शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

एका कारखान्याकडून दहा दिवसांत पेमेंट तर दुसऱ्याकडून वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील साखर हंगाम गतिमान होत असतानाच ऊस दराबाबत अनेक कारखान्यांनी तोंडावर बोट ठेवत बगल दिली आहे. ...

वाठार स्टेशन : जिल्ह्यातील साखर हंगाम गतिमान होत असतानाच ऊस दराबाबत अनेक कारखान्यांनी तोंडावर बोट ठेवत बगल दिली आहे. अजिंक्यतारा साखर कारखान्याने या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला दहा दिवसांत पहिली उचल दिली आहे. याउलट किसन वीर कारखान्याने वर्षानंतरही काही लोकांचे उसाचे पैसे दिले नसल्याचा आरोप होत आहे.

एफआरपीनुसार ऊसदर ही ऊस दराबाबतची भूमिका निश्चित झाल्यानंतर राज्यातील साखर हंगामाचा प्रारंभ झाला. खरंतर या वेळेसच प्रत्येक कारखान्याने आपआपली एफआरपी रक्कम किती आहे हे जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, हे धाडस काही कारखाने वगळता कुणीही केले नाही. एफआरपी कायद्याअंतर्गत ऊसतोडणी झालेल्या दिवसापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी एफआरपी जमा करणे कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. मात्र, एफआरपीच्या या नियमाची गेल्या अनेक वर्षांपासून चेष्टा करण्याचे काम साखर कारखानदार करीत आहेत.

जिल्ह्यात गत पाच वर्षांत सहकाराच्या बरोबरीत खासगी कारखानदारी उभी राहिली असली तरी अजिंक्यतारा सह्याद्री कृष्णासारखे सहकारी साखर कारखाने सहकारात कशा पध्दतीने आदर्श काम करत आहेत, याची माहिती घेणे आवश्यक आहे.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई म्हणाले, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना अत्यंत नियोजन आणि नेटक्या पध्दतीने कार्यरत आहे. सर्वात पहिल्यांदा साखर कारखान्यानी आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक आहे. साखरेचा दर्जा आणी साखर विक्रीबाबतचे योग्य धोरण याबाबत काळजी घेणे अपेक्षित आहे. हे काम अजिंक्यतारा साखर कारखाना योग्य पद्धतीने करीत आहे. यामुळेच दहाव्या दिवसाला शेतकऱ्यांना ऊस पेमेंट करणे शक्य होत आहे. साखळी पध्दतीने साखर हंगामाची दरवर्षी दिशा बदलत असल्याने या हंगामात क्षेत्र मुबलक असल्याने ऊस उत्पादक ऊस घालविण्याच्या चिंतेत आहे. त्यामुळे ऊसदराची चिंता न करता मिळेल त्या कारखान्याला ऊस घालण्याचे काम हा शेतकरी करीत आहे. याचा फायदा ऊसतोडणी यंत्रणा, कारखानदार घेत आहेत. शरयूसारखा कारखाना कोणतेही हमीपत्र न करता एफआरपीपेक्षा पाचशे रुपये शेतकऱ्यांना कमी दर देत आहे. या कारखान्याबाबत साखर आयुक्तांनी योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.’