शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

राजेंच्या द्वंद्वात पवारांची कृष्णशिष्टाई अपेक्षित

By admin | Updated: December 31, 2016 00:08 IST

‘राजधानी’तला वणवा जिल्हाभर : ‘जाणताराजा’च्या सातारा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष

सातारा : पालिका निवडणुकीच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चांगलेच द्वंद्वयुद्ध पेटले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाची जणू मालिकाच काही दिवसांपासून सुरू आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ८ जानेवारी रोजी अजिंक्यतारा कारखान्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणाचे औचित्य साधून या दोन राजेंतील द्वंद्व शमविण्याचा प्रयत्न जाणता राजा करणार की वेगळी घोषणा करणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. सातारा पालिका निवडणुकीत मनोमिलन तोडण्याचा निर्णय घेऊन खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाला जोरदार धक्का दिला. हेच धक्कातंत्र त्यांनी पुढेही सुरूच ठेवल्याचे सध्या पाहायला मिळते. धक्कातंत्राच्या माध्यमातून उदयनराजेंनी भाजपलाही धूळ चारत पालिकेत सत्ता स्थापन केली. आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांकडे उदयनराजेंचा निशाणा आहे.पालिका निवडणुकीनंतर सुरुवातीच्या कालावधीत उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील वाद सातारा तालुक्यातही उफाळून येणार, असे मानले जात होते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये हे वातावरण आणखी तापणार, असे चित्र जाणवत होते; पण उदयनराजेंनी काढलेले वर्तुळ तालुक्यापुरते मर्यादित नसून ते जिल्हा व्यापणार असे नुकतेच स्पष्ट झाले आहे. राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडीची हाक देत उदयनराजेंनी सर्व पक्षांतील नाराजांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उदयनराजेंचे हे दुसरे धक्कातंत्र आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदाराने वेगळी भूमिका घेतल्याने पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदार व इतर नेतेमंडळींपुढे पेच निर्माण झालेला आहे. पक्षाचे तिकीट मिळाले नाही तर नाराजांना राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. साहजिकच राष्ट्रवादीला याची चिंता जास्त आहे. सातारा, वाई, कऱ्हाड या तीन तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना ही धोक्याची घंटा ठरणार असल्याने त्यांच्यात अस्वस्थता असणे साहजिकच मानले जात आहे. या परिस्थितीत खासदार शरद पवार यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नेत्यांनीच उदयनराजेंना सल्ला द्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांचेच आगामी निवडणुकांत ऐकले जावे, किमान त्यांचे म्हणणे विचारात घेऊन उमेदवाऱ्या दिल्या जाव्यात, अशी आमदारांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पवार कशी पूर्ण करतात?, हे पाहण्याजोगे ठरेल. (प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षातही अस्वस्थताखासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे भाजपमध्येही अस्वस्थता आहे. पालिका निवडणुकांतील यशानंतर भाजपमध्ये भलतेच बळ संचारले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही मुसंडी मारण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. मात्र, उदयनराजेंनी उपलब्ध करून दिलेल्या पर्यायामुळे भाजपने तिकीट नाकारलेल्यांना संधी दिली जाऊ शकते. उदयनराजेंची ही राजकीय खेळी भाजपला थोपवून धरण्यातही यशस्वी ठरू शकते.