शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाटणकर पिता-पुत्र दोन वर्षे होते कुठे?

By admin | Updated: December 31, 2016 00:07 IST

शंभूराज देसार्इंचा सवाल : मरळीला युवक मेळावा; निवडणूक आली म्हणून हात जोडतात, पराभवानंतरही मी तालुक्यात फिरलो होतो

पाटण : ‘२००९ च्या पराभवानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बाहेर पडून मी ५ वर्षे दिवसरात्र तालुक्यात फिरलो. सत्ता नसताना कामे केली. म्हणून १८,८२४ मतांनी विजयी झालो. मात्र, पराभव झालेल्या पाटणकर पिता-पुत्रांनी गेली दोन वर्षे तोंड लपवून घेतले. निवडणुका आल्या म्हणून हात जोडणारे पिता-पुत्र होते कुठे?,’ असा सवाल आमदार शंभूराज देसाई यांनी केला. दौलतनगर मरळी, ता. पाटण येथे आयोजित तालुक्यातील युवकांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.आमदार देसाई म्हणाले, ‘सत्यजित पाटणकर आता म्हणताहेत निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्यांचे हसू येत आहे. ते असे का म्हणतात याचा शोध घेतला असता शरद पवारांनी दिलेल्या १ कोटी रुपये निधीतील भूमिपूजने पाटणकर करत असल्याचे समजले. मोरणा भागात मी एका दिवसात १२ कोटींच्या विकासकामांची भूमिपूजने केली आहेत. तर आमदार झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत १७५ कोटींची कामे तालुक्यात केली आहेत. विक्रमसिंह पाटणकरांनी बांधकाम मंत्री असताना राज्याच्या एका वर्षाच्या बजेटमधील ३ हजार कोटींच्या निधीपैकी ५ वर्षांत ११५० कोटी रुपये तरी पाटणसाठी आणायचे होते. २०१४ सालापासून मी ‘जनता दरबार’ ही संकल्पना तालुक्यात राबविली. त्याद्वारे आजअखेर ६६२ पैकी ६१० लोकांची कामे केली आहेत. तारळी धरणाचे पाणी माढा मतदार संघात पळविण्याचा निर्णय पाटणकर आमदार असताना झाला होता. तो मी रद्द करून घेतला आहे. लोकनेत्यांच्या भव्य स्मारकासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या स्मारकाचे काम चालू असून, यामध्ये तरुणांसाठी स्टडी सेंटर सुरू करणार आहे. भूकंपग्रस्त दाखले १९९५ मध्ये पाटणसाठी बंद झाले होते. ते सुरू करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना विनंत्या केल्या. दुर्दैवाने निर्णय झाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ जी. आर. काढून पाटणसाठी दाखले सुरू केले. आजपर्यंत ५८१ भूकंप दाखले देण्यात आले असून, त्याचा उपयोग तरुणांना झाला. पाटणकरांच्या २१ वर्षांच्या निष्क्रीय कारकिर्दीनंतर खऱ्या अर्थाने पाटण तालुक्यात परिवर्तनाची सुरुवात झाली. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी २००४ मध्ये लढाई झाली. त्यामुळेच राज्याच्या कॅबिनेटमंत्र्यांचा पराभव तालुक्यातील जनतेने केला.उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार वशिल्याने मिळविला, असे पाटणकर म्हणतात. मात्र, त्यांना मला सांगायचे आहे की, मला पुरस्कार मिळाला त्यावेळी तुमचेच सरकार राज्य व केंद्रात होते. मी तर विरोधी पक्षाचा आमदार होतो. विधानसभेत डुलक्या मारून पुरस्कार मिळत नाही, अशी टीकाही आमदार शंभूराज देसाई यांनी केली. पाटणकरांनी तोंड उघडले नाही म्हणूनच १५ वर्षे भूकंप दाखले मिळाले नाहीत आणि तरुणांच्या दोन पिढ्या नोकरीपासून वंचित राहिल्या,’ असा आरोप शंभूराज देसार्इंनी केला.यावेळी रविराज देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, भरत साळुंखे, अ‍ॅड. डी. पी. जाधव, अ‍ॅड. मिलिंद पाटील उपस्थित होेते. यावेळी पी. एल. माने (गिरेवाडी), भगवान माने, आनंदराव माने, बापूराव माने (मानेगाव), वसंत पवार (शिंगणवाडी), शंकर भिसे (नाटोशी), अजित कदम (मल्हारपेठ), अशोक शेळके (आबदारवाडी) यांनी देसाई गटात प्रवेश केला. (प्रतिनिधी)यशराज देसार्इंचे पहिले भाषणआमदार शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांनी युवक मेळाव्यात पहिलेच भाषण करून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केल्याचे दिसले. यशराज देसाई म्हणाले, ‘आपल्या तालुक्याचे आमदार जोपर्यंत लालदिव्याच्या गाडीत बसणार नाहीत, तोपर्यंत युवकांनी स्वस्थ बसू नये.’ त्यावर उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई भाषणात गहिवरले. इच्छुकांना बोलण्याची संधी... ‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देसाई गटाकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्यांना आपली मते व्यक्त करण्याची संधी दिली जाईल. त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. इच्छुकांचे एकमत करून एकासाठी शिक्कामोर्तब केले जाईल. नाहीतर माझा निर्णय अंतिम राहील,’ असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.