शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रीतिसंगमावर पक्षीय झेंडे झळकणार की आघाड्यांचेच राजकारण होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST

प्रमोद सुकरे कऱ्हड: निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कच्च्या वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे ...

प्रमोद सुकरे

कऱ्हड: निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कच्च्या वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे कऱ्हाड पालिका वर्तुळात राजकीय घडामोडी सुरू झालेल्या आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भाने आराखडे होऊ लागले आहेत; पण या निवडणुकीत पक्षीय झेंडे झळकणार ही पुन्हा आघाड्यांचेच राजकारण होणार, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

कऱ्हाड पालिकेची सध्या शतकोत्तर अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. सन १८५५ साली येथील पालिकेची स्थापना झाली आहे. तर ज्येष्ठ नेते दिवंगत पी. डी. पाटील यांनी सलग ४० वर्षे नगराध्यक्षपद भूषवत इतिहास रचला आहे. सुरुवातीच्या काळात पक्ष किंवा आघाडी असे राजकारण येथे होत नव्हते. पण १९९६ पासून पालिकेत आघाड्यांचे राजकारण सुरू झालेली दिसते.

सन २०१६ साली झालेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती आघाडीने १६ जागा जिंकत बहुमत मिळवले. पण भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी थेट नगराध्यक्षा निवडणुकीत बाजी मारली. तसेच भाजपच्या चिन्हावर ४ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीला ६ जागा मिळाल्या. ते विरोधी बाकावर बसले. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या ३ नगरसेवकांपैकी एकाने जनशक्ती आघाडीला तर दोघांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

गतवेळी १४ प्रभागातून २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यात ३ मागासवर्गीय प्रवर्गातून तर ८ इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आले होते. उरलेले नगरसेवक खुल्या प्रवर्गातून विजय झाले होते. यावर्षी प्रभाग रचनेत बदल होऊन सिंगल वाॅर्ड रचना होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे २९ वाॅर्ड मधून प्रत्येकी एक नगरसेवक निवडला जाईल अशी परिस्थिती आहे.

येऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस व भाजपने पक्षीय झेंडे खांद्यावर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत काही महिन्यांपूर्वीच दिली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सर्वांना बरोबर घेऊन लोकशाही आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात पक्षीय झेंडे खांद्यावर घेतले जाणार की पुन्हा आघाड्यांच्याच राजकारणाचा खेळ होणार हे पाहावे लागणार आहे.

गत साडेचार वर्षांचा पालिकेतील कारभार पाहिला तर फक्त सत्तेचे त्रांगडे पाहायला मिळाले आहे. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांची कसरत कराडकरांनी पाहिली आहे. तर बहुमतात असणाऱ्या जनशक्ती आघाडीचे त्रिभाजन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विकासकामांचा मेळ हवा कसा बसलेला दिसत नाही. खरे तर सत्ता संपत आली तरी पालिकेत नेमके सत्ताधारी कोण हेच कराडकरांना समजलेले नाही, असेच म्हणावे लागेल.

चौकटी वेगळ्या पाठवित आहे.