शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पतिराजाची वरात मतदारांच्या दारात..!

By admin | Updated: November 17, 2016 22:22 IST

प्रचाराची जबाबदारी : आरक्षणामुळे महिलांना उमेदवारीची संधी-- खंडाळा नगरपंचायत

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. एरव्ही राजकारणापासून दूर असलेल्या महिलांवर निवडणूक आरक्षणामुळे उमेदवारीची जबाबदारी पडली असली असून, प्रचाराच्या रणधुमाळीत त्या काहीशा पिछाडीवर दिसत आहेत. त्यामुळे प्रचाराची जबाबदारी पतिराजांच्या खांद्यावर पडली आहे. खंडाळा नगरपंचायतीत सतरा जागांसाठी नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यासाठी २५ महिला निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभाग दोन ते आठ आणि पंधरा व सोळा या प्रभागांतील लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. इतरवेळी पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढणाऱ्या पत्नीसाठी पतीने योगदान देण्याची वेळ आली आहे. महिलांना उमेदवारी मिळाली असली तरी त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरातीलच आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रतिष्ठेची लढाई केली आहे. पत्नीच्या विजयाचा चंग बांधून मतदारांच्या घराचा उंबरा पतीकडून झिजविला जात आहे. स्वत:च्या सामाजिक कर्तृत्वाचा पाढा वाचण्याबरोबरच पत्नीच्या जिव्हाळ्याची आणि प्रेमळ स्वभावाची आठवण मतदारांपुढे करून दिली जात आहे. याचा फायदाही होताना पाहायला मिळत आहे.पत्नीसाठी पतीची चाललेली कसरत वाखाणण्याजोगी दिसत आहे. खंडाळ्यातील महिला उमेदवारांपैकी काँग्रेसकडून रोहिणी गाढवे, धनश्री जाधव, कल्पना गाढवे, संगीता राऊत, वैजयंता भोसले, जयश्री जाधव, हेमलता ठोंबरे, लता आवटे, दीपाली चव्हाण या निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांना राष्ट्रवादीकडून शोभा गाढवे, सुप्रिया वळकुंदे, शारदा खंडागळे, उज्ज्वला गाढवे, उज्ज्वला संपकाळ, नंदा गायकवाड, लताबाई नरुटे, वनिता संकपाळ, सुप्रिया गुरव यांनी आव्हान दिले आहे. भाजपकडून स्वाती खंडागळे, वनिता शिर्के, राजलक्ष्मी पाटील, वनिता गजफोडे, विजया संकपाळ, शिवसेनेकडून अश्विनी शिंदे या एकमेव निवडणूक लढवत आहेत.महिला उमेदवारी गळ्यात पडल्याने सुरुवातीला नाक मुरडणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता काहीही झाले तरी नाव राखायचं असा निर्धार करून रणांगण तापायला सुरुवात केली आहे. पतीच्या प्रत्येक घरातून वैयक्तिक गाठीभेटी सुरू आहेत. विरोधातील असल्या तरी मैत्रिणींना मतांची गळ घातली जात आहे. त्यामुळे राजकारण श्रेष्ठ ठरणार की मैत्री याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)पैसा झाला मोठानिवडणूक म्हटलं की, सर्रास पैशांचा पाऊस पडतो, असं म्हणतात. मात्र, पाचशे, हजारांच्या नोटा बंदीमुळे उमेदवारांपुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मतदारांच्या अडचणीसाठी पैशांची मदत करता येत नसल्याने पंचाईत झाली आहे. यानिमित्ताने शेवटी पैसा मोठाच असल्याचे समोर आले आहे. यावरही मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शोधल्या जात आहेत.