शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतिसंगमावर पक्षीय झेंडे झळकणार की आघाड्यांचेच राजकारण होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

प्रमोद सुकरे कऱ्हड: निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कच्च्या वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे ...

प्रमोद सुकरे

कऱ्हड: निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कच्च्या वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे कऱ्हाड पालिका वर्तुळात राजकीय घडामोडी सुरू झालेल्या आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भाने आराखडे होऊ लागले आहेत; पण या निवडणुकीत पक्षीय झेंडे झळकणार ही पुन्हा आघाड्यांचेच राजकारण होणार, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

कऱ्हाड पालिकेची सध्या शतकोत्तर अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. सन १८५५ साली येथील पालिकेची स्थापना झाली आहे. तर ज्येष्ठ नेते दिवंगत पी. डी. पाटील यांनी सलग ४० वर्षे नगराध्यक्षपद भूषवत इतिहास रचला आहे. सुरुवातीच्या काळात पक्ष किंवा आघाडी असे राजकारण येथे होत नव्हते. पण १९९६ पासून पालिकेत आघाड्यांचे राजकारण सुरू झालेली दिसते.

सन २०१६ साली झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती आघाडीने १६ जागा जिंकत बहुमत मिळवले. पण भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी थेट नगराध्यक्षा निवडणुकीत बाजी मारली. तसेच भाजपच्या चिन्हावर ४ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीला ६ जागा मिळाल्या. ते विरोधी बाकावर बसले. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या ३ नगरसेवकांपैकी एकाने जनशक्ती आघाडीला तर दोघांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

गतवेळी १४ प्रभागातून २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यात ३ मागासवर्गीय प्रवर्गातून तर ८ इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आले होते. उरलेले नगरसेवक खुल्या प्रवर्गातून विजय झाले होते. यावर्षी प्रभाग रचनेत बदल होऊन सिंगल वाॅर्ड रचना होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे २९ वाॅर्ड मधून प्रत्येकी एक नगरसेवक निवडला जाईल अशी परिस्थिती आहे.

येऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस व भाजपने पक्षीय झेंडे खांद्यावर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत काही महिन्यांपूर्वीच दिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्वांना बरोबर घेऊन लोकशाही आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात पक्षीय झेंडे खांद्यावर घेतले जाणार की पुन्हा आघाड्यांच्याच राजकारणाचा खेळ होणार हे पाहावे लागणार आहे.

गत साडेचार वर्षांचा पालिकेतील कारभार पाहिला तर फक्त सत्तेचे त्रांगडे पाहायला मिळाले आहे. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांची कसरत कराडकरांनी पाहिली आहे. तर बहुमतात असणाऱ्या जनशक्ती आघाडीचे त्रिभाजन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विकासकामांचा मेळ हवा कसा बसलेला दिसत नाही. खरे तर सत्ता संपत आली तरी पालिकेत नेमके सत्ताधारी कोण हेच कराडकरांना समजलेले नाही, असेच म्हणावे लागेल.

चौकटी वेगळ्या पाठवित आहे.