शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

पाटणकर पिता-पुत्र दोन वर्षे होते कुठे?

By admin | Updated: December 31, 2016 00:07 IST

शंभूराज देसार्इंचा सवाल : मरळीला युवक मेळावा; निवडणूक आली म्हणून हात जोडतात, पराभवानंतरही मी तालुक्यात फिरलो होतो

पाटण : ‘२००९ च्या पराभवानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बाहेर पडून मी ५ वर्षे दिवसरात्र तालुक्यात फिरलो. सत्ता नसताना कामे केली. म्हणून १८,८२४ मतांनी विजयी झालो. मात्र, पराभव झालेल्या पाटणकर पिता-पुत्रांनी गेली दोन वर्षे तोंड लपवून घेतले. निवडणुका आल्या म्हणून हात जोडणारे पिता-पुत्र होते कुठे?,’ असा सवाल आमदार शंभूराज देसाई यांनी केला. दौलतनगर मरळी, ता. पाटण येथे आयोजित तालुक्यातील युवकांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.आमदार देसाई म्हणाले, ‘सत्यजित पाटणकर आता म्हणताहेत निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यांच्या या वक्तव्यांचे हसू येत आहे. ते असे का म्हणतात याचा शोध घेतला असता शरद पवारांनी दिलेल्या १ कोटी रुपये निधीतील भूमिपूजने पाटणकर करत असल्याचे समजले. मोरणा भागात मी एका दिवसात १२ कोटींच्या विकासकामांची भूमिपूजने केली आहेत. तर आमदार झाल्यापासून गेल्या दोन वर्षांत १७५ कोटींची कामे तालुक्यात केली आहेत. विक्रमसिंह पाटणकरांनी बांधकाम मंत्री असताना राज्याच्या एका वर्षाच्या बजेटमधील ३ हजार कोटींच्या निधीपैकी ५ वर्षांत ११५० कोटी रुपये तरी पाटणसाठी आणायचे होते. २०१४ सालापासून मी ‘जनता दरबार’ ही संकल्पना तालुक्यात राबविली. त्याद्वारे आजअखेर ६६२ पैकी ६१० लोकांची कामे केली आहेत. तारळी धरणाचे पाणी माढा मतदार संघात पळविण्याचा निर्णय पाटणकर आमदार असताना झाला होता. तो मी रद्द करून घेतला आहे. लोकनेत्यांच्या भव्य स्मारकासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या स्मारकाचे काम चालू असून, यामध्ये तरुणांसाठी स्टडी सेंटर सुरू करणार आहे. भूकंपग्रस्त दाखले १९९५ मध्ये पाटणसाठी बंद झाले होते. ते सुरू करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना विनंत्या केल्या. दुर्दैवाने निर्णय झाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ जी. आर. काढून पाटणसाठी दाखले सुरू केले. आजपर्यंत ५८१ भूकंप दाखले देण्यात आले असून, त्याचा उपयोग तरुणांना झाला. पाटणकरांच्या २१ वर्षांच्या निष्क्रीय कारकिर्दीनंतर खऱ्या अर्थाने पाटण तालुक्यात परिवर्तनाची सुरुवात झाली. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी २००४ मध्ये लढाई झाली. त्यामुळेच राज्याच्या कॅबिनेटमंत्र्यांचा पराभव तालुक्यातील जनतेने केला.उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार वशिल्याने मिळविला, असे पाटणकर म्हणतात. मात्र, त्यांना मला सांगायचे आहे की, मला पुरस्कार मिळाला त्यावेळी तुमचेच सरकार राज्य व केंद्रात होते. मी तर विरोधी पक्षाचा आमदार होतो. विधानसभेत डुलक्या मारून पुरस्कार मिळत नाही, अशी टीकाही आमदार शंभूराज देसाई यांनी केली. पाटणकरांनी तोंड उघडले नाही म्हणूनच १५ वर्षे भूकंप दाखले मिळाले नाहीत आणि तरुणांच्या दोन पिढ्या नोकरीपासून वंचित राहिल्या,’ असा आरोप शंभूराज देसार्इंनी केला.यावेळी रविराज देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपसभापती डी. आर. पाटील, भरत साळुंखे, अ‍ॅड. डी. पी. जाधव, अ‍ॅड. मिलिंद पाटील उपस्थित होेते. यावेळी पी. एल. माने (गिरेवाडी), भगवान माने, आनंदराव माने, बापूराव माने (मानेगाव), वसंत पवार (शिंगणवाडी), शंकर भिसे (नाटोशी), अजित कदम (मल्हारपेठ), अशोक शेळके (आबदारवाडी) यांनी देसाई गटात प्रवेश केला. (प्रतिनिधी)यशराज देसार्इंचे पहिले भाषणआमदार शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई यांनी युवक मेळाव्यात पहिलेच भाषण करून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केल्याचे दिसले. यशराज देसाई म्हणाले, ‘आपल्या तालुक्याचे आमदार जोपर्यंत लालदिव्याच्या गाडीत बसणार नाहीत, तोपर्यंत युवकांनी स्वस्थ बसू नये.’ त्यावर उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई भाषणात गहिवरले. इच्छुकांना बोलण्याची संधी... ‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत देसाई गटाकडून उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्यांना आपली मते व्यक्त करण्याची संधी दिली जाईल. त्या-त्या भागातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. इच्छुकांचे एकमत करून एकासाठी शिक्कामोर्तब केले जाईल. नाहीतर माझा निर्णय अंतिम राहील,’ असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.