव खाऊ लागली आहेत. मंगळवारी १० किलोला ३०० ते ३८० रुपये दर मिळाला. मात्र, आठ दिवसांपूर्वी १०० ते १५० रुपयांपर्यंत दर खाली आला होता. सध्या वांग्याचा दर वाढल्याने किरकोळ विक्री ४० रुपये किलोच्या पुढे गेली आहे. फ्लॉवरलाही चांगला दर मिळत आहे. १० किलोला ५०० रुपयांपर्यंत दर गेला आहे. तसेच टोमॅटो दरात थोडी सुधारणा झाली. टोमॅटोला १० किलोला १०० ते १५०, तर दोडका अन् कारल्याला २५० ते ३०० रुपये भाव मिळाला. भेंडीला २०० ते २५०, शेवगा ४०० ते ५००, पावटा ३०० ते ४००, गवार ५०० ते ५५०, वालघेवड्याला ३०० ते ३५०, काळा घेवडा ५०० ते ६०० आणि गाजराला १० किलोला २५० ते ३०० रुपये दर मिळाला. या भाज्यांच्या दरातही सुधारणा झाली आहे.

कांद्याच्या दरातही किंचीत सुधारणा झाली. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याला क्विंटलला दोन हजारांपर्यंत दर मिळत होता. त्यानंतर भाव उतरला. परिणामी १६०० रुपयांपर्यंत दर आला होता. मात्र, पाच दिवसांपासून दरात सुधारणा झाली. मंगळवारी क्विंटलला २०० पासून १८०० पर्यंतर दर आला.

चौकट :

बटाटा, लसणाला उठाव कमी...

साताऱ्यात अनेक भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. मात्र, बटाटा, लसूण, आले यांना उठाव कमीच असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून अशी स्थिती आहे. बटाट्याला क्विंटलला १३०० ते १४०० रुपये भाव मिळाला. लसणाला २ ते ६ हजार, आल्याला क्विंटलला १५०० ते २ हजार रुपये दर आला. मिरचीचाही दर कमी आहे. क्विंटलला १ ते २ हजारांपर्यंत भाव मिळाला. मेथीचा दर वाढला आहे.

.....................................................................