शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

Lok Sabha Election 2019 निवडणूक न लढवताही पवारांना पंतप्रधानपदाची स्वप्ने : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:51 IST

फलटण : ‘माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे व पाणी हे प्रश्न आम्ही सोडवूच; पण या भागातील विकासाची भूक कायमची मिटविण्यासाठी ...

फलटण : ‘माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे व पाणी हे प्रश्न आम्ही सोडवूच; पण या भागातील विकासाची भूक कायमची मिटविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. राष्ट्रवादीच्या कॅप्टनने तर माढ्याच्या हवेचा अंदाज बघून माघार घेतली. निवडणूक न लढवता त्यांना पंतप्रधानांची स्वप्ने पडत आहेत,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.फलटण येथे माढा लोकसभा मतदार- संघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार बाबूराव माने, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, दिगंबर आगवणे, उत्तमराव जानकर, सह्याद्री कदम, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, नरसिंह निकम, आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आताच्या लोकसभेच्या मॅचमध्ये भाजपचे नरेंद्र मोदी कॅप्टन म्हणून ओपनिंगला उतरले असून, ते चौकार-षट्कार लगावत विजय मिळवित आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे कॅप्टन कोठे आहेत? ते माढ्यातून उतरले आणि जनतेचा इशारा बघून बारावा राखीव खेळाडू म्हणून माघारी गेले. त्यांनी माढ्याच्या हवेचा अंदाज बघूनच माघार घेतलीय. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे गरिबी हटावचा नारा देतात; पण त्यांच्या आजोबांपासून वडिलांपर्यंत देशात सत्ता असताना का गरिबी हटली नाही. काँग्रेसने स्वत:ची व स्वत:च्या कार्यकर्त्यांची गरिबी हटविली. मात्र, मोदींनी गेल्या पाच वर्षांत गरिबांसाठी मोठे काम केले आहे. आज देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या पाकिस्तानलाही मोदींनी त्यांच्या देशात घुसून धडा शिकविलाय. काँग्रेस देशाला फसविण्याचे आणि सैन्यदलाचे खच्चीकरण करण्याचे पाप करत आहे.’‘माढा लोकसभा मतदार संघातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नुसती खोटी आश्वासने, थापा मारण्याचे राजकारण केलेले आहे. येथील जनतेच्या जोरावर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जनतेच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध पाणी प्रकल्प आणि योजनांना आम्ही निधी दिला. नीरा देवघरच्या कालव्याचे हक्काचे पाणी निश्चितच फलटण आणि माळशिरस तालुक्याला मिळेल. तुमच्या हक्काचे पाणी कोणाला हिरावू देणार नाही आणि कोणाला पळवूही देणार नाही. तसेच रेल्वेही कोणाला अडवू देणार नाही. जो कोणी अडवायचा प्रयत्न करेल त्याला जनता धुडकावून लावेल.रामदास आठवले यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. त्यांनी मला फसविण्याचे राजकारण केले. भाजपने मला आणि मागासवर्गीय समाजाला न्याय दिला असून, राष्ट्रवादीला माढ्यामध्ये गाडण्याचेही आवाहनही त्यांनी केले.रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘ही निवडणूक पाणी आणि रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी लढवत आहे. जनतेच्या ताकतीवर मी उभा असून, लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे साखरवाडी कारखान्याचा थकबाकीचाही विषय मार्गी लागणार आहे. आपल्या मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू असला तरी फलटणकर जनतेच्या ताकतीवर तो उधळून लावू.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक