शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

पतिराजाची वरात मतदारांच्या दारात..!

By admin | Updated: November 17, 2016 22:22 IST

प्रचाराची जबाबदारी : आरक्षणामुळे महिलांना उमेदवारीची संधी-- खंडाळा नगरपंचायत

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. एरव्ही राजकारणापासून दूर असलेल्या महिलांवर निवडणूक आरक्षणामुळे उमेदवारीची जबाबदारी पडली असली असून, प्रचाराच्या रणधुमाळीत त्या काहीशा पिछाडीवर दिसत आहेत. त्यामुळे प्रचाराची जबाबदारी पतिराजांच्या खांद्यावर पडली आहे. खंडाळा नगरपंचायतीत सतरा जागांसाठी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यासाठी २५ महिला निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग दोन ते आठ आणि पंधरा व सोळा या प्रभागांतील लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. इतरवेळी पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढणाऱ्या पत्नीसाठी पतीने योगदान देण्याची वेळ आली आहे. महिलांना उमेदवारी मिळाली असली तरी त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरातीलच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रतिष्ठेची लढाई केली आहे. पत्नीच्या विजयाचा चंग बांधून मतदारांच्या घराचा उंबरा पतीकडून झिजविला जात आहे. स्वत:च्या सामाजिक कर्तृत्वाचा पाढा वाचण्याबरोबरच पत्नीच्या जिव्हाळ्याची आणि प्रेमळ स्वभावाची आठवण मतदारांपुढे करून दिली जात आहे. याचा फायदाही होताना पाहायला मिळत आहे.पत्नीसाठी पतीची चाललेली कसरत वाखाणण्याजोगी दिसत आहे. खंडाळ्यातील महिला उमेदवारांपैकी काँग्रेसकडून रोहिणी गाढवे, धनश्री जाधव, कल्पना गाढवे, संगीता राऊत, वैजयंता भोसले, जयश्री जाधव, हेमलता ठोंबरे, लता आवटे, दीपाली चव्हाण या निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांना राष्ट्रवादीकडून शोभा गाढवे, सुप्रिया वळकुंदे, शारदा खंडागळे, उज्ज्वला गाढवे, उज्ज्वला संपकाळ, नंदा गायकवाड, लताबाई नरुटे, वनिता संकपाळ, सुप्रिया गुरव यांनी आव्हान दिले आहे. भाजपकडून स्वाती खंडागळे, वनिता शिर्के, राजलक्ष्मी पाटील, वनिता गजफोडे, विजया संकपाळ, शिवसेनेकडून अश्विनी शिंदे या एकमेव निवडणूक लढवत आहेत.महिला उमेदवारी गळ्यात पडल्याने सुरुवातीला नाक मुरडणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता काहीही झाले तरी नाव राखायचं असा निर्धार करून रणांगण तापायला सुरुवात केली आहे. पतीच्या प्रत्येक घरातून वैयक्तिक गाठीभेटी सुरू आहेत. विरोधातील असल्या तरी मैत्रिणींना मतांची गळ घातली जात आहे. त्यामुळे राजकारण श्रेष्ठ ठरणार की मैत्री याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)पैसा झाला मोठानिवडणूक म्हटलं की, सर्रास पैशांचा पाऊस पडतो, असं म्हणतात. मात्र, पाचशे, हजारांच्या नोटा बंदीमुळे उमेदवारांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मतदारांच्या अडचणीसाठी पैशांची मदत करता येत नसल्याने पंचाईत झाली आहे. यानिमित्ताने शेवटी पैसा मोठाच असल्याचे समोर आले आहे. यावरही मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शोधल्या जात आहेत.